शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

पोलीस ठाण्यात तृतीयपंथीयांचा गोंधळ

By admin | Updated: February 26, 2016 03:13 IST

आपली कागदपत्रे परत मिळावी म्हणून तृतीयपंथीयांनी चक्क पोलीस ठाण्यात विवस्त्रावस्थेत गोंधळ घातला.

अश्लील वर्तन : हतबल पोलिसांनी घातली समजूतनागपूर : आपली कागदपत्रे परत मिळावी म्हणून तृतीयपंथीयांनी चक्क पोलीस ठाण्यात विवस्त्रावस्थेत गोंधळ घातला. अत्यंत बीभत्स असा हा प्रकार व्हॉटस्अपवरून व्हायरल झाल्याने समाजमन अस्वस्थ झाले आहे.१९ फेब्रुवारी २०१६ च्या दुपारी १.३० ते २ या वेळेतील हा संतापजनक प्रकार आहे. नंदनवन पोलीस ठाण्यात दैनंदिन कामकाज सुरू असताना अचानक १५ ते २० तृतीयपंथी पोलीस ठाण्यात शिरले. ‘उत्तमबाबा’ याने आमचे आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि अशीच महत्त्वपूर्ण कागदपत्रे घेतली. ती तो परत करीत नाही. त्यामुळे आमची कागदपत्रे परत मिळवून द्या, अशी तृतीयपंथीय मागणी करू लागले. ‘प्रकरण पाचपावलीतील आहे, त्यामुळे आम्ही यात काही करू शकत नाही’, असे तेथील एका नवीन पोलीस उपनिरीक्षकाने त्यांना सांगितले. ‘तुम्ही पाचपावलीच्या ठाण्यात जा, तुम्हाला तेथे पाहिजे ती मदत मिळेल’, असेही उपनिरीक्षकाने सांगितले. मात्र, तृतीयपंथीय ऐकायला तयार नव्हते. त्यांनी पोलिसांना शिव्याशाप देणे सुरू केले. अचानक एकापाठोपाठ पाच ते सात तृतीयपंथीयांनी अंगावरचे कपडे फेकून विवस्त्रावस्थेत ठाण्यात गोंधळ घालून पोलिसांना शिवीगाळ सुरू केली. या घाणेरड्या प्रकारामुळे पोलीस हादरले. ठाण्यातील कामाच्या निमित्ताने उपस्थित तर अचंबितच झाले. त्यांना कसे आवरावे, असा प्रश्न पडल्याने काही जण चक्क पोलीस कर्मचारी ठाण्याच्या बाहेर पळाले. तृतीयपंथीयांना त्यामुळे जास्तच चेव चढला. त्यांनी ठाण्याच्या आवारात आक्षेपार्ह्य वर्तन करीत अक्षरश: हैदोस घातला. शेवटी सयाम नामक पोलीस उपनिरीक्षकाने आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांना कसेबसे आवरत पाचपावली ठाण्यात नेले. तेथे नंतर तृतीयपंथीयांचा प्रमुख उत्तमबाबा याला बोलावून कागदपत्रांविषयी विचारणा करण्यात आली. (प्रतिनिधी)सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया तृतीयपंथीयांच्या या संतापजनक वर्तनाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. शिव्या, शाप नको म्हणून समाज तृतीयपंथीयांच्या वर्तनाकडे दुर्लक्ष करतात. ते मागतील तेवढे पैसे देऊन त्यांना परत पाठवितात. मात्र, त्याचा काही तृतीयपंथी गैरफायदा घेतात. ते अनेक ठिकाणी गुन्हेगारांसारखे वागतात. मनासारखे पैसे मिळावे म्हणून लग्नसमारंभ, अथवा दुसऱ्या कोणत्या समारंभात गोंधळ घालतात, अश्लील वर्तन करतात. विशेष म्हणजे, नंदनवन ठाण्यात त्यांनी असाच गोंधळ घालून पोलिसांनी त्यांच्यावर कसलीही कारवाई केली नसल्यामुळे सर्वसामान्यांच्या संतापात आणखीनच भर पडली आहे. यामुळे ही मंडळी जास्त निर्ढावेल, अशी प्रतिक्रियाही अनेक जण व्यक्त करीत आहेत.