शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणक्षेत्रात सकारात्मक परिवर्तन हवे

By admin | Updated: November 26, 2014 01:04 IST

आपल्या देशात शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना नवीन मार्गाचा शोध आहे. जुन्या प्रणालीला ते कुठेतरी कंटाळले आहेत. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात सकारात्मक परिवर्तन व्हायला हवे.

मोहन भागवत : पुनरुत्थान विद्यापीठाच्या विद्वत परिषदेला प्रारंभनागपूर : आपल्या देशात शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना नवीन मार्गाचा शोध आहे. जुन्या प्रणालीला ते कुठेतरी कंटाळले आहेत. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात सकारात्मक परिवर्तन व्हायला हवे. परंतु हे परिवर्तन होत असताना नवीन समस्या उत्पन्न होणार नाही याचीदेखील काळजी घेण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. केंद्रातील भाजपा सरकारला शैक्षणिक सुधारणांसाठी त्यांनी अप्रत्यक्षपणे संदेशच दिला आहे. गुजरात पुनरुत्थान विद्यापीठाच्यावतीने रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरातील महर्षी व्यास सभागृह येथे दोन दिवसीय अखिल भारतीय विद्वत परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ‘शिक्षणाच्या वर्तमान स्थितीत करणीय कार्य’ या विषयावर सरसंघचालक बोलत होते.शिक्षणामुळे संपूर्ण पिढीला आणि पर्यायाने राष्ट्राला दिशा मिळते. देशातील ब्रिटिशकालीन शिक्षणव्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता असून भारतीय संस्कृतीच्या मूल्यांचा यात समावेश करायला हवा. आपले पारंपरिक ज्ञान आपण हरवले आहे. त्याला समजून आत्मसात करावे लागेल. याकरिता चिंतनासोबतच चळवळ उभारावी लागेल, असे डॉ.भागवत म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष गोविंदप्रभू महाराज यांनी आपले विचार मांडले. शिक्षणात व्यवहार, आदर्श आणि प्रेम या मूल्यांचा समन्वय हवा. आधुनिक शिक्षणप्रणाली ही चेतना, स्वाभिमान व संबंध यांची कत्तल करत आहे. यात बदल होणे आवश्यकच आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.परिषदेत देशभरातील तब्बल ३५० प्रतिनिधी सहभागी झाले असून यात निरनिराळ्या विद्यापीठांचे कुलगुरू व प्राध्यापकांचा सहभाग आहे. या परिषदेच्या माध्यमाने राष्ट्रीय शिक्षणाची संकल्पना व स्वरूप, राष्ट्र, राष्ट्रीयता आणि राष्ट्रीय शिक्षण या विषयांवर वैचारिक मंथन होणार आहे. पुनरुत्थान विद्यापीठाच्या संयोजिका इंदूमती काटदरे या यावेळी उपस्थित होत्या. सहसंयोजक दिलीप केळकर यांनी प्रस्तावना मांडली. (प्रतिनिधी)शिक्षकांमध्ये जागृती हवी जगाचे लक्ष आपल्या देशाकडे लागले आहे. आपला व्यक्ती बाहेर गेल्यावर त्याला शिकायला मिळाले पाहिजे. यासाठी शिक्षणातील स्थापित विचारांना धक्का द्यावा लागेल. विशेषत: शिक्षकांमध्ये जागृती निर्माण करावी लागेल. ते शिक्षण व्यवस्थेचा कणा आहेत शिवाय पारंपरिक शिक्षणप्रणालीत काम करणाऱ्या संघटनेबाहेरील व्यक्तींजवळ जाऊन प्रयोग, अनुभव यांचे आदानप्रदान करावे लागेल, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.