शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

तेथे सर्वत्र फक्त शांतताच -----

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 21:58 IST

या रस्त्यांवरून लोक कधीही सर्रासपणे ये-जा करायचे. कधीही अडचण आली नाही. परंतु २२ वर्षाच्या एका युवकाच्या मृत्यूनंतर त्याची कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आणि इतरही काही लोक पॉझिटिव्ह सापडल्यापासून पार्वतीनगर, जवाहरनगर आणि रामेश्वरी परिसर सील करण्यात आला आहे. रस्त्यांवर १० ते १५ फूट उंच टिनांनी रस्ता आडविण्यात आला आहे.

ठळक मुद्देलोकमत ग्राऊंड रिपोर्टपार्वतीनगर, जवाहरनगर, रामेश्वरीतील ‘आँखो देखा हाल’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : या रस्त्यांवरून लोक कधीही सर्रासपणे ये-जा करायचे. कधीही अडचण आली नाही. परंतु २२ वर्षाच्या एका युवकाच्या मृत्यूनंतर त्याची कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आणि इतरही काही लोक पॉझिटिव्ह सापडल्यापासून पार्वतीनगर, जवाहरनगर आणि रामेश्वरी परिसर सील करण्यात आला आहे. रस्त्यांवर १० ते १५ फूट उंच टिनांनी रस्ता आडविण्यात आला आहे. एक अरुंद एंट्री गेट ठेवण्यात आले आहे. कचरागाडी, भाजी विकणारा आणि, दूध विकणारेही सील करण्यात आलेल्या परिसरात येऊ शकत नाहीत. भीती इतकी आहे की लोकही आपल्या घराबाहेर पडण्यास भीत आहेत. बहुतांश घरांच्या गेटवर तर लोकांनी भीतीमुळे कुलूप लावले आहे. कॉलनीतील अंतर्गत रस्त्यांवर कधी लोक सहजपणे फेरफटका मारताना दिसायचे ते रस्ते आता शांत आहेत. परिसरात इतकी स्मशान शांतता आहे की, आपल्या घरांमध्ये असलेले लोकही स्वत:ला असुरक्षित समजत आहेत. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, त्यांच्या घरातील गर्भवती महिला आणि वयोवृद्ध लोकांना उपचारासाठी नियमित रुग्णालयात जाणेही कठीण झाले आहे. कुणाला जायचेच असेल तर इतक्या तांत्रिक अडचणी येतात की व्यक्ती त्रस्त होतो. एकूणच आम्हाला तुरुंगातील कैद्यांसारखे वाटतेय, अशी इथल्या लोकांची प्रतिक्रिया आहे.आणखी किती दिवस?या परिसरातील नागरिक मागील काही दिवसांपासून घरगुती सिलिंडरची आतुरतेने वाट पाहत होते. सिलिंडरच्या गाडीला मोठ्या प्रयत्नानंतर बुधवारी प्रवेश मिळाला. परिसरात इतकी स्मशान शांतता आहे की, बाल्कनीतून लोकांना केवळ सील करण्यासाठी लावलेले टिन दिसून येतात. पुढील १४ दिवस दुसरा रुग्ण आढळून न आल्यास हा परिसर मोकळा करण्यात येईल. परंतु दुसरा रुग्ण आढळलाच तर मात्र आणखी १४ दिवस वाट पाहावी लागेल, याचा विचारानेही लोक अतिशय चिंतेत पडले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर