शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुंबईतील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर
2
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
3
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
4
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
5
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
6
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
7
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
8
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
9
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
10
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
11
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
12
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
13
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
14
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
15
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
16
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
17
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
18
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
19
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
20
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले

विद्यापीठीय संशोधनाला दिशाच नाही

By admin | Updated: February 14, 2016 02:55 IST

आपल्या देशातील विद्यापीठे, आयआयटी यांचा उद्योगक्षेत्राशी दुर्दैवाने हवा तसा समन्वय नाही.

नितीन गडकरी : ‘संशोधनातून पुनरुत्थान’ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोपनागपूर : आपल्या देशातील विद्यापीठे, आयआयटी यांचा उद्योगक्षेत्राशी दुर्दैवाने हवा तसा समन्वय नाही. येथे होणाऱ्या संशोधनाचा स्थानिकांना उपयोगच होत नाही व यासाठी प्रयत्नदेखील दिसून येत नाही. मुळात या संशोधनांना दिशाच मिळालेली नाही. ही स्थिती बदलण्याची गरज आहे, असे परखड मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. भारतीय शिक्षण मंडळातर्फे ‘व्हीएनआयटी’ येथे आयोजित ‘संशोधनातून पुनरुत्थान’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचा शनिवारी समारोप झाला. यावेळी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते.यावेळी केंद्र शासनाच्या ‘नीती’ आयोगाचे सदस्य डॉ.विजय कुमार सारस्वत, खा.अजय संचेती, ‘व्हीएनआयटी’च्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विश्राम जामदार, भारतीय शिक्षण मंडळाचे राष्ट्रीय महामंत्री वामन गोगटे हे प्रामुख्याने उपस्थित होते. आपल्या देशात संशोधन होत आहे. परंतु त्याचा उपयोग समाजाला कसा होईल याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. विद्यापीठांनी उद्योगक्षेत्राशी समन्वय व संवाद वाढवायला हवा. स्थानिक मुद्यांच्या आधारावर संशोधन झाले तर त्याचा फायदा जास्त प्रमामात होईल व यातून रोजगारनिर्मितीदेखील होऊ शकते. शहरीकरणामुळे ग्रामीण भारत व शहरांमधील दरी वाढत आहे. संशोधनातूनच या समस्येचे निराकरण होऊ शकते. अगदी टाकावू वस्तूलादेखील किंमत मिळवून देण्याची क्षमता संशोधनात आहे. याअगोदर ते अनेकदा सिद्धदेखील झाले आहे. त्यामुळे विविध चर्चासत्रे, परिषदांमध्ये जास्तीत जास्त वेळ घालविण्यापेक्षा ‘अप्लाईड’ संशोधनावर विद्वानांनी भर देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन गडकरी यांनी केले. यावेळी परिषदेच्या संयोजक डॉ.उज्ज्वला चक्रदेव यांनी परिषदेचा आढावा मांडला. आयोजन सहसचिव डॉ.लीना गहाणे यांनी संचालन केले तर आयोजन सचिव डॉ.अरविंद जोशी यांनी आभार मानले.परिषदेच्या अखेरच्या दिवश्ी ‘इस्रो’चे माजी अध्यक्ष डॉ.माधवन नायर, ‘बीएआरसी’चे वैज्ञानिक बी.एन.जगताप, ‘नीरी’चे माजी संचालक डॉ.सतीश वटे यांनी मार्गदर्शन केले. ‘इस्रो’मध्ये देशात शिक्षण घेतलेले अनेक वैज्ञानिक आहेत. अवकाशीय विज्ञान हे भारतीय समाजासाठी आशीर्वाद आहे व याची परंपरादेखील लाभली आहे, असे डॉ. माधवन नायर म्हणाले. (प्रतिनिधी)प्रत्येक राज्यात ‘आयआयटी’ हवे कशाला?डॉ.विजय कुमार सारस्वत यांनी यावेळी शिक्षण प्रणाली व धोरणांवर जोरदार टीका केली. विद्यापीठांमधील संशोधनाचा दर्जा घसरला आहे. प्रत्येक राज्यात ‘आयआयटी’ व प्रत्येक जिल्ह्यासाठी विद्यापीठ हवे, अशी मागणी होत आहे. परंतु याची आवश्यकता काय आहे, असा प्रश्न त्यांनी केला. याऐवजी संशोधनाचे वातावरण निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे. अमेरिका व इतर विकसित देशांच्या गरजांवर आपले संशोधन आधारित असते. परंतु आपल्या देशाला कशाची आवश्यकता आहे, याचा अभ्यास करून संशोधन व्हावे, असे ते म्हणाले. शिवाय आठवीपर्यंत परीक्षा न घेण्याच्या धोरणावरदेखील त्यांनी टीका केली. या विद्यार्थ्यांना नववीनंतर अनेक मूलभूत बाबींचे ज्ञान नसते व उद्योगक्षेत्रासाठी असे विद्यार्थी काहीच कामाचे नाही, असे त्यांनी प्रतिपादन केले.