शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

टॉवर कंपन्यांच्या २ हजार कोटींच्या विद्युत शुल्कमाफीची चौकशी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2022 20:19 IST

Nagpur News महावितरणमधील कोट्यवधी रुपयांच्या मोबाइल टॉवर घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. ‘लोकमत’ने या घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता.

नागपूर : महावितरणमधील कोट्यवधी रुपयांच्या मोबाइल टॉवर घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. ‘लोकमत’ने या घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता.

भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित केला. महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या बेकायदेशीर निर्णयामुळे राज्य सरकारचे दोन हजार कोटी रुपयांचे नुकसान होणार असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने विदर्भ आणि मराठवाड्यातील मागास भागातील उद्योगांना वीज शुल्क माफीची घोषणा केली होती. ही सवलत मोबाइल टॉवर्स नव्हे तर फक्त उद्योगांसाठी होती. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी जुलै २०२१ पासून राज्य सरकार आणि महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या परवानगीशिवाय शुल्क माफ केले, असे बावनकुळे म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बावनकुळेंना त्यांच्याकडे उपलब्ध कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आणि प्रकरणाची चौकशी होईल, असे आश्वासन दिले.

ऊर्जा मंत्रालयाने जालन्याच्या एसआरजे पीटी स्टील कंपनीला पात्र नसतानाही नवीन उद्योगांसाठी सबसिडी मंजूर केल्याचा आरोपही बावनकुळे यांनी केला. अधिकाऱ्यांनी विक्रमी वेळेत प्रस्ताव मंजूर केला. ऊर्जा मंत्रालयाने उद्योगपतींना मोठ्या प्रमाणात वाटप करण्याऐवजी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे ते म्हणाले. ‘लोकमत’ने वर्धा आणि वसईसह राज्यातील स्टील उद्योगांवर महावितरणच्या बेकायदेशीर फायदा पोहोचून दिल्याच्या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे.

टॅग्स :Mobileमोबाइल