शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठीय संशोधनाला दिशाच नाही

By admin | Updated: February 14, 2016 02:55 IST

आपल्या देशातील विद्यापीठे, आयआयटी यांचा उद्योगक्षेत्राशी दुर्दैवाने हवा तसा समन्वय नाही.

नितीन गडकरी : ‘संशोधनातून पुनरुत्थान’ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोपनागपूर : आपल्या देशातील विद्यापीठे, आयआयटी यांचा उद्योगक्षेत्राशी दुर्दैवाने हवा तसा समन्वय नाही. येथे होणाऱ्या संशोधनाचा स्थानिकांना उपयोगच होत नाही व यासाठी प्रयत्नदेखील दिसून येत नाही. मुळात या संशोधनांना दिशाच मिळालेली नाही. ही स्थिती बदलण्याची गरज आहे, असे परखड मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. भारतीय शिक्षण मंडळातर्फे ‘व्हीएनआयटी’ येथे आयोजित ‘संशोधनातून पुनरुत्थान’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचा शनिवारी समारोप झाला. यावेळी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते.यावेळी केंद्र शासनाच्या ‘नीती’ आयोगाचे सदस्य डॉ.विजय कुमार सारस्वत, खा.अजय संचेती, ‘व्हीएनआयटी’च्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विश्राम जामदार, भारतीय शिक्षण मंडळाचे राष्ट्रीय महामंत्री वामन गोगटे हे प्रामुख्याने उपस्थित होते. आपल्या देशात संशोधन होत आहे. परंतु त्याचा उपयोग समाजाला कसा होईल याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. विद्यापीठांनी उद्योगक्षेत्राशी समन्वय व संवाद वाढवायला हवा. स्थानिक मुद्यांच्या आधारावर संशोधन झाले तर त्याचा फायदा जास्त प्रमामात होईल व यातून रोजगारनिर्मितीदेखील होऊ शकते. शहरीकरणामुळे ग्रामीण भारत व शहरांमधील दरी वाढत आहे. संशोधनातूनच या समस्येचे निराकरण होऊ शकते. अगदी टाकावू वस्तूलादेखील किंमत मिळवून देण्याची क्षमता संशोधनात आहे. याअगोदर ते अनेकदा सिद्धदेखील झाले आहे. त्यामुळे विविध चर्चासत्रे, परिषदांमध्ये जास्तीत जास्त वेळ घालविण्यापेक्षा ‘अप्लाईड’ संशोधनावर विद्वानांनी भर देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन गडकरी यांनी केले. यावेळी परिषदेच्या संयोजक डॉ.उज्ज्वला चक्रदेव यांनी परिषदेचा आढावा मांडला. आयोजन सहसचिव डॉ.लीना गहाणे यांनी संचालन केले तर आयोजन सचिव डॉ.अरविंद जोशी यांनी आभार मानले.परिषदेच्या अखेरच्या दिवश्ी ‘इस्रो’चे माजी अध्यक्ष डॉ.माधवन नायर, ‘बीएआरसी’चे वैज्ञानिक बी.एन.जगताप, ‘नीरी’चे माजी संचालक डॉ.सतीश वटे यांनी मार्गदर्शन केले. ‘इस्रो’मध्ये देशात शिक्षण घेतलेले अनेक वैज्ञानिक आहेत. अवकाशीय विज्ञान हे भारतीय समाजासाठी आशीर्वाद आहे व याची परंपरादेखील लाभली आहे, असे डॉ. माधवन नायर म्हणाले. (प्रतिनिधी)प्रत्येक राज्यात ‘आयआयटी’ हवे कशाला?डॉ.विजय कुमार सारस्वत यांनी यावेळी शिक्षण प्रणाली व धोरणांवर जोरदार टीका केली. विद्यापीठांमधील संशोधनाचा दर्जा घसरला आहे. प्रत्येक राज्यात ‘आयआयटी’ व प्रत्येक जिल्ह्यासाठी विद्यापीठ हवे, अशी मागणी होत आहे. परंतु याची आवश्यकता काय आहे, असा प्रश्न त्यांनी केला. याऐवजी संशोधनाचे वातावरण निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे. अमेरिका व इतर विकसित देशांच्या गरजांवर आपले संशोधन आधारित असते. परंतु आपल्या देशाला कशाची आवश्यकता आहे, याचा अभ्यास करून संशोधन व्हावे, असे ते म्हणाले. शिवाय आठवीपर्यंत परीक्षा न घेण्याच्या धोरणावरदेखील त्यांनी टीका केली. या विद्यार्थ्यांना नववीनंतर अनेक मूलभूत बाबींचे ज्ञान नसते व उद्योगक्षेत्रासाठी असे विद्यार्थी काहीच कामाचे नाही, असे त्यांनी प्रतिपादन केले.