शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अधिकार क्षेत्राचा मुद्दा निकाली काढण्यासाठी वरिष्ठ पीठ हवे

By admin | Updated: February 14, 2016 02:59 IST

सहकारी खंडपीठांच्या अधिकार क्षेत्राचा मुद्दा निकाली काढण्यासाठी वरिष्ठ पीठ गठित करण्याची शिफारस मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुख्य न्यायमूर्तींना केली आहे.

उच्च न्यायालयाची मुख्य न्यायमूर्तींना विनंती : पाच वर्षांत नागपूर, औरंगाबाद खंडपीठातून ४८६ प्रकरणांचे मुंबईकडे स्थानांतरनागपूर : सहकारी खंडपीठांच्या अधिकार क्षेत्राचा मुद्दा निकाली काढण्यासाठी वरिष्ठ पीठ गठित करण्याची शिफारस मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुख्य न्यायमूर्तींना केली आहे. तसेच २०१० ते २०१५ या पाच वर्षांच्या काळात मुंबईकडे स्थानांतरित करण्यात आलेली संपूर्ण प्रकरणे संबंधित खंडपीठांकडे परत केली जावी, असे मत न्या. अरुण चौधरी यांनी एका प्रकरणाच्या निकालात व्यक्त केले.२०१० ते २०१५ या काळातील नागपूर खंडपीठातील एकूण २०७ प्रकरणे आणि औरंगाबाद खंडपीठातील २०१२ ते २०१५ या काळातील २७९ प्रकरणे मुंबईकडे स्थानांतरित करण्यात आली. मुख्य न्यायमूर्तींना ‘मास्टर आॅफ रोस्टर’ म्हणून प्रकरणे एका पीठाकडून दुसऱ्या पीठाकडे स्थानांतरित करण्याचे अधिकार आहेत. न्या. अरुण चौधरी यांनी असे नमूद केले की, ज्या प्रकरणांची पूर्ण सुनावणी झाली, ज्या प्रकरणांची सुनावणी टप्प्याटप्प्याने सुरू आहे, जी प्रकरणे स्वीकारल्या जाण्याच्या स्तरावर निकाली काढण्यासाठी आहेत किंवा जी प्रकरणे निर्णयासाठी ठेवली आहेत, ती एकत्र करून अचानकपणे कोणतेही कारण नमूद न करता प्रशासकीय विशेष हक्कांतर्गत स्थांतरित करण्यात आलेली आहेत. या प्रकारामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील पक्षकारांवर गंभीर परिणाम झालेला आहे. उच्च न्यायालयाच्या पीठासीन न्यायाधीशाकडे सुनावणीची प्रक्रिया सुरू असलेली प्रकरणे कोणत्याही कारणांशिवाय मुख्य पीठाकडे स्थानांतरित करणे ही बाब कमकुवतपणा लेखणारी आणि संबंधित न्यायाधीशाचा मानभंग करणारी तसेच न्यायाधीशावर संशय निर्माण करणारी आहे. ही बाब न्यायाधीशांच्या स्वातंत्र्यावर स्पष्ट अधिक्रमण करणारी आहे, असा निष्कर्ष न्या. चौधरी यांनी काढला.कोणतेही प्रकरण स्थानांतरित करताना गोपनीयता बाळगल्यास त्याचा थेट परिणाम प्रकरणाच्या पारदर्शीतेवर होतो. ही बाब प्रभावी आणि मजबूत न्यायपद्धतीच्या संकल्पनेला धक्का देणारी ठरू शकते, असा धोक्याचा इशारा उच्च न्यायालयाने दिला.खंडपीठाच्या अधिकार क्षेत्रातील प्रकरणे मुख्य पीठाकडे स्थानांतरित करताना संबंधित पक्षकारांच्या समस्या जाणून घेणे आवश्यक आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील नागरिकांच्या सुविधेसाठी नागपूर आणि औरंगाबाद येथे खंडपीठ निर्माण करण्यात आले. प्रकरणे स्थानांतरित केल्यास मुंबईत नव्याने वकील नेमावा लागतो. पक्षकारांना मुंबईत ये-जा करणेही परवडणारे नाही. मुंबईत प्रकरणांची गर्दी असल्याने संबंधित स्थानांतरित प्रकरण व्यवस्थित ऐकले जाईलच याची शाश्वती नाही, असे निकालात नमूद करण्यात आले. नक्षल समर्थक प्रा. जी.एन. साईबाबा याचा जामीन सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नाकारला होता. या संदर्भातील एक याचिका मुंबई मुख्य पीठाने परस्पर चालवून साईबाबाला जामीन मंजूर केला होता. यावर नागपूरचे वकील अ‍ॅड. अनिल किलोर आणि अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी मध्यस्थी करून परस्पर प्रकरणे स्थानांतरित करण्याच्या मुद्यावर आक्षेप घेतला होता. त्यावेळी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी राज्य सरकारतर्फे बाजू मांडताना असे सांगितले होते की, प्रकरणाच्या स्थानांतरणाच्या संदर्भात दिशानिर्देश तयार करण्यात येतील.प्रकरणांच्या स्थानांतरणाच्या मुद्यावर मुख्य न्यायमूर्तींनी वरिष्ठ पीठाचे गठन करावे, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले. (प्रतिनिधी)