शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

तूर्त नागपूर शहरात पाणीकपात नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 21:38 IST

दिवसेंदिवस शहरातील पाणीसमस्या वाढत आहे. प्रकल्प कोरडे पडल्याने मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा आहे. तोतलाडोहातील डेड स्टॉकमधील पाण्यात सातत्याने घट होत आहे. अशा परिस्थितीत पाणी वाचविण्यासाठी पुरवठ्यात कपात हाच एकमेव पर्याय आहे. परंतु मनपातील पदाधिकारी व भाजपा नेत्यांनी बचावात्मक भूमिका घेतली आहे. डेड स्टॉक संपला तर दिवसाआड तर दूरच शहराचा पाणीपुरवठा ठप्प होण्याचा गंभीर धोका आहे. याचा विचार करता पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी सोमवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय वा पाणीपुरवठ्यात कपात करण्यासंदर्भात निर्णय झाला नाही. २० जूनपर्यंत पाणीपुरवठा यथावत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र पाणीटंचाईसंदर्भात सर्वच चितिंत आहेत. शहरात २००६ नंतर प्रथमच कच्चे पाणी उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांसोबत मनपा पदाधिकारी व अधिकाऱ्यांची चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवसेंदिवस शहरातील पाणीसमस्या वाढत आहे. प्रकल्प कोरडे पडल्याने मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा आहे. तोतलाडोहातील डेड स्टॉकमधील पाण्यात सातत्याने घट होत आहे. अशा परिस्थितीत पाणी वाचविण्यासाठी पुरवठ्यात कपात हाच एकमेव पर्याय आहे. परंतु मनपातील पदाधिकारी व भाजपा नेत्यांनी बचावात्मक भूमिका घेतली आहे. डेड स्टॉक संपला तर दिवसाआड तर दूरच शहराचा पाणीपुरवठा ठप्प होण्याचा गंभीर धोका आहे. याचा विचार करता पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी सोमवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे.सूत्रांच्या माहितीनुसार दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय वा पाणीपुरवठ्यात कपात करण्यासंदर्भात निर्णय झाला नाही. २० जूनपर्यंत पाणीपुरवठा यथावत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र पाणीटंचाईसंदर्भात सर्वच चितिंत आहेत. शहरात २००६ नंतर प्रथमच कच्चे पाणी उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत.शहराच्या पाणीपुरवठ्यात सध्याच कपात केली जाणार नाही. मात्र कच्चे पाणी उपलब्ध होण्यात अडचणी येत आहे. मान्सूनच्या आगमनावर सर्वकाही निर्भर राहणार असल्याचे बैठकीला उपस्थित जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके यांनी सांगितले. पुढील काही दिवसात पाऊ स झाला तर कच्च्या पाण्याची समस्या सुटेल. तोतलाडोहातील आरक्षित डेड स्टॉकमधून जूनपर्यंत शहराला पाणीपुरवठा होऊ शकतो.जलवाहिनीसाठी सरकार ८० कोटी देणारनवेगाव खैरी प्रकल्पाचा उजवा कालवा ते कन्हान नदीतील इन्टेक वेल अशी ४४.७ कि.मी. लांबीची जलवाहिनी टाकली जाणार आहे. यासाठी १७ कि.मी.पर्यंत सर्वे करण्यात आला. सध्या कालव्याव्दारे पाणी आणले जाते. जलवाहिनीच्या माध्यमातून पाणी आणल्यास ४० एमएलडी पाण्याची बचत होईल. यासाठी लागणारा निधी राज्य सरकारकडून उपलब्ध करण्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिल्याची माहिती झलके यांनी दिली. सर्वे तातडीने पूर्ण करून प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला जाईल. प्रस्तावानुसार यासाठी राज्य सरकारकडून ८० कोटी मिळणार आहे.कन्हान येथे एक्सप्रेस फीडरकन्हान जलशुद्धिकरण केंद्राच्या ठिकाणी एक्स्प्रेस फीडर नसल्याने वीज पुरवठा वारंवार बाधित होतो. एक्स्प्रेस फीडरसाठी तीन कोटींचा खर्च असल्याची माहिती महावितरणने दिली होती. मात्र पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने १.३० कोटीत एक्स्प्रेस फीडर उभारण्याची तयारी महावितरणने दर्शविली आहे. मंगळवारी ही रक्कम महापालिका महावितरणच्या खात्यात जमा करणार आहे.

 

 

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेWaterपाणीNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका