शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

महाराष्ट्रावर वाङ्मय कृतीचा झेंडा रोवणारा गरीबच राहिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 01:45 IST

राजकीय कादंबरीचा इतिहास लिहायचा झाल्यास त्याची सुरुवात ज्येष्ठ पत्रकार अरुण साधू यांच्यापासून होते. इंग्रजी व मराठी भाषेतून समर्थपणे लिहू शकणारे पत्रकार आणि भाष्यकार ते होते.

ठळक मुद्देसुरेश द्वादशीवार : अरुण साधू यांना श्रद्धांजली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राजकीय कादंबरीचा इतिहास लिहायचा झाल्यास त्याची सुरुवात ज्येष्ठ पत्रकार अरुण साधू यांच्यापासून होते. इंग्रजी व मराठी भाषेतून समर्थपणे लिहू शकणारे पत्रकार आणि भाष्यकार ते होते. आपल्या लेखणीतून त्यांनी महाराष्ट्रात वाङ्मय कृतीचा झेंडा रोवला खरा, परंतु आयुष्यात हा माणूस गरीबच राहिला, अशी खंत लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केली.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र नागपूरद्वारे अरुण साधू यांना श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमात द्वादशीवार यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना अरुण साधू यांच्यासंदर्भातील काही अनुभव आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबाबत कथन केले.कार्यक्रमाला वक्ता म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर, ज्येष्ठ कथाकार व कादंबरीकार आशा बगे व प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी उपस्थित होते.यावेळी आशा बगे यांनी अरुण साधू यांच्या मुखवटा कादंबरीवर भाष्य केले. या कादंबरीतून आणि त्यांच्या एकूण लेखनातून हा माणूस कसा संमिश्र व्यक्तिमत्त्वाचा होता याची अनुभूती करून दिली. त्यांच्या साहित्यकृतीला ज्ञानपीठ , साहित्य अकादमींचा पुरस्कार मिळायला हवा होता, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.डॉ. यशवंत मनोहर यांनीही अरुण साधू यांच्या अष्टपैलू लेखणीबद्दल आणि भूमिकेबद्दल भाष्य केले. मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावरून नाराजी व्यक्त करणाºया या व्यक्तिमत्त्वाने संमेलनाच्या मंचावर राजकारण्यांना जास्त महत्त्व देत असाल तर मराठी साहित्यकार व श्रोत्यांनी जाऊच नये अशी भूमिका मांडली होती. निगर्वी, साधे, सरळ व प्रांजळ व्यक्तिमत्त्व असलेल्या साधू यांनी आपल्या लेखणीतून कुणाचीही पर्वा केली नसल्याचे मत डॉ. मनोहरांनी व्यक्त केले.प्रसंगी डॉ. गिरीश गांधी यांनी संमेलनाच्या मंचावर झालेल्या मतभेदाचे कटु अनुभव सांगितले. परंतु त्यांनी तत्त्वाशी कधीच तडजोड केली नाही, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन प्रदीप विटाळकर यांनी केले.