शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
2
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
3
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
4
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
5
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
6
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
7
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
8
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
9
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
10
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
11
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
12
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
13
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
14
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
15
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
16
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
17
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
18
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
19
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
20
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले

वीज बिलात सुट मिळणार नाही, तीन हप्त्यांचे दिले लॉलीपॉप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2020 22:06 IST

Electricity bill Nagpur News महावितरणने आपली बाजू सावरण्यासाठी व थकीत वीज बिलाची वसुली करण्यासाठी ग्राहकांना तीन समान हप्त्यात वीज बिल भरण्याचे लॉलीपॉप दिले आहे.

ठळक मुद्देथकीत वसुलीची मोहीम सुरूतीन समान हप्त्यात भरू शकतील वीज बिल

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : लॉकडाऊनच्या काळात आलेल्या वीज बिलात सूट देण्यासंदर्भातील घोषणा हवेत विरणार आहे. त्यामुळे महावितरणने आपली बाजू सावरण्यासाठी व थकीत वीज बिलाची वसुली करण्यासाठी ग्राहकांना तीन समान हप्त्यात वीज बिल भरण्याचे लॉलीपॉप दिले आहे.

राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दावा केला होता की, राज्य सरकार लॉकडाऊनच्या काळातील वीज बिलात सूट देऊन जनतेला दिवाळीची भेट देईल. परंतु असे होताना दिसत नाही. कारण आज राऊत यांनी मुंबईत स्पष्ट केले की, वीज कंपन्यांची आर्थिक स्थिती बिघडली आहे. कंपनीवर कर्जाचा डोंगर वाढला आहे. केंद्र सरकारकडून मदत नाही, त्यामुळे राज्य सरकार वीज बिलात सुट देऊ शकणार नाही. राऊत यांच्या घोषणेमुळे ग्राहकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. अशात महावितरणने मंगळवारपासून थकीत वीज बिल वसुलीची मोहीम सुरू केली आहे. कंपनीने कोरोना काळात लोकांची आर्थिक स्थिती बिघडल्याचा हवाला देत तीन समान हप्त्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. हप्त्याला मंजुरी मिळाल्याच्या ७ दिवसांच्या आत ३० टक्के बिलाची रक्कम डाऊन पेमेंटच्या रूपात भरायची आहे. ज्या ग्राहकांचा वीज पुरवठा, बिल न भरल्यामुळे कट केला आहे, त्यांनासुद्धा सुविधा हप्त्याची मिळणार आहे.

- विशेष डेस्क लावण्यात येईल, शिबिरांचे आयोजन

ग्राहकांना हप्त्याची सुविधा देण्यासाठी उपविभागीय कार्यालयात विशेष डेस्क लावण्यात येईल. तर काही भागात शिबिरसुद्धा लावण्यात येणार आहे. हप्त्याची सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचाही दावा केला आहे. अद्यापपर्यंत पोर्टलवर यासंदर्भात कुठलीच लिंक तयार नाही.

- लोकमतने आधीच दिले होते संकेत

ऊर्जामंत्र्यांनी मंगळवार १७ नोव्हेंबरला वीज बिलात सूट मिळणार नाही, हे स्पष्ट केले. मात्र लोकमतने यासंदर्भात ७ नोव्हेंबर रोजी ‘वीज बिलाच्या सवलतीत अडसर’ या शीर्षकांतर्गत वृत्त प्रकाशित करून राज्य सरकार सूट देणार नाही, असे संकेत दिले होते. वित्त मंत्रालयाने सवलतीसाठीचा १८०० कोटी रुपये निधी देण्यास नकार दिला होता. केंद्राच्या मदतीशिवाय ही घोषणा पूर्ण करणे अशक्य होते. या सर्व पार्श्वभूमीवर सरकारकडे वीज कर्मचाऱ्यांचे बोनस व वेतनात वाढ करण्यासाठी निधी आहे, पण सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी झोळी रिकामी आहे.

टॅग्स :electricityवीज