शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
3
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
4
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
5
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
6
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...
7
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
8
‘टॅरिफ’मुळे प्लास्टिक उद्योग अडचणीत; ३ वर्षांत भारतातून इतर देशांमध्ये चौपटीने निर्यात वाढविण्याचे लक्ष्य
9
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
10
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
11
शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक; Sensex १४७ अंकांनी आपटला, निफ्टीतही घसरण; 'हे' प्रमुख स्टॉक्स घसरले
12
यूएई सामन्याआधी केलेलं नाटक पाकिस्तानच्या अंगलट, आयसीसीनं पाठवला ईमेल!
13
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
14
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
15
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
16
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
18
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
19
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
20
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!

जगात अद्यापही आर्थिक स्वातंत्र्य नाही : मोहन भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 22:37 IST

१९२० साली नागपुरात पार पडलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात डॉ. हेडगेवार आणि अधिवेशन नियामक मंडळाने ‘पुंजीमुक्त विश्व’ अशी संकल्पना मांडली होती तर, डॉ. आंबेडकरांनी संविधानात आर्थिक स्वातंत्र्याचा सिद्धांत मांडला . दोन्ही संकल्पना एकच असून, तो विचार लघु उद्यमातून अखेरच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे, असे कार्य लघु उद्योग भारतीने करावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज येथे केले.

ठळक मुद्देलघु उद्योग भारतीच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १९२० साली नागपुरात पार पडलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात डॉ. हेडगेवार आणि अधिवेशन नियामक मंडळाने ‘पुंजीमुक्त विश्व’ अशी संकल्पना मांडली होती तर, डॉ. आंबेडकरांनी संविधानात आर्थिक स्वातंत्र्याचा सिद्धांत मांडला . दोन्ही संकल्पना एकच असून, तो विचार लघु उद्यमातून अखेरच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे, असे कार्य लघु उद्योग भारतीने करावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज येथे केले.लघु उद्योग भारतीच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या पर्वाववर नागपुरात रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. मोहन भागवत आपले विचार व्यक्त करत होते. व्यासपीठावर लघु उद्योग भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष जितेंद्र गुप्त, विदर्भ प्रदेश अध्यक्ष रवी वैद्य उपस्थित होते.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेच्या पाच वर्षे आधी नागपुरात पार पडलेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाची संपूर्ण जबाबदारी डॉ. हेडगेवार यांनी पार पाडली होती. त्या अधिवेशनात हेडगेवार आणि अधिवेशन नियामक मंडळाने, भारताला संपूर्ण स्वातंत्र्य घोषित करा, अशी गर्जना केली होती. संपूर्ण स्वातंत्र्यानंतर भारतच जगाला ‘पुंजी चंगुल से मुक्ती’ अर्थात भांडवलमुक्त अर्थव्यवस्था देऊ शकतो, असा विश्वास दिला होता. त्यानंतर, संविधानाच्या रूपाने डॉ. आंबेडकरांनी आर्थिक स्वातंत्र्याचा विचार दिला. लघु-सूक्ष्म-मध्यम उद्योगातून हा आर्थिक स्वातंत्र्याचा किंवा भांडवलमुक्त अर्थव्यवस्थेचा मार्ग प्रशस्त होतो, असे भागवत यांनी यावेळी स्पष्ट केले. लघु उद्योग जेवढे वाढतील, तेवढ्याच प्रमाणात आर्थिक स्वातंत्र्यात वाढ होईल. त्यासाठी समग्र आणि लघुउद्योग केंद्रित विचार करावा लागेल. त्याकरिता लघु-सुक्ष्म-मध्यम उद्योगाच्या कारागिरीवर भर देणे अनिवार्य ठरेल आणि म्हणून कृषी, उद्योग व व्यापार यांचा समन्वय साधून एक योजना सादर करावी लागेल. या तिघांचा एकत्र विचार झाला तरच संपत्तीत वाढ होईल. याच विचारावर देशाला न्यावे लागेल. याच दृष्टिकोनातून लघुक्षेत्र संघटित होईल आणि तशा वातावरणाची निर्मिती होऊन उद्दिष्टपूर्ती साधली जाईल, असा विश्वास भागवत यांनी व्यक्त केला. हा विचार अखेरच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे कार्य कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन भागवत यांनी केले. संचालन लघु उद्योग भारतीचे महासचिव गोविंद लेले यांनी केले. तर आभार रवी वैद्य यांनी मानले.जेवढे विकेंद्रीकरण तेवढेच पर्यावरणाचे संवर्धनउद्योग जेवढे विकेंद्रित असेल तेवढेच शोषण कमी असेल आणि त्याअनुषंगाने पर्यावरणाचा ऱ्हासही कमी होईल. एकंदर लघु-सुक्ष्म-मध्यम उद्योग पर्यावरणावर आधारित असल्याने, त्याचा विचार या उद्योगात केला जातो, असे डॉ. मोहन भागवत यावेळी म्हणाले. याप्रसंगी लघु उद्योग भारतीच्या लघुचित्रफितीचे विमोचन करण्यात आले.

 

 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत