शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

महाराष्ट्रावर वाङ्मय कृतीचा झेंडा रोवणारा गरीबच राहिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 01:45 IST

राजकीय कादंबरीचा इतिहास लिहायचा झाल्यास त्याची सुरुवात ज्येष्ठ पत्रकार अरुण साधू यांच्यापासून होते. इंग्रजी व मराठी भाषेतून समर्थपणे लिहू शकणारे पत्रकार आणि भाष्यकार ते होते.

ठळक मुद्देसुरेश द्वादशीवार : अरुण साधू यांना श्रद्धांजली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राजकीय कादंबरीचा इतिहास लिहायचा झाल्यास त्याची सुरुवात ज्येष्ठ पत्रकार अरुण साधू यांच्यापासून होते. इंग्रजी व मराठी भाषेतून समर्थपणे लिहू शकणारे पत्रकार आणि भाष्यकार ते होते. आपल्या लेखणीतून त्यांनी महाराष्ट्रात वाङ्मय कृतीचा झेंडा रोवला खरा, परंतु आयुष्यात हा माणूस गरीबच राहिला, अशी खंत लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केली.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र नागपूरद्वारे अरुण साधू यांना श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमात द्वादशीवार यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना अरुण साधू यांच्यासंदर्भातील काही अनुभव आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबाबत कथन केले.कार्यक्रमाला वक्ता म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर, ज्येष्ठ कथाकार व कादंबरीकार आशा बगे व प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी उपस्थित होते.यावेळी आशा बगे यांनी अरुण साधू यांच्या मुखवटा कादंबरीवर भाष्य केले. या कादंबरीतून आणि त्यांच्या एकूण लेखनातून हा माणूस कसा संमिश्र व्यक्तिमत्त्वाचा होता याची अनुभूती करून दिली. त्यांच्या साहित्यकृतीला ज्ञानपीठ , साहित्य अकादमींचा पुरस्कार मिळायला हवा होता, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.डॉ. यशवंत मनोहर यांनीही अरुण साधू यांच्या अष्टपैलू लेखणीबद्दल आणि भूमिकेबद्दल भाष्य केले. मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावरून नाराजी व्यक्त करणाºया या व्यक्तिमत्त्वाने संमेलनाच्या मंचावर राजकारण्यांना जास्त महत्त्व देत असाल तर मराठी साहित्यकार व श्रोत्यांनी जाऊच नये अशी भूमिका मांडली होती. निगर्वी, साधे, सरळ व प्रांजळ व्यक्तिमत्त्व असलेल्या साधू यांनी आपल्या लेखणीतून कुणाचीही पर्वा केली नसल्याचे मत डॉ. मनोहरांनी व्यक्त केले.प्रसंगी डॉ. गिरीश गांधी यांनी संमेलनाच्या मंचावर झालेल्या मतभेदाचे कटु अनुभव सांगितले. परंतु त्यांनी तत्त्वाशी कधीच तडजोड केली नाही, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन प्रदीप विटाळकर यांनी केले.