शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नियतकालिकांच्या कागद, छपाई, वितरणावर नाममात्र कर असावा

By निशांत वानखेडे | Updated: December 28, 2024 19:18 IST

ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके : साहित्य अकादेमी आणि वि. सा. संघाचा परिसंवाद

नागपूर : नियतकालिके ही अभिव्यक्तीचे प्रभावी साधन असून सामाजिक आरोग्यासाठी आवश्यक आहे. परंतु नियतकालिके अधिक व्यापक होण्यासाठी आणि अधिकाधिक वाचकांपर्यंत नियमितपणे पोचण्यासाठी त्यांच्या कागद, छपाई, वितरणावर नाममात्र कर असावा, असे मत ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांनी व्यक्त केले.

साहित्य अकादेमी आणि विदर्भ साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी ‘मराठीतील वाङ्मयीन आणि वैचारिक नियतकालिके’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. वि. सा. संघाच्या अमेय दालनात आयाेजित परिसंवादाच्या उद्घाटनप्रसंगी वि.सा. संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, साहित्य अकादेमीच्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सदस्य प्रमोद मुनघाटे, क्षेत्रीय कार्यालय मुंबईचे प्रभारी अधिकारी ओमप्रकाश नागर व युगवाणीचे संपादक प्रफुल्ल शिलेदार उपस्थित होते.

डहाके पुढे म्हणाले की सरकारी अनुदान हे बरेचदा तुटपुंजे असते, त्यातून वास्तविक खर्च निघत नाही. त्यामुळे दानकर्ता, प्रायोजक आणि प्रेक्षकांवर आर्थिक नियोजनाचा भार पडतो. याशिवाय सरकारी अनुदानात सरकारचा हस्तक्षेप नसावा याकडे त्यांनी लक्ष वेधले. जवळ जवळ १८०० च्या काळापासून निघालेल्या नियतकालिकांचा आढावा घेत साहित्य संघाच्या युगवाणीचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. ऑनलाईन नियतकालिके, पारंपरिक ते ऑनलाईन रूपांतर, त्याचा वाचक वर्ग आणि त्याची शाश्वतता यावर देखील त्यांनी चर्चा केली. रूपरेखा ओमप्रकाश नागर, तर प्रास्ताविक प्रफुल्ल शिलेदार यांनी केले.

मास्तरांना गुंतविले, ग्रंथालय संपले, वाचक कसे हाेतील : गवसपरिसंवादाच्या समाराेपीय सत्रात प्रसिद्ध साहित्यिक राजन गवस यांनी सरकारच्या धाेरणावर प्रश्न उपस्थित केले. मास्तरांना वेगवेगळ्या कामात गुंतविले, शाळेतील ग्रंथालये संपली आहेत, अशावेळी विद्यार्थी दशेतून वाचक कसे तयार हाेतील, असा गंभीर सवाल त्यांनी उपस्थित केला. देशातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना गवस म्हणाले, काेणत्याही विचारधारेच्या लाेकांनी एकमेकांचे पटत नसले तरी एका मंचावर वैचारिक चर्चा घडवावी. वैचारिक अस्पृश्यता अतिशय अयोग्य आहे. संवादाने विचार विकसित होतात म्हणून वाद-प्रतिवादाला नियतकालिकांत जागा हवी. आज ती नसल्याने लवकर भावना दुखावण्याचा काळ आला व निखळ निकोपता लयाला गेली, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

दोन अभ्यासपूर्ण सत्रे

परिसंवादाच्या निमित्ताने ‘साहित्यिक नियतकालिके’ व ‘वैचारिक नियतकालिके’ अशा दोन अभ्यासपूर्ण सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. प्रमाेद मुनघाटे यांच्या अध्यक्षतेत साहित्यिक नियतकालिके हे सत्र झाले. यात गणेश सातपुते यांनी देशातील नियतकालिकांचा इतिहास उलगडला. आसाराम लोमटे यांनी सद्यस्थितीवर भाष्य करताना वाचन संस्कृती व गंभीर वाचक नाहीत, ही टीका अयाेग्य असल्याचे म्हटले. नवीन पिढीमध्ये जाणून घेण्याची जिज्ञासा आहे पण ती त्यांच्या मार्गाने पाेहचवावी लागेल, अशी भावना व्यक्त केली. राजेंद्र डाेळके यांच्या अध्यक्षतेत वैचारिक नियतकालिके हे सत्र झाले. यात सहभागी झालेल्या अरुणा सबाने यांनी सामाजिक चेतना व नियतमालिके आणि रुविंद्र रुक्मणी पंढरीनाथ यांनी ‘राजकीय जाणीवा आणि नियतकालिके’ या विषयावर विचार व्यक्त केले.

टॅग्स :nagpurनागपूर