शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

डोकलाममध्ये कसलाही तणाव नाही, बांधकामविषयक बातम्या या केवळ अफवा; व्ही.के.सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 18:15 IST

डोकलामनजीक सीमेवर चीनकडून विविध बांधकामे सुरू असल्याची बाब ही केवळ अफवा आहे. डोकलाममध्ये सद्यस्थितीत कुठलेही तणावाचे वातावरण नसून सर्व काही सुरळीत सुरू आहे, असा दावा केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री जनरल (निवृत्त) व्ही.के.सिंह यांनी केला आहे.

ठळक मुद्देदेशातील शिक्षणप्रणालीत बदल हवाअण्णांच्या आंदोलनात जाणार नाहीशिक्षणाचा बाजार थांबला पाहिजे

आॅनलाईन लोकमतनागपूर : डोकलामनजीक सीमेवर चीनकडून विविध बांधकामे सुरू असल्याची बाब ही केवळ अफवा आहे. डोकलाममध्ये सद्यस्थितीत कुठलेही तणावाचे वातावरण नसून सर्व काही सुरळीत सुरू आहे, असा दावा केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री जनरल (निवृत्त) व्ही.के.सिंह यांनी केला आहे. सहाव्या आंतरराष्ट्रीय प्राचार्य शैक्षणिक संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.सिव्हील लाईन्स येथील चिटणवीस सेंटर येथे आयोजित या कार्यक्र माला प्रमुख पाहुणे म्हणून महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ.विकास आमटे, परिषदेचे ‘पॅट्रन’ देवेंद्र दस्तुरे, निमंत्रक डॉ.मृणालिनी दस्तुरे, रसिका दस्तुरे प्रामुख्याने उपस्थित होते.डोकलाम परिसरातून चीनने माघार घेतली असली तरी सीमेपासून जवळच चीनच्या सैनिकांनी तळ ठोकला आहे. तसेच त्या परिसरात चीनने ४०० मीटर उंचीची भिंत उभारली आहे, अशी माहिती समोर आली होती. यासंदर्भात विचारणा केली असता डोकलाम परिसरात चीनच्या काहीच हालचाली नाहीत. यासंदर्भात पुढे आलेली माहिती, बातम्या तथ्यावर आधारित नसून केवळ अफवा आहेत. त्यामुळे तूर्तास डोकलामवरून कुठल्याही द्विपक्षीय वादाची शक्यता नसल्याचे प्रतिपादन व्ही.के.सिंह यांनी केले.आपल्या देशातील शिक्षण प्रणालीत आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता आहे. अभ्यासक्रम, पुस्तके अक्षरश: संभ्रम वाढविणारी आहेत. भारताबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यापेक्षा इतर देशातील इतिहास, भौगोलिक-आर्थिक स्थिती यावर जास्त भर देण्यात येतो. या सर्वांची आवश्यकता नाही. अगोदर देशाबाबत विद्यार्थ्यांना कळले पाहिजे, असे व्ही.के.सिंह यांनी स्पष्ट केले. विविध देशातील ‘व्हिसा’ नियम बदलल्याचा फटका भारतीय ‘आयटी’ तज्ज्ञांना बसतो आहे. इतर देशांच्या नियमांवर आपण काही बोलू शकत नाही, मात्र त्यांच्या आर्थिक विकासात मौलिक वाटा उचलणाऱ्या भारतीयांच्या हक्कांच्या रक्षणासाठी मंत्रालय तत्पर असल्याचे त्यांनी सांगितले.शिक्षणाचा बाजार थांबला पाहिजेआज शिक्षणप्रणाली हा एक व्यवसाय झाला असून शिक्षण एखाद्या उत्पादनाप्रमाणे विकले जाते. ही बाब अयोग्य आहे. विद्यार्थी व शिक्षकांमधील संवादाचा व आपुलकीचा धागा तुटतो आहे. त्यामुळे मुलांमधील संयमदेखील सुटत चालला आहे. विद्यार्थ्यांमध्ये संयमाची वाढ व्हावी व प्रणालीवरील त्यांचा विश्वास वाढावा यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. शिक्षक प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना समजून घ्यावे, असे आवाहन व्ही.के.सिंह यांनी केले.अण्णांच्या आंदोलनात जाणार नाहीसैन्यातून निवृत्त झाल्यानंतर व्ही.के.सिंह यांनी समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासोबत विविध राज्यांची यात्रा केली होती. अण्णा हजारे जनलोकपालच्या मुद्यावर परत एकदा आंदोलन करणार आहेत. यावेळी अण्णांच्या आंदोलनात जाणार नसल्याचे व्ही.के.सिंह यांनी स्पष्ट केले. मी आता राजकारणात आहे व राजकारणी व्यक्तीने आंदोलनात समाविष्ट व्हायला नको, अशी अण्णांची अगोदरपासूनची भूमिका आहे, असे सिंह यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणDoklamडोकलाम