शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

 नागपूर जिल्ह्यात १७ बालविवाह राेखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 12:29 IST

Nagpur News नागपूरसारख्या जिल्ह्यातही काेराेना काळात गुप्तपणे बालविवाह झाल्याचे प्रकार समाेर येत आहेत. जिल्हा महिला व बालसंरक्षण विभागाने गेल्या दीड वर्षाच्या काळात तयारीत असलेले १७ बालविवाह राेखले.

ठळक मुद्देविद्यार्थिनींच्या गळ्यात मंगळसूत्र ! बालसंरक्षण विभागाने राेखले १७ विवाह

 

 लोकमत न्यूज नेटवर्क  

नागपूर : महाराष्ट्र हे प्रगत राज्य म्हणून ओळखले जाते. त्यातही नागपूरचा साक्षरता दर बऱ्यापैकी चांगला असून मुलगा-मुलगी हा भेदाभेदही ठेवणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. मात्र, काेराेना महामारीच्या झटक्याने बहुतेकांची आर्थिक वाताहत केली आहे. त्यामुळे बालविवाहाची कुप्रथा पुन्हा डाेके वर काढायला लागली आहे. नागपूरसारख्या जिल्ह्यातही काेराेना काळात गुप्तपणे बालविवाह झाल्याचे प्रकार समाेर येत आहेत. जिल्हा महिला व बालसंरक्षण विभागाने गेल्या दीड वर्षाच्या काळात तयारीत असलेले १७ बालविवाह राेखले. यावरून हा प्रकार किती गंभीर स्वरूप घेत आहे, हे लक्षात येईल.

काेराेनामुळे अनेक गाेष्टींवर परिणाम केले आहेत. याकाळात सर्वाधिक नुकसान झाले ते शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे. अशा विवंचनेत गरीब कुटुंबातील मुलींना बालविवाहासारख्या कालबाह्य कुप्रथेला सामाेरे जावे लागते आहे. हाेय, गेल्या दीड-दाेन वर्षापासून उपराजधानीत बालविवाह वाढीस लागल्याचे उघडकीस आले आहे. दीड वर्षापासून शाळा बंद आहेत, शिवाय राेजगार नसल्याने आईवडिलांवर आलेला आर्थिक ताण यामुळे पालकही मुलींना भार मानून ताे कमी करण्यासाठी अल्पवयातच मुलींचे विवाह करण्यास धजावत आहेत. बालसंरक्षण विभागाने या काळात १७ विवाह राेखण्यात यश मिळविले पण जे उजेडात आले नाही, असे कितीतरी विवाह झाले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. राेखण्यात आलेल्या विवाहांमध्ये जिल्ह्यात १४ तर शहरात ३ प्रकरणांचा समावेश आहे. या प्रकरणात २००६ च्या बालविवाह प्रतिबंधक अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शालेय शिक्षण विभागाने १५ जुलैपासून आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले हाेते. त्यानुसार जिल्ह्यातील ७५४ पैकी केवळ ९२ शाळा सुरू झाल्या तर ६६२ शाळा अद्याप बंद आहेत. यामध्ये ३५८० विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.

 

दहावीच्या विद्यार्थिनींच्या गळ्यात मंगळसूत्र

शाळा सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात ग्रामीण भागात अशा घटना उघडकीस आल्या आहेत. मात्र, बालसंरक्षण विभागाकडे याबाबत आकडा नाही. काही मुलींना मंगळसूत्र न घालू देता शाळेत पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, ज्यांची लग्ने झाली, त्यांच्या शाळाच सुटल्याचेही सत्य आहे.

दारिद्र्य, आर्थिक विवंचना हेच कारण

गेल्या दीड वर्षात शहर आणि ग्रामीण मिळून १७ बालविवाह राेखण्यात आले. यातील कुटुंबीयांना विचारले असता बहुतेकांनी आर्थिक विवंचना हेच कारण सांगितले. काेराेना काळात राेजगार गेल्याने कुटुंबांना प्रचंड संकटांना सामाेरे जावे लागत आहे. त्यामुळे अत्यल्प खर्चात मुलींचे लग्न उरकून भार कमी करण्याची पालकांची मानसिकता असल्याचे दिसून येत आहे.

- मुश्ताक पठाण, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी

पटसंख्या कमी झालेल्या मुली जातात कुठे?

ग्रामीण भागात दरवर्षी आठवीनंतर मुलींची पटसंख्या कमी होते. या मुली जातात कुठे? याचा शोध घ्यायला हवा. बहुतेक मुलींची लग्ने करून देण्यात येतात तर काहींची शाळाच बंद केली जाते. काेराेना काळात आर्थिक परिस्थिती खालावल्याने मुलींची विवाह उरकले गेल्याचे सांगतिले जात आहे. मात्र, शैक्षणिक,सामाजिक मागासलेपणा व धार्मिक पगडा आहे. मुलगी ही जबाबदारी असून लग्न हे आपल्या समाजात चांगले मानले जाते. त्यामुळे लग्न करून माेठे कार्य केल्याची लाेकांची मानसिकता असते.

- रूबीना पटेल, सामाजिक कार्यकर्त्या

माहिती मिळाली तर कारवाई

महिला व बालविकास विभागाला सूचना मिळताच पथक कारवाईसाठी जाते व बालसंरक्षण अधिनियम-२००६ अंतर्गत कारवाई केली जाते. ज्या मुलींचे लग्न माेडण्यात यश आले, अशांच्या शिक्षण व पुनर्वसनासाठी महिला व बालकल्याण समितीकडे पाठपुरावा केला जाताे. बालविवाहाबाबत तक्रारी करण्यास नागरिकांनी पुढे यावे.

- अर्पणा काेल्हे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी

टॅग्स :marriageलग्न