शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

सरकारी तपासणी केंद्रांवर तीन दिवस ‘आरटीपीसीआर’ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र शासनातर्फे टेस्टिंग आणि ट्रेसिंगवर जोर देण्यात येत आहे. नागपुरात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र शासनातर्फे टेस्टिंग आणि ट्रेसिंगवर जोर देण्यात येत आहे. नागपुरात रविवारी रेकॉर्ड २६ हजारांहून अधिक चाचण्या झाल्या. परंतु पुढील तीन दिवस चाचण्या रामभरोसेच राहणार आहेत. १२ आणि १४ एप्रिल रोजी सरकारी केंद्रांवर ‘आरटीपीसीआर’ चाचणी होणार नाही. तर १३ एप्रिल लोजी गुढीपाडव्यामुळे चाचणी केंद्र बंद राहतील. मनपाने यासंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे. अचानकपणे चाचण्यांना ‘ब्रेक’ लावण्याचे नेमके कारण काय आणि संसर्ग बेलगाम झाल्यानंतर बाधितांमध्ये आणखी वाढ झाली तर याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यामुळे ‘आरटीपीसीआर’ चाचण्यांचे अहवाल मिळायला विलंब होत आहे. या ‘बॅकलॉग’ला पूर्ण करणे व इतर काही तांत्रिक कारणांमुळे सरकारी चाचणी केंद्रांवर सोमवार व बुधवारी केवळ ‘रॅपिड ॲन्टिजेन’ चाचणीच होईल. प्रशासकीय पातळीवर अधिकारी व मंत्रीदेखील चाचण्यांच्या विश्वसनीयतेवर प्रश्न उपस्थित करत आहेत. ॲन्टिजेनच्या अहवालाला अंतिम मानले जाऊ शकत नाही.

लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी विशेष व्यवस्था करणार : आयुक्त

‘कोरोना’ चाचण्यांची संख्या वाढल्यामुळे मेडिकल, मेयो, एम्स, नागपूर विद्यापीठातील प्रयोगशाळांवर ओझे वाढले आहे. यामुळेच चाचणीचा अहवाल मिळण्यास दोन ते तीन दिवस लागत आहेत. या प्रयोगशाळांचा बॅकलॉग पूर्ण करण्यासाठी सोमवारी व बुधवारी सर्व ४२ शासकीय चाचणी केंद्रांवर केवळ रॅपिड ॲन्टिजेन चाचण्या होतील. केवळ लक्षणे असलेल्या रुग्णांची ॲन्टिजेन चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांच्या ‘आरटीपीसीआर’ चाचणीची विशेष व्यवस्था करण्यात येईल, असे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी स्पष्ट केले.