शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

'हेच भाजपवाले औरंगाबादचे संभाजीनगर कधी करता असे विचारत होते'; संजय राऊत यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2022 20:07 IST

Nagpur News हेच भाजपवाले औरंगाबादचे संभाजीनगर कधी करता असे विचारत होते. जर फडणवीस आणि शिंदे गटाच्या सरकारने या निर्णयांना स्थगिती दिली असेल तर यांच्यासारखे ढोंगी लोक नाहीत, अशी टीका राऊत यांनी केली.

ठळक मुद्देस्थगिती दिली असेल तर यांच्यासारखे ढोंगी नाहीत

नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजप सरकारने औरंगाबाद शहराचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव नामांतराच्या निर्णयालाही स्थगिती दिल्याचे सांगितले जात आहे. यावरून शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघाती टीका केली.

हेच भाजपवाले औरंगाबादचे संभाजीनगर कधी करता असे विचारत होते. जर फडणवीस आणि शिंदे गटाच्या सरकारने या निर्णयांना स्थगिती दिली असेल तर यांच्यासारखे ढोंगी लोक नाहीत, अशी टीका राऊत यांनी केली. गेली दोन दिवस राऊत हे नागपूर दौऱ्यावर असून, येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहे.

शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या पाच निर्णयांना स्थगिती दिली असल्याची मला माहिती मिळाली. उद्धव ठाकरे यांच्याशी माझी याबाबत चर्चा झाली. ठाकरे सरकारने आणि खासकरून उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादला संभाजीनगर, उस्मानाबादला धाराशीव आणि नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासंबंधी घेतलेले निर्णय रद्द केले असल्याचे खरे असेल तर हे सरकार हिंदुत्वद्रोही आणि महाराष्ट्रद्रोही आहे.

उद्धव ठाकरेंनी केंद्राची तसेच कोणाचीही पर्वा न करता हिमतीने एका हिंदुत्ववादी भूमिकेतून लोकभावनेचा आदर करत नामांतराचा निर्णय घेतला होता. हे निर्णय बदलून काय साध्य केले हे फडणवीस यांना विचारायला हवे, मुख्यमंत्री शिंदेंना विचारा म्हणणार नाही. कारण त्यांच्या हातात काहीही नाही. एका बाजूला तुम्ही शिवसेनेने हिंदुत्व सोडले असा आक्रोश करता, तर दुसऱ्या बाजूला हा निर्णय बदलला. आता औरंगजेब तुमचा कसा काय नातेवाईक झालाय? हा उस्मान कोण लागतोय तुमचा? हे सरकार गोंधळलेय, या सरकारवर सर्वोच्च न्यायालयाची टांगती तलवार आहे त्यामुळे त्यांचा मेंदू बधिर झालाय असा घणाघात त्यांनी केला.

संसदेत आता तोंडावर चिकटपट्ट्या बांधून जावे लागणार

- संसदेत नियम आणलाय की काही शब्द वापरायचे नाही. स्वत:चे डाग पुसण्यासाठी हे केले आहे. संसदेत यापुढे काहीच करता येणार नाही. हातपाय बांधून तोंडावर चिकटपट्ट्या बांधून आम्हाला जावे लागणार आहे. या देशात आणीबाणीपेक्षा जास्त भयानक स्थिती आहे. आणीबाणीत सहभागी असलेल्यांना पेन्शन देण्याचा निर्णय कशाला घेतला. आम्ही आणीबाणी विरोधात लढतोय. त्यामुळे सर्व महाराष्ट्राला पेन्शन द्यावी लागेल, असा चिमटाही त्यांनी घेतला.

मुख्यमंत्री शिंदेंना टोला

- चिठ्ठ्या देतात, माईक खेचतात, शर्ट खेचतात बऱ्याच गंमती-जमती राज्यात पहायला मिळत आहेत. यावर मी काय बोलणार. खरे मुख्यमंत्री काय बोलणार, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊत