शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

‘ते’ अतिरिक्त पैसे मिळविण्यासाठी मागतात भिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 17:44 IST

लॉकडाऊन शिथिल होताच ते पुन्हा सक्रिय झाले आहेत. हे भिक्षेकरी भटक्या समाजातील असून ते अमरावती, धामणगाव, चंद्रपूर, अकोला, कन्हान इत्यादी शहरातून नागपुरात येतात. कन्हान येथील कुटुंबे कामठी रोडवरील चौकांमध्ये तर, अमरावती, धामणगाव, अकोला, चंद्रपूर येथील कुटुंबे अमरावती रोड, वर्धा रोड, मानेवाडा इत्यादी भागात भिक्षा मागतात, असे चौकशीत आढळून आले.

लोकमत न्यूज नेटवर्क सैयद मोबीननागपूर : लॉकडाऊनमध्ये देण्यात आलेल्या शिथिलतेमुळे शहरातील भिक्षेकरी पुन्हा सक्रिय झाले आहेत. महिला व बालके चौकाचौकात भिक्षा मागताना दृष्टीस पडत आहेत. सक्तीच्या लॉकडाऊनमध्ये ते अदृश्य झाले होते. त्यामुळे ‘लोकमत’ने याविषयी अधिक चौकशी केली असता, ते इतरही कामे करीत असल्याची व भिक्षा मागणे हा त्यांचा अतिरिक्त पैसा मिळविण्याचा मार्ग असल्याची माहिती मिळाली.सक्तीच्या लॉकडाऊनमध्ये शहर बंद होते. नागरिकांचे बाहेर जाणे-येणे अत्यंत कमी होते. त्यामुळे शहरातील भिक्षेकरी पोट भरण्यासाठी अन्य कामे करीत होते. परंतु, लॉकडाऊन शिथिल होताच ते पुन्हा सक्रिय झाले आहेत. हे भिक्षेकरी भटक्या समाजातील असून ते अमरावती, धामणगाव, चंद्रपूर, अकोला, कन्हान इत्यादी शहरातून नागपुरात येतात. कन्हान येथील कुटुंबे कामठी रोडवरील चौकांमध्ये तर, अमरावती, धामणगाव, अकोला, चंद्रपूर येथील कुटुंबे अमरावती रोड, वर्धा रोड, मानेवाडा इत्यादी भागात भिक्षा मागतात, असे चौकशीत आढळून आले.ही आहेत राहण्याची ठिकाणेशहरातील भिक्षेकरी यशवंत स्टेडियम, संत्रा मार्के ट व रामझुल्याजवळ राहतात. संत्रा मार्केटमधील कुटुंबे ट्रकमधील माल रिकामा करण्याचे काम करतात. त्यातून मिळणाऱ्या पैशातून त्यांची उपजीविका चालते. परंतु, अतिरिक्त पैसे मिळविण्यासाठी महिला व मुले भिक्षा मागतात.भावनेचा फायदा घेतातहे भिक्षेकरी पैसे मिळविण्यासाठी नागरिकांच्या भावनेचा फायदा घेतात. तान्ह्या बाळांना नशा देऊन बेशुद्ध केले जाते. त्यामुळे ते बाळ कोणतीही हालचाल करीत नाही. नागरिक त्यांच्यावर दया दाखवून पैसे देतात.कडक कारवाई होत नाहीया भिक्षेकऱ्यांवर कडक कारवाई होत नाही. पोलीस आणि महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी त्यांना समजावून सोडून देतात. त्याचा भिक्षेकºयांवर काहीच परिणाम होत नाही. ते पुन्हा भिक्षा मागणे सुरू करतात. यासंदर्भात ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.चोरीच्या मुलांचा उपयोगअनेकदा भिक्षा मागण्यासाठी चोरीच्या मुलांचा उपयोग केला जातो. काही दिवसापूर्वी एका महिलेने अकोला येथून मुलाला चोरले होते. त्यानंतर लॉकडाऊनमुळे ती महिला मुलाला रामझुल्याखाली सोडून निघून गेली होती. महिला व बालकल्याण विभागाने त्या मुलाला त्याच्या पालकापर्यंत पोहचवले होते.

 

 

ते अतिरिक्त पैसे मिळविण्यासाठी मागतात भिक्षासैयद मोबीननागपूर : लॉकडाऊनमध्ये देण्यात आलेल्या शिथिलतेमुळे शहरातील भिक्षेकरी पुन्हा सक्रिय झाले आहेत. महिला व बालके चौकाचौकात भिक्षा मागताना दृष्टीस पडत आहेत. सक्तीच्या लॉकडाऊनमध्ये ते अदृश्य झाले होते. त्यामुळे ‘लोकमत’ने याविषयी अधिक चौकशी केली असता, ते इतरही कामे करीत असल्याची व भिक्षा मागणे हा त्यांचा अतिरिक्त पैसा मिळविण्याचा मार्ग असल्याची माहिती मिळाली.सक्तीच्या लॉकडाऊनमध्ये शहर बंद होते. नागरिकांचे बाहेर जाणे-येणे अत्यंत कमी होते. त्यामुळे शहरातील भिक्षेकरी पोट भरण्यासाठी अन्य कामे करीत होते. परंतु, लॉकडाऊन शिथिल होताच ते पुन्हा सक्रिय झाले आहेत. हे भिक्षेकरी भटक्या समाजातील असून ते अमरावती, धामणगाव, चंद्रपूर, अकोला, कन्हान इत्यादी शहरातून नागपुरात येतात. कन्हान येथील कुटुंबे कामठी रोडवरील चौकांमध्ये तर, अमरावती, धामणगाव, अकोला, चंद्रपूर येथील कुटुंबे अमरावती रोड, वर्धा रोड, मानेवाडा इत्यादी भागात भिक्षा मागतात, असे चौकशीत आढळून आले.ही आहेत राहण्याची ठिकाणेशहरातील भिक्षेकरी यशवंत स्टेडियम, संत्रा मार्के ट व रामझुल्याजवळ राहतात. संत्रा मार्केटमधील कुटुंबे ट्रकमधील माल रिकामा करण्याचे काम करतात. त्यातून मिळणाऱ्या पैशातून त्यांची उपजीविका चालते. परंतु, अतिरिक्त पैसे मिळविण्यासाठी महिला व मुले भिक्षा मागतात.भावनेचा फायदा घेतातहे भिक्षेकरी पैसे मिळविण्यासाठी नागरिकांच्या भावनेचा फायदा घेतात. तान्ह्या बाळांना नशा देऊन बेशुद्ध केले जाते. त्यामुळे ते बाळ कोणतीही हालचाल करीत नाही. नागरिक त्यांच्यावर दया दाखवून पैसे देतात.कडक कारवाई होत नाहीया भिक्षेकऱ्यांवर कडक कारवाई होत नाही. पोलीस आणि महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी त्यांना समजावून सोडून देतात. त्याचा भिक्षेकºयांवर काहीच परिणाम होत नाही. ते पुन्हा भिक्षा मागणे सुरू करतात. यासंदर्भात ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.चोरीच्या मुलांचा उपयोगअनेकदा भिक्षा मागण्यासाठी चोरीच्या मुलांचा उपयोग केला जातो. काही दिवसापूर्वी एका महिलेने अकोला येथून मुलाला चोरले होते. त्यानंतर लॉकडाऊनमुळे ती महिला मुलाला रामझुल्याखाली सोडून निघून गेली होती. महिला व बालकल्याण विभागाने त्या मुलाला त्याच्या पालकापर्यंत पोहचवले होते.

 

टॅग्स :Beggarभिकारी