शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
3
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
4
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
5
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
6
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
8
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
9
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
10
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
11
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
12
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
13
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
14
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
15
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
16
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
17
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
18
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
19
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
20
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू

अधिकारी म्हणतात टंचाई नाहीच; मग चारा गेला कुठे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 11:09 IST

जिल्ह्यातील तीन दुष्काळग्रस्त तालुक्यात चारा टंचाई मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. जिल्ह्यात चाऱ्यासाठी पशुपालकांची भटकंती पहिल्यांदाच होत असून, मराठवाड्यासारख्या चारा छावणीची गरज आहे.

ठळक मुद्देजनावरांची तडफड दुष्काळग्रस्त तालुक्याची विदारक अवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यातील तीन दुष्काळग्रस्त तालुक्यात चारा टंचाई मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. जिल्ह्यात चाऱ्यासाठी पशुपालकांची भटकंती पहिल्यांदाच होत असून, मराठवाड्यासारख्या चारा छावणीची गरज आहे. जनावरांचे पोट भरण्यासाठी गावागावात तणसाच्या पेंढ्या ट्रकने येत आहे. अशी स्थिती असताना पशुसंवर्धन विभागाच्या कागदावर तीनही दुष्काळग्रस्त तालुक्यात १,२३, ०९५.७२ मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे. पशुपालक ट्रक भरून भरून तणस आणत असेल, तर हा चारा गेला कुठे? असा सवाल पशुपालकांकडून होत आहे.नागपूर जिल्ह्यात काटोल, कळमेश्वर आणि नरखेड तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित केले आहे. दुष्काळाचा फटका जनावरांना चांगलाच बसत आहे. या तीनही तालुक्यात आजच्या घडीला जनावरांसाठी वैरण राहिलेले नाही.पशुसंवर्धन विभागाच्या माहितीनुसार काटोलमध्ये ७८२८७, कळमेश्वरमध्ये ४७४४८ व नरखेडमध्ये ६९८७३ जनावर नोंदणीकृत आहे. पशुसंवर्धन विभागाने या जनावरांसाठी ४८ दिवसाला लागणाºया वैरणाचे आकडेही दिले आहे. यात काटोल तालुक्यात १४१६९.६, कळमेश्वरमध्ये ८७१४.४ व नरखेडमध्ये १३०५९.८४ मेट्रिक टन लागते आहे. आजच्या घडीला विविध माध्यमातून उपलब्ध मुबलक वैरण उपलब्ध असल्याचे विभागाच्या अधिकाऱ्यांचे आकडे बोलतात. काटोलमध्ये ४८७१८.६० मेट्रिक टन, कळमेश्वरमध्ये २८८०२.६२ मेट्रिक टन व नरखेडमध्ये ४५५७४.५० मेट्रिक टन एवढे वैरण पशुसंवर्धन विभागाच्या कागदावर आहे. त्यामुळे काटोलात केवळ तीन तीन दिवस, कळमेश्वरमध्ये नऊ दिवस व नरखेडमध्ये एक दिवस चाऱ्याची तूट भासणार असल्याचा स्थानिक पशुधन अधिकाऱ्यांनी अहवाल दिला आहे.ही सर्व आकडेवारी फोल असल्याचे स्थानिक पशुपालकांचे म्हणणे आहे. जनावरांसाठी मध्यप्रदेशातील छिंदवाडा व बैतूल जिल्ह्यातून कुटार आणावे लागत आहे. भंडारा जिल्ह्यातून तणस मोठ्या प्रमाणावर आणले जात आहे.एका एका गावात १० ते १२ गाड्या दररोज तणसाच्या येत आहे. एका एका गाडीवर ८ ते १० हजार रुपये पशुपालकाला खर्च करावे लागत आहे. जनावर जगवावी या विवंचनेत पशुपालक असताना, विभागाच्या खोट्या आकडेवारीमुळे पशुपालकांनी संताप व्यक्त केला आहे.

टंचाई नसेल तर चारा अधिकाऱ्यांनी उपलब्ध करावाजानेवारी महिन्यापासून चारा टंचाई भेडसावत आहे. आता तर तालुक्यातील चाराच संपला आहे. माझ्याकडे २०० जनावरं आहे. त्यांना खाऊ घालण्यासाठी २५ गाड्या तणसाच्या बोलाविल्या आहे. अधिकारी जर चाऱ्याची टंचाई नाही, असे म्हणत असेल, तर त्यांनी चारा उपलब्ध करून द्यावा.- इशाक बुराडे, पशुपालकपहिल्यांदाच असा दुष्काळ काटोल तालुक्यात अनुभवत आहे. अधिकारी केवळ कार्यालयात बसून दुष्काळाचे नियोजन करीत आहे. जनावरे भुकेने आजारी पडत आहे. पशुपालकांनी जनावर बाजारात विकायला काढली आहे. चारा टंचाई नाही, असे म्हणणाऱ्या अधिकाऱ्यांनी गावात यावे, जनावरांची अवस्था बघावी. दुष्काळ असतानाही अधिकाऱ्यांकडून अहवालात दुष्काळ दाखविला जात नाही. जनावरे मरो अधिकाऱ्यांना काही घेणेदेणे नाही. अधिकाऱ्यांच्या अहवालात चारा टंचाई नसली तरी, आम्ही जिल्हाधिकाऱ्यांक डे चारा छावणीसाठी मागणी केली आहे.- चंद्रशेखर चिखले,माजी उपाध्यक्ष, जि.प. नागपूर

टॅग्स :agricultureशेती