शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

थर्मोकोल व प्लास्टिकबंदी अमलात येणे कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 09:57 IST

राज्यभर थर्मोकोल व प्लास्टिकच्या कॅरिबॅग्जच्या उत्पादन व वापरावर बंदी घालणारा राज्य सरकारचा निर्णय केवळ अमलात आणायला कठीणच नाही तर तो सामान्य नागरिक, किरकोळ दुकानदार ते उद्योपगती अशा सर्वांवर अन्याय करणारा आहे.

ठळक मुद्देप्लास्टिकच्या पर्यायाबद्दल सरकार गप्पबंदी कशावर आहे? राज्य सरकारने २३ मार्च २०१८ ला काढलेल्या या जीआरद्वारे थर्मोकोल/प्लास्टिकच्या एकदाच वापरली जाणाऱ्या वस्तू उत्पादन, खरेदी-विक्री, साठवणुकीवर व वापरावर पूर्णत: बंदी घातली आहे.

सोपान पांढरीपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यभर थर्मोकोल व प्लास्टिकच्या कॅरिबॅग्जच्या उत्पादन व वापरावर बंदी घालणारा राज्य सरकारचा निर्णय केवळ अमलात आणायला कठीणच नाही तर तो सामान्य नागरिक, किरकोळ दुकानदार ते उद्योपगती अशा सर्वांवर अन्याय करणारा आहे.बंदी कुणाला लागू आहे?प्लास्टिकबंदी ही सर्व नागरिक, सरकारी व गैरसरकारी संस्था, क्रीडा संकुल, क्लब्ज, चित्रपट व नाट्यगृहे, औद्योगिक घटक, समारंभाचे हॉल, कार्यालये इत्यादींना लागू असेल. या सर्वांना आपल्याजवळच्या प्लास्टिक बॅग्ज नष्ट करण्यासाठी एक महिन्याचा अवधी आहे व त्यानंतर तो दंडनीय अपराध ठरेल. याचबरोबर ५०० मिलीलिटरची बाटली दुकानदारास परत केल्यास दोन रुपये व एक लिटरपेक्षा अधिक क्षमतेची बाटली परत केल्यास एक रुपया परत मिळेल. तशी किंमत बाटलीवर छापलेली असेल.

अमलात आणायला का कठीण?सरकारने थर्मोकोल/प्लास्टिकच्या वस्तूवर बंदी घातली खरी, पण पॅकेजिंगसाठी काय पर्याय वापरावे यावर या १२ पानांच्या जीआरमध्ये कुठलाही पर्याय नाही. याशिवाय थर्मोकोल (पॉली स्टायरीन) व प्लास्टिक (पॉली प्रॉपिलीन)सह सर्व पेट्रोकेमिकल्स ज्या नॅप्थापासून बनतात त्याच्या उत्पादन, खरेदी/विक्री, वापरांवर बंदी घातलेली नाही. नॅप्था हा पेट्रोलियम रिफायनरीतून निघणारा औद्योगिक उपयोगाचा महत्त्वपूर्ण घटक आहे. त्यावर बंदी नसल्यामुळे नॅप्थाचे उत्पादन सुरूच राहणार व प्लास्टिक/ थर्मोकोल महाराष्ट्रात बनले नाही तरी इतर राज्यांत तयार होणार व महाराष्ट्रातही पोहोचणार. त्यामुळे प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी करणे अशक्य होणार आहे.

काय व्हायला हवे?महाराष्ट्र सरकारने २००६ साली महाराष्ट्र प्लास्टिक बॅग्ज नियमाद्वारे ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक बॅग्ज व शीटस्च्या उत्पादन व वापरावर बंदी आधीच घातली आहे. कारण ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक बॅग्ज वजनाने हलक्या असल्याने भंगारवालेसुद्धा घेत नाहीत. परिणामी त्या हवेत उडत राहतात व कधी सिवरेज, गटारात जमा होऊन बसतात व प्रदूषण वाढवतात. जगभर ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक बॅग्ज/शीटस् फक्त भारतातच वापरल्या जातात. त्यावर महाराष्ट्रात पूर्ण बंदी आहेच, पण गरज आहे ती सक्तीने अमलात आणण्याची. हे न करता सरकारने सर्वच प्लास्टिकच्या वापरावर बंदी घातली आहे त्यामुळेही अंमलबजावणी कठीण आहे. जगभर प्लास्टिक पॅकेजिंगच्या क्षेत्रात औद्योगिक क्रांती आणली असताना त्यावर बंदी घालणे हे औद्योगिक विकासासाठी मारक ठरू शकते व परिणामी प्लास्टिक बंदीचा फज्जा उडू शकतो.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी