शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

शिक्षणक्षेत्रात सकारात्मक परिवर्तन हवे

By admin | Updated: November 26, 2014 01:04 IST

आपल्या देशात शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना नवीन मार्गाचा शोध आहे. जुन्या प्रणालीला ते कुठेतरी कंटाळले आहेत. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात सकारात्मक परिवर्तन व्हायला हवे.

मोहन भागवत : पुनरुत्थान विद्यापीठाच्या विद्वत परिषदेला प्रारंभनागपूर : आपल्या देशात शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना नवीन मार्गाचा शोध आहे. जुन्या प्रणालीला ते कुठेतरी कंटाळले आहेत. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात सकारात्मक परिवर्तन व्हायला हवे. परंतु हे परिवर्तन होत असताना नवीन समस्या उत्पन्न होणार नाही याचीदेखील काळजी घेण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. केंद्रातील भाजपा सरकारला शैक्षणिक सुधारणांसाठी त्यांनी अप्रत्यक्षपणे संदेशच दिला आहे. गुजरात पुनरुत्थान विद्यापीठाच्यावतीने रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरातील महर्षी व्यास सभागृह येथे दोन दिवसीय अखिल भारतीय विद्वत परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ‘शिक्षणाच्या वर्तमान स्थितीत करणीय कार्य’ या विषयावर सरसंघचालक बोलत होते.शिक्षणामुळे संपूर्ण पिढीला आणि पर्यायाने राष्ट्राला दिशा मिळते. देशातील ब्रिटिशकालीन शिक्षणव्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता असून भारतीय संस्कृतीच्या मूल्यांचा यात समावेश करायला हवा. आपले पारंपरिक ज्ञान आपण हरवले आहे. त्याला समजून आत्मसात करावे लागेल. याकरिता चिंतनासोबतच चळवळ उभारावी लागेल, असे डॉ.भागवत म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष गोविंदप्रभू महाराज यांनी आपले विचार मांडले. शिक्षणात व्यवहार, आदर्श आणि प्रेम या मूल्यांचा समन्वय हवा. आधुनिक शिक्षणप्रणाली ही चेतना, स्वाभिमान व संबंध यांची कत्तल करत आहे. यात बदल होणे आवश्यकच आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.परिषदेत देशभरातील तब्बल ३५० प्रतिनिधी सहभागी झाले असून यात निरनिराळ्या विद्यापीठांचे कुलगुरू व प्राध्यापकांचा सहभाग आहे. या परिषदेच्या माध्यमाने राष्ट्रीय शिक्षणाची संकल्पना व स्वरूप, राष्ट्र, राष्ट्रीयता आणि राष्ट्रीय शिक्षण या विषयांवर वैचारिक मंथन होणार आहे. पुनरुत्थान विद्यापीठाच्या संयोजिका इंदूमती काटदरे या यावेळी उपस्थित होत्या. सहसंयोजक दिलीप केळकर यांनी प्रस्तावना मांडली. (प्रतिनिधी)शिक्षकांमध्ये जागृती हवी जगाचे लक्ष आपल्या देशाकडे लागले आहे. आपला व्यक्ती बाहेर गेल्यावर त्याला शिकायला मिळाले पाहिजे. यासाठी शिक्षणातील स्थापित विचारांना धक्का द्यावा लागेल. विशेषत: शिक्षकांमध्ये जागृती निर्माण करावी लागेल. ते शिक्षण व्यवस्थेचा कणा आहेत शिवाय पारंपरिक शिक्षणप्रणालीत काम करणाऱ्या संघटनेबाहेरील व्यक्तींजवळ जाऊन प्रयोग, अनुभव यांचे आदानप्रदान करावे लागेल, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.