शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

‘ते’ अतिरिक्त पैसे मिळविण्यासाठी मागतात भिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 17:44 IST

लॉकडाऊन शिथिल होताच ते पुन्हा सक्रिय झाले आहेत. हे भिक्षेकरी भटक्या समाजातील असून ते अमरावती, धामणगाव, चंद्रपूर, अकोला, कन्हान इत्यादी शहरातून नागपुरात येतात. कन्हान येथील कुटुंबे कामठी रोडवरील चौकांमध्ये तर, अमरावती, धामणगाव, अकोला, चंद्रपूर येथील कुटुंबे अमरावती रोड, वर्धा रोड, मानेवाडा इत्यादी भागात भिक्षा मागतात, असे चौकशीत आढळून आले.

लोकमत न्यूज नेटवर्क सैयद मोबीननागपूर : लॉकडाऊनमध्ये देण्यात आलेल्या शिथिलतेमुळे शहरातील भिक्षेकरी पुन्हा सक्रिय झाले आहेत. महिला व बालके चौकाचौकात भिक्षा मागताना दृष्टीस पडत आहेत. सक्तीच्या लॉकडाऊनमध्ये ते अदृश्य झाले होते. त्यामुळे ‘लोकमत’ने याविषयी अधिक चौकशी केली असता, ते इतरही कामे करीत असल्याची व भिक्षा मागणे हा त्यांचा अतिरिक्त पैसा मिळविण्याचा मार्ग असल्याची माहिती मिळाली.सक्तीच्या लॉकडाऊनमध्ये शहर बंद होते. नागरिकांचे बाहेर जाणे-येणे अत्यंत कमी होते. त्यामुळे शहरातील भिक्षेकरी पोट भरण्यासाठी अन्य कामे करीत होते. परंतु, लॉकडाऊन शिथिल होताच ते पुन्हा सक्रिय झाले आहेत. हे भिक्षेकरी भटक्या समाजातील असून ते अमरावती, धामणगाव, चंद्रपूर, अकोला, कन्हान इत्यादी शहरातून नागपुरात येतात. कन्हान येथील कुटुंबे कामठी रोडवरील चौकांमध्ये तर, अमरावती, धामणगाव, अकोला, चंद्रपूर येथील कुटुंबे अमरावती रोड, वर्धा रोड, मानेवाडा इत्यादी भागात भिक्षा मागतात, असे चौकशीत आढळून आले.ही आहेत राहण्याची ठिकाणेशहरातील भिक्षेकरी यशवंत स्टेडियम, संत्रा मार्के ट व रामझुल्याजवळ राहतात. संत्रा मार्केटमधील कुटुंबे ट्रकमधील माल रिकामा करण्याचे काम करतात. त्यातून मिळणाऱ्या पैशातून त्यांची उपजीविका चालते. परंतु, अतिरिक्त पैसे मिळविण्यासाठी महिला व मुले भिक्षा मागतात.भावनेचा फायदा घेतातहे भिक्षेकरी पैसे मिळविण्यासाठी नागरिकांच्या भावनेचा फायदा घेतात. तान्ह्या बाळांना नशा देऊन बेशुद्ध केले जाते. त्यामुळे ते बाळ कोणतीही हालचाल करीत नाही. नागरिक त्यांच्यावर दया दाखवून पैसे देतात.कडक कारवाई होत नाहीया भिक्षेकऱ्यांवर कडक कारवाई होत नाही. पोलीस आणि महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी त्यांना समजावून सोडून देतात. त्याचा भिक्षेकºयांवर काहीच परिणाम होत नाही. ते पुन्हा भिक्षा मागणे सुरू करतात. यासंदर्भात ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.चोरीच्या मुलांचा उपयोगअनेकदा भिक्षा मागण्यासाठी चोरीच्या मुलांचा उपयोग केला जातो. काही दिवसापूर्वी एका महिलेने अकोला येथून मुलाला चोरले होते. त्यानंतर लॉकडाऊनमुळे ती महिला मुलाला रामझुल्याखाली सोडून निघून गेली होती. महिला व बालकल्याण विभागाने त्या मुलाला त्याच्या पालकापर्यंत पोहचवले होते.

 

 

ते अतिरिक्त पैसे मिळविण्यासाठी मागतात भिक्षासैयद मोबीननागपूर : लॉकडाऊनमध्ये देण्यात आलेल्या शिथिलतेमुळे शहरातील भिक्षेकरी पुन्हा सक्रिय झाले आहेत. महिला व बालके चौकाचौकात भिक्षा मागताना दृष्टीस पडत आहेत. सक्तीच्या लॉकडाऊनमध्ये ते अदृश्य झाले होते. त्यामुळे ‘लोकमत’ने याविषयी अधिक चौकशी केली असता, ते इतरही कामे करीत असल्याची व भिक्षा मागणे हा त्यांचा अतिरिक्त पैसा मिळविण्याचा मार्ग असल्याची माहिती मिळाली.सक्तीच्या लॉकडाऊनमध्ये शहर बंद होते. नागरिकांचे बाहेर जाणे-येणे अत्यंत कमी होते. त्यामुळे शहरातील भिक्षेकरी पोट भरण्यासाठी अन्य कामे करीत होते. परंतु, लॉकडाऊन शिथिल होताच ते पुन्हा सक्रिय झाले आहेत. हे भिक्षेकरी भटक्या समाजातील असून ते अमरावती, धामणगाव, चंद्रपूर, अकोला, कन्हान इत्यादी शहरातून नागपुरात येतात. कन्हान येथील कुटुंबे कामठी रोडवरील चौकांमध्ये तर, अमरावती, धामणगाव, अकोला, चंद्रपूर येथील कुटुंबे अमरावती रोड, वर्धा रोड, मानेवाडा इत्यादी भागात भिक्षा मागतात, असे चौकशीत आढळून आले.ही आहेत राहण्याची ठिकाणेशहरातील भिक्षेकरी यशवंत स्टेडियम, संत्रा मार्के ट व रामझुल्याजवळ राहतात. संत्रा मार्केटमधील कुटुंबे ट्रकमधील माल रिकामा करण्याचे काम करतात. त्यातून मिळणाऱ्या पैशातून त्यांची उपजीविका चालते. परंतु, अतिरिक्त पैसे मिळविण्यासाठी महिला व मुले भिक्षा मागतात.भावनेचा फायदा घेतातहे भिक्षेकरी पैसे मिळविण्यासाठी नागरिकांच्या भावनेचा फायदा घेतात. तान्ह्या बाळांना नशा देऊन बेशुद्ध केले जाते. त्यामुळे ते बाळ कोणतीही हालचाल करीत नाही. नागरिक त्यांच्यावर दया दाखवून पैसे देतात.कडक कारवाई होत नाहीया भिक्षेकऱ्यांवर कडक कारवाई होत नाही. पोलीस आणि महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी त्यांना समजावून सोडून देतात. त्याचा भिक्षेकºयांवर काहीच परिणाम होत नाही. ते पुन्हा भिक्षा मागणे सुरू करतात. यासंदर्भात ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.चोरीच्या मुलांचा उपयोगअनेकदा भिक्षा मागण्यासाठी चोरीच्या मुलांचा उपयोग केला जातो. काही दिवसापूर्वी एका महिलेने अकोला येथून मुलाला चोरले होते. त्यानंतर लॉकडाऊनमुळे ती महिला मुलाला रामझुल्याखाली सोडून निघून गेली होती. महिला व बालकल्याण विभागाने त्या मुलाला त्याच्या पालकापर्यंत पोहचवले होते.

 

टॅग्स :Beggarभिकारी