शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
3
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
4
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
5
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
6
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
7
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
8
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
9
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
10
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
11
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
12
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
13
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
14
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
15
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
16
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
17
‘लजावल इश्क’वरून पाकिस्तानात गदारोळ; यूझर्सनी हा शो ‘बायकॉट’ करण्याचं केलं आवाहन
18
दिल्लीत नवा आदेश! ‘दरवाजे उघडा, डोळे बंद ठेवा’; नोकरशाहीच्या वर्तुळाला थंडीत घाम फुटण्याची वेळ
19
व्हिसाचे संकट, संधीचा व्हिसा! भारत जगात नवे स्थान निर्माण करू शकतो, जर...
20
भारतीय विद्यार्थ्यांच्या अमेरिकन ड्रीमची नौका बुडणार की काय?

थर्मोकोल व प्लास्टिकबंदी अमलात येणे कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 09:57 IST

राज्यभर थर्मोकोल व प्लास्टिकच्या कॅरिबॅग्जच्या उत्पादन व वापरावर बंदी घालणारा राज्य सरकारचा निर्णय केवळ अमलात आणायला कठीणच नाही तर तो सामान्य नागरिक, किरकोळ दुकानदार ते उद्योपगती अशा सर्वांवर अन्याय करणारा आहे.

ठळक मुद्देप्लास्टिकच्या पर्यायाबद्दल सरकार गप्पबंदी कशावर आहे? राज्य सरकारने २३ मार्च २०१८ ला काढलेल्या या जीआरद्वारे थर्मोकोल/प्लास्टिकच्या एकदाच वापरली जाणाऱ्या वस्तू उत्पादन, खरेदी-विक्री, साठवणुकीवर व वापरावर पूर्णत: बंदी घातली आहे.

सोपान पांढरीपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यभर थर्मोकोल व प्लास्टिकच्या कॅरिबॅग्जच्या उत्पादन व वापरावर बंदी घालणारा राज्य सरकारचा निर्णय केवळ अमलात आणायला कठीणच नाही तर तो सामान्य नागरिक, किरकोळ दुकानदार ते उद्योपगती अशा सर्वांवर अन्याय करणारा आहे.बंदी कुणाला लागू आहे?प्लास्टिकबंदी ही सर्व नागरिक, सरकारी व गैरसरकारी संस्था, क्रीडा संकुल, क्लब्ज, चित्रपट व नाट्यगृहे, औद्योगिक घटक, समारंभाचे हॉल, कार्यालये इत्यादींना लागू असेल. या सर्वांना आपल्याजवळच्या प्लास्टिक बॅग्ज नष्ट करण्यासाठी एक महिन्याचा अवधी आहे व त्यानंतर तो दंडनीय अपराध ठरेल. याचबरोबर ५०० मिलीलिटरची बाटली दुकानदारास परत केल्यास दोन रुपये व एक लिटरपेक्षा अधिक क्षमतेची बाटली परत केल्यास एक रुपया परत मिळेल. तशी किंमत बाटलीवर छापलेली असेल.

अमलात आणायला का कठीण?सरकारने थर्मोकोल/प्लास्टिकच्या वस्तूवर बंदी घातली खरी, पण पॅकेजिंगसाठी काय पर्याय वापरावे यावर या १२ पानांच्या जीआरमध्ये कुठलाही पर्याय नाही. याशिवाय थर्मोकोल (पॉली स्टायरीन) व प्लास्टिक (पॉली प्रॉपिलीन)सह सर्व पेट्रोकेमिकल्स ज्या नॅप्थापासून बनतात त्याच्या उत्पादन, खरेदी/विक्री, वापरांवर बंदी घातलेली नाही. नॅप्था हा पेट्रोलियम रिफायनरीतून निघणारा औद्योगिक उपयोगाचा महत्त्वपूर्ण घटक आहे. त्यावर बंदी नसल्यामुळे नॅप्थाचे उत्पादन सुरूच राहणार व प्लास्टिक/ थर्मोकोल महाराष्ट्रात बनले नाही तरी इतर राज्यांत तयार होणार व महाराष्ट्रातही पोहोचणार. त्यामुळे प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी करणे अशक्य होणार आहे.

काय व्हायला हवे?महाराष्ट्र सरकारने २००६ साली महाराष्ट्र प्लास्टिक बॅग्ज नियमाद्वारे ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक बॅग्ज व शीटस्च्या उत्पादन व वापरावर बंदी आधीच घातली आहे. कारण ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक बॅग्ज वजनाने हलक्या असल्याने भंगारवालेसुद्धा घेत नाहीत. परिणामी त्या हवेत उडत राहतात व कधी सिवरेज, गटारात जमा होऊन बसतात व प्रदूषण वाढवतात. जगभर ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक बॅग्ज/शीटस् फक्त भारतातच वापरल्या जातात. त्यावर महाराष्ट्रात पूर्ण बंदी आहेच, पण गरज आहे ती सक्तीने अमलात आणण्याची. हे न करता सरकारने सर्वच प्लास्टिकच्या वापरावर बंदी घातली आहे त्यामुळेही अंमलबजावणी कठीण आहे. जगभर प्लास्टिक पॅकेजिंगच्या क्षेत्रात औद्योगिक क्रांती आणली असताना त्यावर बंदी घालणे हे औद्योगिक विकासासाठी मारक ठरू शकते व परिणामी प्लास्टिक बंदीचा फज्जा उडू शकतो.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी