शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

भर पावसातही आवाज केला बुलंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 22:35 IST

पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे उपजराधानीची दाणादाण झाली. सर्वत्र पाणीच पाणी असताना आपल्या मागण्यांना घेऊन शुक्रवारी दोन मोर्चे विधिमंडळावर धडकले. नागपूर पुस्तक विक्रेता कल्याणकारी संस्था व अपर वर्धा धरणग्रस्त संघर्ष समिती, अमरावतीने भर पावसातही आपल्या मागण्या रेटून धरल्या.

ठळक मुद्देविधिमंडळावर धडकले दोन मोर्चे : पुस्तक विक्रेता कल्याणकारी संस्था व अपर वर्धा धरणग्रस्त संघर्ष समिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे उपजराधानीची दाणादाण झाली. सर्वत्र पाणीच पाणी असताना आपल्या मागण्यांना घेऊन शुक्रवारी दोन मोर्चे विधिमंडळावर धडकले. नागपूर पुस्तक विक्रेता कल्याणकारी संस्था व अपर वर्धा धरणग्रस्त संघर्ष समिती, अमरावतीने भर पावसातही आपल्या मागण्या रेटून धरल्या. पावसामुळे विधिमंडळाचे कामकाज ठप्प पडले होते. मोर्चाच्या शिष्टमंडळाचे निवेदन घ्यायला कुणीच मंत्री नव्हता. यामुळे पोलिसांनी शिष्टमंडळाला सोमवारी येण्यास सांगितले.जुन्या पुस्तके विक्रेत्यांसाठी जागा द्याजुनी पुस्तके विक्रीसाठी शासनाने पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी नागपूर पुस्तक विक्रेता कल्याणकारी संस्थेने भरपावसातही विधिमंडळावर मोर्चा काढला. मोर्चात पन्नासच्यावर पुस्तक विक्रेते सहभागी झाले होते. पावसामुळे विधिमंडळाचे कामकाज ठप्प पडल्याने मोर्चाचे शिष्टमंडळ सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटून निवेदन देणार आहे.यशवंत स्टेडियम धंतोली येथून निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व नागपूर पुस्तक विक्रेता कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष नरेश वाहणे यांनी केले. मोर्चाला मॉरिस कॉलेज टी पॉर्इंट जवळ पोलिसांनी अडविले. पाऊस सुरू असतानाही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भाषणे झालीत. ‘लोकमत’शी बोलताना नरेश वाहणे म्हणाले, विद्यार्थी, पुस्तकप्रेमी यांना दुर्मिळ पुस्तके उपलब्ध करून देण्याच्या व्यवसायाचा फायदा अनेकांना झाला आहे. परंतु विकासाच्या नावाखाली मॉरिस कॉलेज टी पॉर्इंट मार्गावरील जुन्या पुस्तक विक्रेत्यांची दुकाने हटविण्यात आली. विक्रेत्यांच्या पोटापाण्याचा व्यवसाय हिरावून घेतल्याने त्याच्यावर उपासमारीची पाळी आली. शासनाने पर्यायी जागा देण्यासाठी गेल्या दोन दशकांपासून प्रयत्न सुरू आहेत, परंतु दुर्लक्ष झाले आहे. लोकप्रतिनीधी आश्वासन देऊन तोंडाल पाने पुसतात. मात्र आता हे सहन केले जाणार नाही. पर्यायी जागा उपलब्ध करून न दिल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही वाहणे यांनी दिला. मोर्चात शीतल गोडबोले, निकेश फुलझेले यांच्यासह पुस्तक विक्रेत्यांचा सहभाग होता.अमरावती येथून आला मोर्चा : धरणग्रस्तांनी मांडली आपली व्यथाअपर वर्धा धरणग्रस्तांना वाढीव जमिनीचा मोबदला देण्यात यावा व शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी देण्यात यावी, या मागणीसाठी अमरावती येथून अपर वर्धा संघर्ष समितीचा मोर्चा शुक्रवारी विधिमंडळावर धडकला. मोर्चाच्या शिष्टमंडळाने मागण्याचे निवेदन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सुपूर्द केले. महाजन यांनी निवेदन संबंधित खात्याकडे वळते करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.संघर्ष समितीचे संयोजक गजानन ठाकरे यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चात दहावर मोर्चेकरी नव्हते. परंतु पावसात भिजत हे मोर्चेकरी नारे देत टेकडी पार्इंटवर पोहचले. ‘लोकमत’शी बोलताना ठाकरे म्हणाले, ज्या शेतकऱ्यांचे पोट शेतीवर होते त्यांची शेती अपर वर्धा धरणात गेली. हाती शेतीच नसल्याने उपसमारीची पाळी आली. शासनाचे आमच्याकडे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढला, मोर्चात लोक कमी असले तरी आमची मागणी आमच्या जीवनाशी संबंधित आहे. शासनाने धरणग्रस्तांना जमिनीचा वाढीव मोबदला द्यावा, शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी देण्यात यावी किंवा २० लाख रुपये द्यावे, एवढीच आमची मागणी असल्याचे ठाकरे म्हणाले. शिष्टमंडळात मुन्नाभाई रायचुरा, शरद नागमोते आदींचा सहभाग होता.

 

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Morchaमोर्चा