शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 21:26 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार नाही, असा शासन आदेश वित्त विभागाने ४ मे रोजी निर्गमित केला होता. परंतु या आदेशाला खो देत सामान्य प्रशासन विभागाने ७ जुलै २०२० रोजी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांत ३१ जुलैपर्यंत बदल्या करण्याचे आदेश आहे.

ठळक मुद्दे१५ टक्क्याच्या मर्यादेत बदल्या करण्यासंदर्भात शासन आदेश निर्गमित

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार नाही, असा शासन आदेश वित्त विभागाने ४ मे रोजी निर्गमित केला होता. परंतु या आदेशाला खो देत सामान्य प्रशासन विभागाने ७ जुलै २०२० रोजी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांत ३१ जुलैपर्यंत बदल्या करण्याचे आदेश आहे.या बदल्या करताना त्याची १५ टक्के अशी मर्यादा घालून देण्यात आलेली आहे. सदर बदल्या महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ मधील तरतुदीनुसार करण्यात येणार आहे. दरवर्षी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या एप्रिल व मे महिन्यात करण्यात येतात. या बदल्या ३० टक्केपर्यंत असतात. मात्र यावर्षी कोरोना संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे सन २०२०-२१ या वित्तीय वर्षात राज्याची कर व करेतर उत्पन्नातील अपेक्षित महसुली घट व त्याचे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम विचारात घेऊन वित्त विभागाने विविध उपाययोजना करून बदल्यावर ४ मे नुसार निर्बंध घातले होते. मात्र शासन स्तरावर लोकप्रतिनिधी व कर्मचारी संघटना यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे अखेर सरकारला बदल्या करण्याचा निर्णय घ्यावा लागल्याची माहिती आहे.राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या देखील सोयीच्या दृष्टीने बदल्या करण्याची मागणी कास्ट्राईब जि.प. कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सोहन चवरे यांनी ग्राम विकास विभागाकडे केली आहे.

टॅग्स :TransferबदलीGovernmentसरकारEmployeeकर्मचारी