शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
2
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
3
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
4
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
5
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
6
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
7
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
9
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
10
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
11
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
12
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
13
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
14
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
15
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
16
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
17
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
18
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
19
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

अधिकारी म्हणतात टंचाई नाहीच; मग चारा गेला कुठे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 11:09 IST

जिल्ह्यातील तीन दुष्काळग्रस्त तालुक्यात चारा टंचाई मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. जिल्ह्यात चाऱ्यासाठी पशुपालकांची भटकंती पहिल्यांदाच होत असून, मराठवाड्यासारख्या चारा छावणीची गरज आहे.

ठळक मुद्देजनावरांची तडफड दुष्काळग्रस्त तालुक्याची विदारक अवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यातील तीन दुष्काळग्रस्त तालुक्यात चारा टंचाई मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. जिल्ह्यात चाऱ्यासाठी पशुपालकांची भटकंती पहिल्यांदाच होत असून, मराठवाड्यासारख्या चारा छावणीची गरज आहे. जनावरांचे पोट भरण्यासाठी गावागावात तणसाच्या पेंढ्या ट्रकने येत आहे. अशी स्थिती असताना पशुसंवर्धन विभागाच्या कागदावर तीनही दुष्काळग्रस्त तालुक्यात १,२३, ०९५.७२ मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे. पशुपालक ट्रक भरून भरून तणस आणत असेल, तर हा चारा गेला कुठे? असा सवाल पशुपालकांकडून होत आहे.नागपूर जिल्ह्यात काटोल, कळमेश्वर आणि नरखेड तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित केले आहे. दुष्काळाचा फटका जनावरांना चांगलाच बसत आहे. या तीनही तालुक्यात आजच्या घडीला जनावरांसाठी वैरण राहिलेले नाही.पशुसंवर्धन विभागाच्या माहितीनुसार काटोलमध्ये ७८२८७, कळमेश्वरमध्ये ४७४४८ व नरखेडमध्ये ६९८७३ जनावर नोंदणीकृत आहे. पशुसंवर्धन विभागाने या जनावरांसाठी ४८ दिवसाला लागणाºया वैरणाचे आकडेही दिले आहे. यात काटोल तालुक्यात १४१६९.६, कळमेश्वरमध्ये ८७१४.४ व नरखेडमध्ये १३०५९.८४ मेट्रिक टन लागते आहे. आजच्या घडीला विविध माध्यमातून उपलब्ध मुबलक वैरण उपलब्ध असल्याचे विभागाच्या अधिकाऱ्यांचे आकडे बोलतात. काटोलमध्ये ४८७१८.६० मेट्रिक टन, कळमेश्वरमध्ये २८८०२.६२ मेट्रिक टन व नरखेडमध्ये ४५५७४.५० मेट्रिक टन एवढे वैरण पशुसंवर्धन विभागाच्या कागदावर आहे. त्यामुळे काटोलात केवळ तीन तीन दिवस, कळमेश्वरमध्ये नऊ दिवस व नरखेडमध्ये एक दिवस चाऱ्याची तूट भासणार असल्याचा स्थानिक पशुधन अधिकाऱ्यांनी अहवाल दिला आहे.ही सर्व आकडेवारी फोल असल्याचे स्थानिक पशुपालकांचे म्हणणे आहे. जनावरांसाठी मध्यप्रदेशातील छिंदवाडा व बैतूल जिल्ह्यातून कुटार आणावे लागत आहे. भंडारा जिल्ह्यातून तणस मोठ्या प्रमाणावर आणले जात आहे.एका एका गावात १० ते १२ गाड्या दररोज तणसाच्या येत आहे. एका एका गाडीवर ८ ते १० हजार रुपये पशुपालकाला खर्च करावे लागत आहे. जनावर जगवावी या विवंचनेत पशुपालक असताना, विभागाच्या खोट्या आकडेवारीमुळे पशुपालकांनी संताप व्यक्त केला आहे.

टंचाई नसेल तर चारा अधिकाऱ्यांनी उपलब्ध करावाजानेवारी महिन्यापासून चारा टंचाई भेडसावत आहे. आता तर तालुक्यातील चाराच संपला आहे. माझ्याकडे २०० जनावरं आहे. त्यांना खाऊ घालण्यासाठी २५ गाड्या तणसाच्या बोलाविल्या आहे. अधिकारी जर चाऱ्याची टंचाई नाही, असे म्हणत असेल, तर त्यांनी चारा उपलब्ध करून द्यावा.- इशाक बुराडे, पशुपालकपहिल्यांदाच असा दुष्काळ काटोल तालुक्यात अनुभवत आहे. अधिकारी केवळ कार्यालयात बसून दुष्काळाचे नियोजन करीत आहे. जनावरे भुकेने आजारी पडत आहे. पशुपालकांनी जनावर बाजारात विकायला काढली आहे. चारा टंचाई नाही, असे म्हणणाऱ्या अधिकाऱ्यांनी गावात यावे, जनावरांची अवस्था बघावी. दुष्काळ असतानाही अधिकाऱ्यांकडून अहवालात दुष्काळ दाखविला जात नाही. जनावरे मरो अधिकाऱ्यांना काही घेणेदेणे नाही. अधिकाऱ्यांच्या अहवालात चारा टंचाई नसली तरी, आम्ही जिल्हाधिकाऱ्यांक डे चारा छावणीसाठी मागणी केली आहे.- चंद्रशेखर चिखले,माजी उपाध्यक्ष, जि.प. नागपूर

टॅग्स :agricultureशेती