शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

वाघ वगळता इतर प्राण्यांच्या संवर्धनासाठी यंत्रणाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 11:41 IST

wildlife Nagpur News वाघांची संख्या कमालीची वाढली असून त्याचे आकडेही जारी झाले आहेत पण व्याघ्र संवर्धन करताना इतर प्राण्यांच्या संवर्धनाकडे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते.

ठळक मुद्देकधी गणनाच झाली नाहीहरीण, अस्वल, कोल्हे, लांडगे आहेत किती?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : व्याघ्र संवर्धनात भारताने मोठी कामगिरी बजावली ही अभिमानाची बाब आहे. वाघांची संख्या कमालीची वाढली असून त्याचे आकडेही जारी झाले आहेत पण व्याघ्र संवर्धन करताना इतर प्राण्यांच्या संवर्धनाकडे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. अन्नसाखळीचा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या या प्राण्यांची कधी गणनाच होत नाही. त्यामुळे राज्यात हरीण, अस्वल, कोल्हे, लांडगे किती, या प्रश्नाचे उत्तर वनविभाग आणि कोणत्याही यंत्रणेकडे नाही.

निसर्गाचा प्रत्येक घटक हा अन्नसाखळीत आणि जैवविविधतेत अतिशय महत्त्वाचा असतो. म्हणून त्यांच्या अस्तित्वाची नोंद घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे, तरच त्यांच्या संवर्धनाबाबत दिशा ठरविता येईल. रुबाबदार वाघ दुर्मिळ होत चालल्यानंतर यंत्रणेला जाग आली आणि त्याच्या संवर्धनाच्या हालचाली सुरू झाल्या. अशाप्रकारे अनेक प्राण्यांचे अस्तित्व लोप पावत आहे आणि त्याकडे कुणाचे गांभीर्याने लक्षही गेले नाही. म्हणूनच १९९८ मध्ये ४५ हजारांवर असलेली बिबट्यांची संख्या ७ हजारांवर खाली आली. त्यामुळे आता राज्य शासनाने त्यांच्या संवर्धनाबाबत पुढाकार घेतला आहे.

वन्यजीव अभ्यासक यादव तरटे पाटील यांच्या मते, पूर्वी गावस्तरावर लोकांच्या ओळखीचे वाटणारे चौसिंगा, सांभार, कोल्हे, लांडगे, खोकड, खवले मांजर, रानमांजर, अस्वल, तडस, मसन्या उद, चांदी अस्वल, भेडकी या प्राण्यांचे अस्तित्व आता नाहीसे होताना दिसत आहे. यातील लांडगे, कोल्हे व खवले मांजर यांचे अस्तित्व धोकादायक स्थितीत पोहचले आहे. पेंच अभयारण्यात नीलगाय, सांभार किंवा नवेगाव नागझिरामध्ये रानकुत्र्यांबाबत अंदाजे सांगण्यात येते, मात्र त्यांचीही ठोस गणना न झाल्याचे वनविभागाचे अधिकारी मान्य करतात. वन्यजीव अभ्यासक बंडू धोत्रे यांनीही वाघ वगळता इतर प्राण्यांची गांभीर्याने गणना होत नसल्याची खंत व्यक्त केली आहे.

वाघांप्रमाणेच इतर प्राण्यांचीही गणना होऊ शकते. यासाठी वॉटर होल सेन्सस म्हणजेच पाणवठ्यावरील प्राण्यांची मोजदाद करणे शक्य आहे. विशिष्ट परिसर आखून केलेल्या ट्रान्झॅक लाईन मेथडनेही गणना केली जाऊ शकते. याशिवाय कॅमेरा ट्रॅपद्वारेसुद्धा प्राण्यांची गणना करणे शक्य होऊ शकते.- यादव तरटे पाटील, वन्यजीव अभ्यासक

टॅग्स :wildlifeवन्यजीव