शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
2
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव
3
धक्कादायक! "तो जवळ यायचा अन्...." बांगलादेश महिला क्रिकेटरचा निवडकर्त्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप
4
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
5
रिलायन्स पॉवरला मोठा झटका! बनावट बँक गॅरंटी प्रकरणी ED कडून तिसरी अटक; माजी CFO चाही समावेश
6
ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये खळबळ! फार्मा कंपनीचा अधिकारी बेशुद्ध पडला
7
ऐतिहासिक! १८० च्या स्पीडने धावली वंदे भारत स्लीपर ट्रेन; नवा रेकॉर्ड, ट्रायलचा Video व्हायरल
8
४०० कोटींची जमीन, लाखोंचे फ्लॅट; १९९३ मुंबई बॉम्बस्फोटांचा 'मास्टर माइंड' टायगर मेमनच्या संपत्तीचा लिलाव होणार!
9
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
10
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
11
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
12
अजित पवारांचे घुमजाव! काल म्हणाले, "गोष्टी कानावर आल्या होत्या"; आता म्हणतात, "अजिबात कल्पना नाही"
13
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
14
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
15
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
16
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
17
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
18
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
19
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
20
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'

'हेच भाजपवाले औरंगाबादचे संभाजीनगर कधी करता असे विचारत होते'; संजय राऊत यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2022 20:07 IST

Nagpur News हेच भाजपवाले औरंगाबादचे संभाजीनगर कधी करता असे विचारत होते. जर फडणवीस आणि शिंदे गटाच्या सरकारने या निर्णयांना स्थगिती दिली असेल तर यांच्यासारखे ढोंगी लोक नाहीत, अशी टीका राऊत यांनी केली.

ठळक मुद्देस्थगिती दिली असेल तर यांच्यासारखे ढोंगी नाहीत

नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजप सरकारने औरंगाबाद शहराचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव नामांतराच्या निर्णयालाही स्थगिती दिल्याचे सांगितले जात आहे. यावरून शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघाती टीका केली.

हेच भाजपवाले औरंगाबादचे संभाजीनगर कधी करता असे विचारत होते. जर फडणवीस आणि शिंदे गटाच्या सरकारने या निर्णयांना स्थगिती दिली असेल तर यांच्यासारखे ढोंगी लोक नाहीत, अशी टीका राऊत यांनी केली. गेली दोन दिवस राऊत हे नागपूर दौऱ्यावर असून, येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहे.

शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या पाच निर्णयांना स्थगिती दिली असल्याची मला माहिती मिळाली. उद्धव ठाकरे यांच्याशी माझी याबाबत चर्चा झाली. ठाकरे सरकारने आणि खासकरून उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादला संभाजीनगर, उस्मानाबादला धाराशीव आणि नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासंबंधी घेतलेले निर्णय रद्द केले असल्याचे खरे असेल तर हे सरकार हिंदुत्वद्रोही आणि महाराष्ट्रद्रोही आहे.

उद्धव ठाकरेंनी केंद्राची तसेच कोणाचीही पर्वा न करता हिमतीने एका हिंदुत्ववादी भूमिकेतून लोकभावनेचा आदर करत नामांतराचा निर्णय घेतला होता. हे निर्णय बदलून काय साध्य केले हे फडणवीस यांना विचारायला हवे, मुख्यमंत्री शिंदेंना विचारा म्हणणार नाही. कारण त्यांच्या हातात काहीही नाही. एका बाजूला तुम्ही शिवसेनेने हिंदुत्व सोडले असा आक्रोश करता, तर दुसऱ्या बाजूला हा निर्णय बदलला. आता औरंगजेब तुमचा कसा काय नातेवाईक झालाय? हा उस्मान कोण लागतोय तुमचा? हे सरकार गोंधळलेय, या सरकारवर सर्वोच्च न्यायालयाची टांगती तलवार आहे त्यामुळे त्यांचा मेंदू बधिर झालाय असा घणाघात त्यांनी केला.

संसदेत आता तोंडावर चिकटपट्ट्या बांधून जावे लागणार

- संसदेत नियम आणलाय की काही शब्द वापरायचे नाही. स्वत:चे डाग पुसण्यासाठी हे केले आहे. संसदेत यापुढे काहीच करता येणार नाही. हातपाय बांधून तोंडावर चिकटपट्ट्या बांधून आम्हाला जावे लागणार आहे. या देशात आणीबाणीपेक्षा जास्त भयानक स्थिती आहे. आणीबाणीत सहभागी असलेल्यांना पेन्शन देण्याचा निर्णय कशाला घेतला. आम्ही आणीबाणी विरोधात लढतोय. त्यामुळे सर्व महाराष्ट्राला पेन्शन द्यावी लागेल, असा चिमटाही त्यांनी घेतला.

मुख्यमंत्री शिंदेंना टोला

- चिठ्ठ्या देतात, माईक खेचतात, शर्ट खेचतात बऱ्याच गंमती-जमती राज्यात पहायला मिळत आहेत. यावर मी काय बोलणार. खरे मुख्यमंत्री काय बोलणार, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊत