शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

त्यांना मिळाले हक्काचे घर!

By admin | Updated: January 5, 2015 00:51 IST

माणसांप्रमाणे प्राण्यांनाही सुरक्षित जीवन जगण्याचा अधिकार आहे, अशी भावना बाळगून कार्य करणाऱ्या संस्थांच्या वतीने रविवारी महाराजबाग येथे गावठी कुत्र्यांच्या पिल्लांना दत्तक देण्याचा

२८ गावठी पिल्ले दत्तक : पीपल फॉर अ‍ॅनिमल संस्थेचा उपक्रमनागपूर : माणसांप्रमाणे प्राण्यांनाही सुरक्षित जीवन जगण्याचा अधिकार आहे, अशी भावना बाळगून कार्य करणाऱ्या संस्थांच्या वतीने रविवारी महाराजबाग येथे गावठी कुत्र्यांच्या पिल्लांना दत्तक देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. यातून २८ पिल्लांना हक्काचे घर मिळाले. पीपल फॉर अ‍ॅनिमल, दि लॉयल्स व इनरव्हील क्लब पूर्व नागपूर या तीन संस्थांनी संयुक्तपणे हा उपक्रम राबविला.काळजी घेणारा कोणीच राहात नसल्यामुळे बेवारस गावठी कुत्र्यांना अत्यंत हलाखीत जगावे लागते. त्यांना पोटभर खायला मिळत नाही. कोणाच्या घरी गेल्यास अत्यंत निर्दयीपणे हाकलून लावले जाते. जिकडे जावे तिकडे उपेक्षा सहन करावी लागते. वाहनचालक कुत्र्यांच्या जीवाला काहीच किंमत नसल्यासारखे वागतात. रस्त्यावर आलेल्या कुत्र्यांना धडक मारून निघून जातात. जखमी कुत्र्यांकडे कोणीच लक्ष देत नाही. त्यांचा वेदनादायक मृत्यू होतो. सध्या प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी झटणाऱ्या संस्था व त्याअंतर्गत कार्य कारणारे पशुप्रेमी हेच बेवारस कुत्र्यांचा आधार आहेत. त्यांच्या प्रयत्नामुळे जनावरांच्या हक्काबाबत समाज हळूहळू जागृत होत आहे. कुत्र्यांच्या दत्तक उपक्रमाला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादातून हे सिद्ध होत आहे.विदेशीपेक्षा गावठी ‘बेस्ट’आजकाल सर्वत्र विदेशी कुत्री पाळण्याचे चलन आहे. लाखो रुपये खर्च करून विदेशी कुत्री खरेदी केली जातात. यानंतर त्यांच्या पालनपोषणावरही पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो. या कुत्र्यांना भारतातील वातावरण भावत नाही. त्यांना वातानुकूलित खोलीत ठेवावे लागते. सकस आहार द्यावा लागतो. एवढे करूनही विदेशी कुत्र्यांचे आयुष्यमान फार कमी आहे. गावठी कुत्री मोठ्या संख्येत उपलब्ध असताना व खरेदी करावी लागत नसतानाही त्यांना पाळले जात नाही. ग्रामीणपेक्षा शहरी भागात गावठी कुत्री पाळण्याचे प्रमाण फारच कमी आहे. गावठी कुत्रीही दिसायला गोंडस व आक्रमक असतात. त्यांना पाळण्यासाठी फार खर्च करावा लागत नाही. त्यांना स्थानिक वातावरणाची सवय झालेली असते. त्यांचे आयुष्यमान विदेशी कुत्र्यांपेक्षा जास्त असते. गावठी कुत्री पाळल्यास बेवारस कुत्र्यांची समस्या आपोआप सुटेल, अशी माहिती आयोजकांतर्फे देण्यात आली.किटू गिडवानींच्या हस्ते दत्तकप्राण्यांच्या संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या टीव्ही मालिका व चित्रपट अभिनेत्री किटू गिडवानी यांच्या हस्ते गावठी कुत्र्यांच्या पिल्लांना दत्तक देण्यात आले. याप्रसंगी त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना प्राण्यांनाही चांगले जीवन जगण्याचा हक्क असल्याचे सांगितले. माणसाप्रमाणे प्राण्यांनाही देवानेच जन्माला घातले आहे. या पृथ्वीवर जगण्याचा आपला जेवढा अधिकार आहे, तेवढाच प्राण्यांचाही आहे. एक बुद्धिजीवी म्हणून प्राण्यांचे संरक्षण करणे, त्यांना खायला देणे व त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे माणसाची जबाबदारी आहे. विशेषत: तरुणांनी या कार्यासाठी स्वत:ला वाहून घेतले पाहिजे, असे मत गिडवानी यांनी व्यक्त केले.दरवर्षी राबविला जातो उपक्रमगावठी कुत्र्यांच्या पिल्लांना दत्तक देण्याचा उपक्रम गेल्या पाच वर्षांपासून राबविण्यात येत आहे, अशी माहिती पीपल फॉर अ‍ॅनिमलच्या नागपूर शाखा सचिव करिष्मा गलानी यांनी दिली. महानगरपालिकेतर्फे भांडेवाडी येथे बेवारस जनावरांसाठी निवासालय सुरू करण्यात आले आहे. निवासालयाचे संचालन व देखभालीची जबाबदारी पीपल फॉर अ‍ॅनिमल संस्थेवर आहे. येथून दरवर्षी १०० ते १५० गावठी कुत्र्यांच्या पिल्लांना दत्तक घेतले जाते. येथील जनावरांच्या देखभालीसाठी दर महिन्याला सुमारे ६० हजार रुपये खर्च येतो. यापैकी ७५ टक्के खर्च संस्थेच्या संस्थापक आणि महिला व बाल कल्याण मंत्री मनेका गांधी करतात. विनोद घाटे हे रोज १० लिटर दूध नि:शुल्क देतात. (प्रतिनिधी)जखमी जनावरांच्या माहितीसाठी हेल्पलाईनपीपल फॉर अ‍ॅनिमल संस्थेतर्फे जखमी जनावरांची माहिती देण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. ९९२१५४६८६३ हा हेल्पलाईनचा मोबाईल क्रमांक आहे. या क्रमांकावर शहरात कोठेही जखमी अवस्थेत आढळलेल्या जनावरांची माहिती देता येईल. संस्थेकडे जखमी जनावरांना रुग्णालयापर्यंत नेण्यासाठी वाहन (अ‍ॅम्बुलन्स) आहे. जनावरांच्या संरक्षणासाठी करिष्मा गलानी यांच्यासह आकाश वलेजा, रोहित यादव, पुष्पेंद्र यादव, अंजली वेदयार, आशा दवे, श्रीकांत अंबर्ते, स्वप्नील बोधाने, हनी ठक्कर, कमल कृपलानी, स्मिता राहाटे आदी कार्यरत आहेत.