शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

आरोग्य सेवेत सेवाभावी संस्थांचे सहकार्य हवे

By admin | Updated: November 29, 2015 03:58 IST

आरोग्य सेवा क्षेत्रात सेवाभावी संस्था आणि व्यक्तींचे सहकार्य आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

खापरी येथे डायलिसिस सेंटरचे लोकार्पण : मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादननागपूर : आरोग्य सेवा क्षेत्रात सेवाभावी संस्था आणि व्यक्तींचे सहकार्य आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. खापरी येथील स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन व रोटरी क्लब आॅफ नागपूर ईशान्य यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेल्या लद्धड डायलिसिस सेंटरचे लोकार्पण करतांना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मिशनचे अध्यक्ष डॉ. दिलीप गुप्ता होते. स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनतर्फे सुरू करण्यात आलेले डायलिसिस सेंटर सर्वसामान्य रुग्णांना माफक दरात सेवा उपलब्ध करून देत आहे. या मिशनमध्ये रुग्णांवर विविध प्रकाराच्या शस्त्रक्रिया व उपचार केले जातात. हे सेवा कार्य आहे. या सेवा कार्यात संपन्न असलेल्या व्यक्तींनी सामाजिक भावनेने काहीतरी देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. रुग्णांवर उपचार होतांना परिवाराला मानसिक व आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत माफक दरात डायलिसिस सारखे उपचार मिळाले तर मोठा दिलासा रुग्णांच्या नातेवाईकांना मिळतो. समाजात माफक दरात डायलिसिस उपचार उपलब्ध करून देणारी केंद्रे मोठ्या प्रमाणात सुरू व्हावी, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक भाषणात डॉ. दिलीप गुप्ता यांनी सांगितले, राजीव गांधी जीवनदायी योजना या मिशनतर्फे राबविण्यात येते. हे हॉस्पिटल समाज संस्था आणि सरकार या तिघांच्या सहकार्याने चालू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राहुल लद्धड यांनीही अपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी निमिष, सुनील, जीवनलाल, महेश, सतीश, हेमंत या लद्धड बंधूंचा तसेच रोटरी ईस्ट एलआयसी गोल्डन ज्युबिली फाऊंडेशन, प्रॉव्हिन्शियल आॅटोमोबाईल्स, अंकुर सीड्स, सत्यनारायण नुवाल, अमित पंचमतिया, ब्रह्मोस एरो स्पेस, स्टेट बँक आॅफ इंडिया, रोटरी ईशान्य या व्यक्ती व संस्थांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुभाष लाघोटी, डॉ. प्रशांत ओंकार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)