शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

अधिकारी म्हणतात टंचाई नाहीच; मग चारा गेला कुठे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 11:09 IST

जिल्ह्यातील तीन दुष्काळग्रस्त तालुक्यात चारा टंचाई मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. जिल्ह्यात चाऱ्यासाठी पशुपालकांची भटकंती पहिल्यांदाच होत असून, मराठवाड्यासारख्या चारा छावणीची गरज आहे.

ठळक मुद्देजनावरांची तडफड दुष्काळग्रस्त तालुक्याची विदारक अवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यातील तीन दुष्काळग्रस्त तालुक्यात चारा टंचाई मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. जिल्ह्यात चाऱ्यासाठी पशुपालकांची भटकंती पहिल्यांदाच होत असून, मराठवाड्यासारख्या चारा छावणीची गरज आहे. जनावरांचे पोट भरण्यासाठी गावागावात तणसाच्या पेंढ्या ट्रकने येत आहे. अशी स्थिती असताना पशुसंवर्धन विभागाच्या कागदावर तीनही दुष्काळग्रस्त तालुक्यात १,२३, ०९५.७२ मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे. पशुपालक ट्रक भरून भरून तणस आणत असेल, तर हा चारा गेला कुठे? असा सवाल पशुपालकांकडून होत आहे.नागपूर जिल्ह्यात काटोल, कळमेश्वर आणि नरखेड तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित केले आहे. दुष्काळाचा फटका जनावरांना चांगलाच बसत आहे. या तीनही तालुक्यात आजच्या घडीला जनावरांसाठी वैरण राहिलेले नाही.पशुसंवर्धन विभागाच्या माहितीनुसार काटोलमध्ये ७८२८७, कळमेश्वरमध्ये ४७४४८ व नरखेडमध्ये ६९८७३ जनावर नोंदणीकृत आहे. पशुसंवर्धन विभागाने या जनावरांसाठी ४८ दिवसाला लागणाºया वैरणाचे आकडेही दिले आहे. यात काटोल तालुक्यात १४१६९.६, कळमेश्वरमध्ये ८७१४.४ व नरखेडमध्ये १३०५९.८४ मेट्रिक टन लागते आहे. आजच्या घडीला विविध माध्यमातून उपलब्ध मुबलक वैरण उपलब्ध असल्याचे विभागाच्या अधिकाऱ्यांचे आकडे बोलतात. काटोलमध्ये ४८७१८.६० मेट्रिक टन, कळमेश्वरमध्ये २८८०२.६२ मेट्रिक टन व नरखेडमध्ये ४५५७४.५० मेट्रिक टन एवढे वैरण पशुसंवर्धन विभागाच्या कागदावर आहे. त्यामुळे काटोलात केवळ तीन तीन दिवस, कळमेश्वरमध्ये नऊ दिवस व नरखेडमध्ये एक दिवस चाऱ्याची तूट भासणार असल्याचा स्थानिक पशुधन अधिकाऱ्यांनी अहवाल दिला आहे.ही सर्व आकडेवारी फोल असल्याचे स्थानिक पशुपालकांचे म्हणणे आहे. जनावरांसाठी मध्यप्रदेशातील छिंदवाडा व बैतूल जिल्ह्यातून कुटार आणावे लागत आहे. भंडारा जिल्ह्यातून तणस मोठ्या प्रमाणावर आणले जात आहे.एका एका गावात १० ते १२ गाड्या दररोज तणसाच्या येत आहे. एका एका गाडीवर ८ ते १० हजार रुपये पशुपालकाला खर्च करावे लागत आहे. जनावर जगवावी या विवंचनेत पशुपालक असताना, विभागाच्या खोट्या आकडेवारीमुळे पशुपालकांनी संताप व्यक्त केला आहे.

टंचाई नसेल तर चारा अधिकाऱ्यांनी उपलब्ध करावाजानेवारी महिन्यापासून चारा टंचाई भेडसावत आहे. आता तर तालुक्यातील चाराच संपला आहे. माझ्याकडे २०० जनावरं आहे. त्यांना खाऊ घालण्यासाठी २५ गाड्या तणसाच्या बोलाविल्या आहे. अधिकारी जर चाऱ्याची टंचाई नाही, असे म्हणत असेल, तर त्यांनी चारा उपलब्ध करून द्यावा.- इशाक बुराडे, पशुपालकपहिल्यांदाच असा दुष्काळ काटोल तालुक्यात अनुभवत आहे. अधिकारी केवळ कार्यालयात बसून दुष्काळाचे नियोजन करीत आहे. जनावरे भुकेने आजारी पडत आहे. पशुपालकांनी जनावर बाजारात विकायला काढली आहे. चारा टंचाई नाही, असे म्हणणाऱ्या अधिकाऱ्यांनी गावात यावे, जनावरांची अवस्था बघावी. दुष्काळ असतानाही अधिकाऱ्यांकडून अहवालात दुष्काळ दाखविला जात नाही. जनावरे मरो अधिकाऱ्यांना काही घेणेदेणे नाही. अधिकाऱ्यांच्या अहवालात चारा टंचाई नसली तरी, आम्ही जिल्हाधिकाऱ्यांक डे चारा छावणीसाठी मागणी केली आहे.- चंद्रशेखर चिखले,माजी उपाध्यक्ष, जि.प. नागपूर

टॅग्स :agricultureशेती