शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

शासनाकडूनच खावटी अनुदान योजना सुरू करण्याबाबत निर्देश नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:06 IST

नागपूर : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जमातीच्या कुटुंबीयांना साहाय्य करण्यासाठी आदिवासी विकासमंत्र्यांनी खावटी योजना सुरू केली. त्यासंदर्भात ९ ...

नागपूर : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जमातीच्या कुटुंबीयांना साहाय्य करण्यासाठी आदिवासी विकासमंत्र्यांनी खावटी योजना सुरू केली. त्यासंदर्भात ९ सप्टेंबर २०२० रोजी शासन निर्णय निर्गमित केला. खावटी अनुदान योजनेसाठी ४८६ कोटी रुपयांची मंजुरी दिली. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाकडे २५५ कोटी जमाही केले. पण, अजूनही शासनाकडून खावटी अनुदान योजना सुरू करण्याबाबत निर्देशच नाही, असे महामंडळानेच स्पष्ट केले आहे. शासन निर्णय काढून ८ महिने लोटल्यानंतर खावटी मिळाली नसल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.

महाराष्ट्र शासनाने खावटी अनुदान योजनेंतर्गत ४ हजार रुपये आदिवासींच्या खात्यात जमा करण्यात येणार होते. परंतु, या निर्णयात बदल करून २ हजार रुपये रोख व २ हजार रुपये वस्तू स्वरूपात देण्यात येणार आहे. २००० रुपये रोख स्वरूपात मिळणारी खावटीची रक्कम काही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाल्याची माहिती आहे. परंतु, धान्य स्वरूपातील वस्तू आदिवासींच्या घरी पोहोचल्या नाही. यासंदर्भात माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार शासनाने १ वर्षासाठी योजना सुरू केली होती. ९ सप्टेंबर २०२० रोजी शासन निर्णय घेण्यात आला आणि ३० सप्टेंबर रोजी योजनेच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यासाठी ४८६ कोटी रुपये खर्चाला मंजुरी देण्यात आली. हा निधी कोषागार नाशिक यांच्याकडे जमा आहे. यातील २५५ कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित, नाशिक यांच्याकडे जमा करण्यात आला आहे. परंतु, महामंडळाला शासनाकडून खावटी अनुदान योजना सुरू करण्याबाबत निर्देशच नसल्याने महामंडळ योजनेचा लाभ लाभार्थ्यांना देऊ शकले नाही. तसेच खावटीत वस्तू स्वरूपात मिळणाऱ्या धान्याची निविदा प्रक्रिया अजूनही झाली नसल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे.

कोरोनाची दुसरी लाट संपण्याच्या मार्गावर असून अनेक आदिवासीबहुल गावांनी त्याची झळ सोसली आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमधून दिलासा मिळावा म्हणून मिळणारा किराणा अजूनही मिळाला नाही. किराणा साहित्याची निविदा अद्याप निघाली नाही.

- निविदा प्रक्रिया राबवून ठेकेदारांना खूश करणे व अर्थकारण करण्याचा प्रयत्न आहे. दिरंगाईमुळे गरज असताना आदिवासींना मदत मिळत नाही. सरसकट २००० रुपये आदिवासी बांधवांच्या बँक खात्यात जमा केले असते, तर ते त्यांनी आवश्यकतेप्रमाणे खर्च करू शकले असते.

दिनेश शेराम, अध्यक्ष, अ.भा. आदिवासी विकास परिषद