शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

१६ वर्षांतील तिसरा महाघोटाळा

By admin | Updated: February 5, 2016 02:41 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे संचालित करण्यात येणाऱ्या डॉ. शेषराव वानखेडे ‘बीएड’ ....

‘बीएड’ महाविद्यालयाचा वादग्रस्त इतिहास : शिक्षणापेक्षा राजकारणच अधिकनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे संचालित करण्यात येणाऱ्या डॉ. शेषराव वानखेडे ‘बीएड’ महाविद्यालयाचा ४२ ते ४५ लाखांचा घोटाळा समोर आल्यानंतर परत वादात सापडले आहे. या महाविद्यालयाला घोटाळ्यांचा इतिहासच लाभला आहे. गेल्या १२ वर्षांत येथे ३ मोठे घोटाळे झाले आहेत, हे विशेष. या नव्या घोटाळ्यात केवळ दोन लिपिकांवर दोषारोप करण्यात येत आहेत. परंतु मागील प्रकरणे पाहता तत्कालीन ज्येष्ठ अधिकारी तसेच विभागप्रमुखांवर काय कारवाई होणार किंवा त्यांची कशाप्रकारे चौकशी होणार, हे प्रश्न कायम आहेत. महाविद्यालय चर्चेत आले होते ते शिष्यवृत्ती घोटाळ्यामुळे. १९९५ ते २००० या कालावधीत महाविद्यालयात ‘ईबीसी’ आणि ‘पीटीसी’च्या शिष्यवृत्तीत १७ लाख ३० हजार ४८० रुपयांची अतिरिक्त रक्कम वाटण्यात आली होती. परंतु या रकमेचा उल्लेख विद्यापीठाच्या लेखा परीक्षकाने कुठेही केला नाही. सुरुवातीला लिपिकावर दोषारोप करण्यात आले होते. परंतु त्यानंतर सुनील मिश्रा यांनी या प्रकरणात याचिका दाखल केली होती. विद्यापीठ तसेच पोलिसांनी या प्रकरणात गंभीर भूमिका न घेतल्याचा ठपका ठेवत, उच्च न्यायालयाने हे प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपविण्याचे निर्देश दिले होते.दरम्यान, विद्यापीठाच्या चौकशी समितीने कुठलाही गैरव्यवहार न झाल्याचा दावा केला होता. परंतु माजी जिल्हा व सत्र न्यायाधीश एल.जी.देशपांडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीचे निरीक्षण अगोदरच्या समितीपेक्षा वेगळे होते. अखेर अंबाझरी पोलिसांनी घोटाळ्याच्या कालावधीत पदावर असलेले कुलगुरू डॉ.अरुण सातपुतळे, विभागप्रमुख हिरा अहेर यांच्यासह चौघांवर गुन्हे दाखल केले होते.यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.वंदना मानापुरे यांच्यावर ६८ लाख रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांचे प्रकरण गाजले. वार्षिकांकाच्या १० प्रती छापून आलेला तीन हजारांचा खर्च ६० ते ६२हजार दाखविणे, ‘अ‍ॅन्टी व्हायरसह्णच्या नावावर ६८ हजारांचे बिल काढून केवळ एकाच संगणकात ‘अ‍ॅन्टी व्हायरस’ टाकणे, जास्तीचे पैसे देऊन ‘इन्व्हर्टरह्ण घेतल्यावरही तो सुरू न करणे, जुनाच ‘वॉटर कूलर’ लावणे, याशिवाय कॅशबुक, स्टॉक रजिस्टर व इतर कागदपत्रे अपडेट न ठेवल्याची बाब समोर आली होती. शिवाय वेतन अनुदानाच्या ६४ लाख रुपयांच्या निधीचा लेखाजोखा त्या सादर करू शकल्या नव्हत्या व त्यामुळे शिक्षकांचे वेतन उच्च विभागाच्या सहसंचालकांनी थांबवून ठेवले होते. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी तत्कालीन कुलसचिवांनी डॉ. वंदना मानापुरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावीत निलंबित केले. (प्रतिनिधी)