शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

धान्याचे एकही पोते खराब झाले नाही

By admin | Updated: November 16, 2014 00:46 IST

‘एफसीआय’च्या (फूड कॉर्पोरेशन आॅफ इंडिया) गोदामांत जागा नसल्याने बाहेर ठेवलेल्या धान्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी होण्याचे प्रकार काही नवीन नाहीत. परंतु २०१३-१४ या वर्षात सर्व धान्य गोदामातच

२०१३-१४ वर्षाची आकडेवारी : ‘एफसीआय’ प्रशासनाचा दावानागपूर : ‘एफसीआय’च्या (फूड कॉर्पोरेशन आॅफ इंडिया) गोदामांत जागा नसल्याने बाहेर ठेवलेल्या धान्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी होण्याचे प्रकार काही नवीन नाहीत. परंतु २०१३-१४ या वर्षात सर्व धान्य गोदामातच ठेवण्यात आले असून एकही पोते धान्य खराब झाले नसल्याचा दावा ‘एफसीआय’च्या जिल्हा कार्यालयाकडून करण्यात आला आहे. माहितीच्या अधिकाराच्या विवरणात ही माहिती देण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे २०१० ते २०१२ या कालावधीत हजारो पोती गहू व तांदूळ गोदामाबाहेर ठेवण्यात आला होता. अशा स्थितीत ‘एफसीआय’च्या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.१ डिसेंबर २०१३ ते ३० आॅगस्ट २०१४ या कालावधीत ‘एफसीआय’च्या नागपूर येथील जिल्हा कार्यालयात किती धान्य साठविण्यात आले, हे धान्य कोणत्या प्रकारचे होते आणि त्याची किंमत काय होती, किती धान्य गोदामाबाहेर ठेवण्यात आले व उंदीर-घुशींमुळे किती धान्य खराब झाले यासंदर्भात विचारणा करण्यात आली होती. यावर ‘एफसीआय’कडून सविस्तर उत्तर देण्यात आले. ‘एफसीआय’ अजनी येथे धान्य साठविण्यासाठी मोठी २१ तर ५ लहान गोदामं आहेत. १ जानेवारी १३ रोजी येथे ४३,१७३.४३० मेट्रिक टन गहू तर २०७७२.२४७ मेट्रिक टन तांदळाचा साठा होता. ३० आॅगस्ट २०१४ रोजी हाच साठा अनुक्रमे ३४,२४४.७१२ मेट्रिक टन व २६,८७०.४२३ मेट्रिक टन इतका होता. २०१३-१४ या कालावधीत गव्हाची किंमत १,७४० रुपये प्रति क्विंटल तर तांदळाचे दर २,५१० रुपये प्रति क्विंटल इतके असल्याची माहिती देण्यात आली.दरम्यान, या कालावधीत धान्याचे एकही पोते गोदामाबाहेर ठेवण्यात आले नाही व कुठल्याही प्रकारचे नुकसान झाले नाही असे ‘एफसीआय’तर्फे सांगण्यात आले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे २०१२-१३ या कालावधीत तर गहू-तांदळाची हजारो पोती गोदामाबाहेर होती. तरीदेखील धान्य अजिबात खराब झाले नव्हते असा दावा ‘एफसीआय’ने केला होता. (प्रतिनिधी)