शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

‘ते’ रोज विचारतात, काय झाले आमच्या रेल्वेचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 11:44 IST

गेल्या शुक्रवारी (२२ मे) अजनी पोलीस स्टेशनमधून कॉल आला. उद्या निघायचेय. रेल्वे येणार, तयारीत राहा. वर्ष-दोन वर्षापासून गावाकडे न गेलेल्या या विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला. हरखलेल्या सर्वांनी बॅगा भरल्या. ‘जिव्हाळा’ने निरोपही दिला. मात्र अद्यापही तो शनिवार मात्र उगवलेला नाही.

गोपालकृष्ण मांडवकरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या शुक्रवारी (२२ मे) अजनी पोलीस स्टेशनमधून कॉल आला. उद्या निघायचेय. रेल्वे येणार, तयारीत राहा. वर्ष-दोन वर्षापासून गावाकडे न गेलेल्या या विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला. हरखलेल्या सर्वांनी बॅगा भरल्या. ‘जिव्हाळा’ने निरोपही दिला. मात्र अद्यापही तो शनिवार मात्र उगवलेला नाही. आता विद्यार्थी डोळ्यात पाणी आणून रोज विचारतात, झाली का आमच्या रेल्वेची व्यवस्था ?ही व्यथा आहे नागपुरातील जिव्हाळा परिवारात शिक्षणासाठी राहणाऱ्या अरुणाचल प्रदेशातील विद्यार्थ्यांची. तीन हजारापेक्षा अधिक किलोमीटर अंतरावरील चांगलांग जिल्ह्यातील डायन सर्कलमध्ये राहणारे हे सर्व विद्यार्थी आहेत. पाचवी ते पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी आपला प्रदेश सोडून नागपुरात आलेल्या या मुलामुलींना जिव्हाळा परिवाराने मदतीचा हात दिला. परिस्थितीने अत्यंत गरीब असलेले, कुणाला पालक नसलेले तर कुणी एकल पालक असलेले हे विद्यार्थी नागेश पाटील यांच्या या परिवारात पाच वर्षापासून रमले आहेत. नागपुरातील दीनानाथ हायस्कूल, न्यू इंग्लिश हायस्कूल, हिस्लॉप कॉलेज, जेडी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ते शिकतात. जिव्हाळा परिवारात राहून अभ्यास करतात. वर्षातून एकदा आपल्या प्रांतात जातात. काही तर दोन-दोन वर्षे जात नाहीत.देशात कोरोनाचा प्रकोप वाढल्याने या वर्षी सर्वांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे दहावीच्या वेळापत्रकानुसार अखेरचा पेपर होताच २५ मार्चला प्रवासाचे नियोजन झाले होते. रेल्वेचे आरक्षणही झाले होते. मात्र त्या आधीच २३ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले. सर्वजण अडकले. रेल्वेने आरक्षण रद्द करून तिकिटाचे पैसेही परत केले. त्यामुळे लॉकडाऊन संपण्याची वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता.अशातच चौथ्या लॉकडाऊनमध्ये नियम शिथिल झाले. या विद्यार्थ्यांनीही प्रवासासाठी प्रशासनाकडे नावनोंदणी केली. परप्रातींय नागरिकांना पाठविण्यासाठी सरकारने नियोजन केले. काही रेल्वेही सोडल्या. दरम्यान, शुक्रवारी २२ मे रोजी त्यांना दुसऱ्या दिवशीच प्रवासाला निघण्यासाठी पोलीस स्टेशनमधून कॉल आला. मात्र तो शनिवार अद्यापही यायचाच आहे !सुटायला लागला सर्वांचा धीरविद्यार्थी रात्रभर जागून बॅगा भरत राहिले. गावाकडे जाण्याची आणि आप्तेष्टांना भेटण्याची स्वप्ने डोळ्यात घेऊन आनंदी झाले. नागेश पाटील, दीनबंधूचे नितीन सरदार, ज्ञानेश्वर रक्षक, मीनाताई या सर्वांनी निरोप दिला. मात्र आठवडा होऊनही ही रेल्वे अजूनही आलेलीच नाही. ती कधी येणार हे सांगायलाही प्रशासन तयार नाही. त्यामुळे या सर्वांच्या डोळ्यात पाणी दाटले आहे. मीडियातील बातम्या वाचून गावाकडूनही काळजीचे फोन येत असल्याने सर्वाच्या मनात अनामिक भीती दाटली आहे. या विद्यार्थ्यांचा धीर आता सुटायला लागला आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस