शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

विद्यार्थ्यांमध्ये समर्पणाची भावना असावी

By admin | Updated: January 25, 2015 00:51 IST

विद्यार्थ्यांमध्ये अनुशासन, ज्ञान, पे्रमासह समर्पण आणि त्यागाची भावना असावी, असे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी येथे केले.

संबित पात्रा यांचे प्रतिपादन : राष्ट्रीय छात्र संसदेचा समारोपनागपूर : विद्यार्थ्यांमध्ये अनुशासन, ज्ञान, पे्रमासह समर्पण आणि त्यागाची भावना असावी, असे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी येथे केले. रायसोनी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशनच्यावतीने सीआरपीएफ गेटसमोरील जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी कॉलेजच्या सभागृहात आयोजित दोन दिवसीय दुसऱ्या ‘राष्ट्रीय छात्र संसदे’च्या समारोपीय दिनाच्या पहिल्या सत्रात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. ‘क्वालिटी बेस एज्युकेशन टू बिल्ट द नेशन’ हा चर्चासत्राचा विषय होता. मंचावर जी.एच. रायसोनी समूहाचे चेअरमन सुनील रायसोनी, मोटिव्हेशनल ट्रेनर उषी मोहनदास, विजय सिन्हा आणि प्रदीप चोपडा होते. संबित पात्रा यांनी सांगितले की, जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी भगवान कृष्णासारखे तेजस्वी व मनस्वी व्हावे. सतत प्रयत्नशील राहण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. प्रदीप चोपडा म्हणाले की, नवनवीन साईटचा शिक्षणावर सकारात्मक परिणाम झाला आहे. रिसर्च पेपर आणि विविध कोर्सची माहिती तात्काळ मिळते, शिवाय घरबसल्या विभिन्न भाषाही शिकता येतात. पुस्तक आणि टॅब दोन्ही उपयुक्त असले तरीही पुस्तकाची जागा कुणीही घेऊ शकत नाही. उषी मोहनदास यांनी कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम असण्यावर भर दिला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात विविध विषय शिकविले जावेत. विजय सिन्हा यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन केले. मीडियाची भूमिका महत्त्वपूर्णतिसऱ्या सत्रात ‘मीडिया ए गेम चेंजर’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार प्रकाश दुबे, फिल्ममेकर अशोक पंडित, अशोक लुल्ला आणि परशुराम या वक्त्यांनी बाजू मांडली. अशोक पंडित हे काश्मीरचे विस्थापित असून त्यांचा या विषयाचा गाढा अभ्यास आहे. प्रकाश दुबे यांनी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांची बाजू मांडली. प्रिंट मीडियाने नैतिकता टिकवून ठेवावी. परशुराम यांनी इराक देशात बराच काळ वास्तव्य केले आहे. मीडियाच्या भूमिकेचा फटका इराकला बसला आहे. अशोक लुल्ला यांनी सोशल मीडियाचा गेम चेंजर म्हणून उपयोग केला जाऊ शकतो, असे सांगितले. ज्येष्ठ पत्रकार मनीष अवस्थी यांनी दोन दिवसात विविध विषयावर नामांकित वक्त्यांनी मांडलेल्या मतांवर भाष्य केले. तिसऱ्या ‘राष्ट्रीय छात्र संसदे’चे आयोजन पुढील वर्षी २२ आणि २३ जानेवारीला होणार आहे. संचालन श्वेता शेलगावकर यांनी तर डॉ. प्रा. अमिना वाली यांनी आभार मानले. तिन्ही सत्रात जी.एच. रायसोनी समूहाचे चेअरमन सुनील रायसोनी, कार्यकारी संचालक डॉ. ओ.एस. बिहारे, समूह संचालक (एमबीए विभाग) डॉ. रवींद्र अहेर, जी.एच. रायसोनी लॉ स्कूलचे प्राचार्य डॉ. जयंत एल. अपराजित व विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)