शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

जातीविरहित समाजाचा विचार करा : सुशीलकुमार शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 23:18 IST

जातीपातीमुळे समाज विखुरला जाऊन विचार संकुचित होत आहेत. जे हाताच्या रेषेवर अवलंबून आहेत, ते जीवनात काहीही करू शकत नाही. तरुणांनो मूठ उघडा, स्वत:चे आयुष्य स्वत:च घडवा. त्याकरिता कष्ट आणि धडपड करण्याची तयारी ठेवा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना जातीविहरित समाजाचा केलेल्या विचारांचा अवलंब तरुणांना करण्याचे आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी येथे केले.

ठळक मुद्देमारवाडी फाऊंडेशनतर्फे पुरस्कार वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जातीपातीमुळे समाज विखुरला जाऊन विचार संकुचित होत आहेत. जे हाताच्या रेषेवर अवलंबून आहेत, ते जीवनात काहीही करू शकत नाही. तरुणांनो मूठ उघडा, स्वत:चे आयुष्य स्वत:च घडवा. त्याकरिता कष्ट आणि धडपड करण्याची तयारी ठेवा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना जातीविहरित समाजाचा केलेल्या विचारांचा अवलंब तरुणांना करण्याचे आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी येथे केले.मारवाडी फाऊंडेशनच्यावतीने वर्ष २००८ पासून देण्यात येणारा यंदाचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार शिक्षणतज्ज्ञ आणि यूजीसीचे माजी चेअरमन डॉ. सुखदेव थोरात यांना देण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात करण्यात आले. या प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी डॉ. जोगेंद्र कवाडे, पुरस्काराचे मानकरी यूजीसीचे माजी चेअरमन डॉ. सुखदेव थोरात, नागपूर विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, मारवाडी फाऊंडेशनचे गिरीश गांधी, अतुल कोटेचा, महेश पुरोहित, विजय मुरारका, गोविंद अग्रवाल, डी.आर. मल, सुधीर बाहेती उपस्थित होते.शिंदे म्हणाले, मारवाडी समाज दिलदार असून फाऊंडेशनने बाबासाहेबांच्या नावाने सुरू केलेला पुरस्कार देशात एकमेव आहे. ते म्हणाले, देशात बाबासाहेबांचा विचार गाडून टाकण्याचे काम करीत आहे. हिंदुत्ववाद, दलितवाद आणि अल्पसंख्याक वादावर भूमिका मांडण्याचे काम देशात सुरू आहे. त्यामुळे तरुणांना आता स्वतंत्र विचारसरणीची गरज आहे. आर्थिक आणि शैक्षणिक समतेची जाण असलेले थोरात यांना हा पुरस्कार देऊन फाऊंडेशनने मोठे काम केले आहे. समाजाचे विचार कसे बदलेल, हा उपदेश तरुणांनी थोरात यांच्याकडून घ्यावा, असे त्यांनी सांगितले.जोगेंद्र कवाडे म्हणाले, देशात संतांनाही जातीच्या कोंडवाड्यात टाकण्याचे काम होत आहे. हे दुर्दैव आहे. हे सर्व कोंडवाडे तोडण्याचे काम मारवाडी फाऊंडेशन करीत आहे.निंबाळकर म्हणाले, सामाजिक एकता निर्माण करणाऱ्या उल्लेखनीय कार्यासाठी थोरात यांची पुरस्कारासाठी केलेली निवड योग्य आहे. समाजात बाबासाहेबांचे विचार रुजविण्याची गरज आहे. देशातील सर्व देवस्थानातील संपत्ती गावांच्या विकासासाठी खर्च करावी. सामाजिक बंधनातून जाती सोडविल्या पाहिजे. शेतकरी गरीब असून त्यांच्या उत्थानासाठी देशात आर्थिक कृषी क्रांती व्हावी, असे त्यांनी ठासून सांगितले.सत्काराला उत्तर देताना थोरात म्हणाले, सत्ता हातात असताना राजकारण आणि अर्थकारणाचे निर्णय घेणे सोपे असते. पण समाज सुधारणेचे काम कठीण आहे. हे कार्य फार कमी लोक करतात. अस्पृशतेचा कायदा आहे, पण तो दिसत नाही. आपण नेहमीच धोरणावर भर दिला. शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती सुधारल्यास जाती व्यवस्था सुधारते. मारवाडी फाऊंडेशन सामाजिक परिवर्तनाचे कार्य खरोखरंच प्रशंसनीय आहे.प्रास्तविक करताना गांधी म्हणाले, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्यांचे मूल्य जपताना फाऊंडेशन समाजाला जोडून राष्ट्रीय एकात्मतेचे काम करीत आहे. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेबांची विभागणी जातीच्या आधारावर करू नये.संचालन ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी यांनी तर सुधीर बाहेती यांनी आभार मानले.कार्यक्रमात विमल थोरात, विजय जावंघिया, डॉ. पूरण मेश्राम, अनंत घारड, सत्यनारायण नुवाल, प्रवीण तापडिया, रमेश रांदड, सुरेश राठी, रमेश बोरकुटे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

टॅग्स :Sushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेnagpurनागपूर