शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

महाविद्यालयांच्या हलगर्जीचा हजारो विद्यार्थ्यांना फटका

By admin | Updated: September 11, 2015 03:29 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ तसेच संलग्नित महाविद्यालयाच्या हलगर्जीपणामुळे हजारो विद्यार्थ्यांची ‘आॅनलाईन’ नोंदणी खोळंबली असल्याची बाब समोर आली आहे.

नागपूर विद्यापीठ : अनेक जणांची ‘आॅनलाईन’ नोंदणी खोळंबलीनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ तसेच संलग्नित महाविद्यालयाच्या हलगर्जीपणामुळे हजारो विद्यार्थ्यांची ‘आॅनलाईन’ नोंदणी खोळंबली असल्याची बाब समोर आली आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे महाविद्यालये आपली जबाबदारी झटकत असल्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. विद्यापीठाने नोंदणीला मुदतवाढ दिली असली तरी, संबंधित महाविद्यालये तसेच विभागांवर कुठलीही कारवाई केलेली नाही.‘एमकेसीएल’सोबत करार झाल्यानंतर विद्यापीठाने परत ‘ई-सुविधा’ सुरू केली आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जासोबत ‘आॅनलाईन’ नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे. प्रवेशाची अंतिम तारीख २ सप्टेंबर ही होती. या मुदतीत विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज जमा केले. यानंतर महाविद्यालय व विभागांतील कर्मचाऱ्यांना विद्यार्थ्यांच्या अर्जांची ‘आॅनलाईन’ नोंदणी करायची होती. नियमानुसार हे काम विद्यार्थ्यांचे नसून विभाग किंवा महाविद्यालयांतील संबंधित कर्मचाऱ्यांचेच आहे. परंतु अर्ज जमा झाल्यानंतर अनेक महाविद्यालये व शैक्षणिक विभागांमध्ये विद्यार्थ्यांनाच ‘आॅनलाईन’ नोंदणी करण्यासाठी सांगण्यात येत आहे. कर्मचारी जास्त कामापासून वाचण्यासाठी विद्यार्थ्यांवर ‘आॅनलाईन’ नोंदणी करवून घेण्यासाठी दबाव टाकत आहेत. विद्यापीठाच्या काही शैक्षणिक विभागांतदेखील असेच चित्र आहे. अनेक महाविद्यालयांमध्ये तर ‘आॅनलाईन’ नोंदणीची सोयदेखील नसल्यामुळे विद्यार्थ्यांना जवळपासच्या ‘नेटकॅफे’मधून अर्ज भरावा लागत आहे. परंतु विद्यार्थ्यांच्या परिस्थितीचा फायदा उचलत ‘नेटकॅफे’ चालकांकडून अर्जामागे ५० ते १०० रुपये घेण्यात येत आहेत.(प्रतिनिधी)महाविद्यालयांना उशिरा आली जागशहरातील काही महाविद्यालयांना तर ‘आॅनलाईन’ नोंदणीसंदर्भात उशिरा जाग आली. नोंदणीला काही दिवस शिल्लक असताना विद्यार्थ्यांशी संपर्क करण्यास सुरुवात झाली. अनेक विद्यार्थ्यांना फोनच न लागल्यामुळे प्राध्यापकांची धावाधाव होत असल्याचे चित्र आहे. शिवाय महाविद्यालयांत ‘आॅनलाईन’ नोंदणीची व्यवस्था नसल्यामुळे जास्त वेळ थांबून बाहेरूनच नोंदणी करावी लागत आहे.महाविद्यालयांची भूमिका अयोग्यनियमांनुसार संबंधित महाविद्यालय व विभागांनाच ‘आॅनलाईन’ नोंदणी करायची आहे. यात विद्यार्थ्यांना भुर्दंड बसत असेल तर ही अयोग्य बाब आहे. यासंदर्भात महाविद्यालयांच्या प्रमुखांनी कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद द्यावी, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी केले.