शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

मुख्यमंत्रिपदात जादू असते, मग येथे सोबतचेही सोडून का गेले ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2022 19:22 IST

Nagpur News येथे मुख्यमंत्रिपद असतानाही पाठिंबा देणारे अपक्ष तर गेलेच, पण सोबतचे आमदारही का गेले, याचे आत्मचिंतन आपण करणार की नाही? असा सवाल शिंदे गटात सामील झालेले रामटेकचे आ. आशिष जयस्वाल यांनी केला.

ठळक मुद्देआ. आशिष जयस्वाल यांचा सवालविदर्भातील ७० टक्के शिवसैनिक शिंदेंसोबत

नागपूर : राज्याच्या मुख्यमंत्रिपदामध्ये एक जादू असते. त्या पदाचा वापर करून मुख्यमंत्री विरोधकांनाही आपलेसे करून टाकतात. पण येथे मुख्यमंत्रिपद असतानाही पाठिंबा देणारे अपक्ष तर गेलेच, पण सोबतचे आमदारही का गेले, याचे आत्मचिंतन आपण करणार की नाही? असा सवाल शिंदे गटात सामील झालेले रामटेकचे आ. आशिष जयस्वाल यांनी केला.

जयस्वाल हे मूळचे शिवसैनिक आहेत. गेल्या निवडणुकीत ते अपक्ष म्हणून विजयी झाले व शिवसेनेला पाठिंबा दिला होता. आता ते शिंदे गटात सामील झाले आहेत. याबाबत ‘लोकमत’शी बोलताना जयस्वाल म्हणाले, पक्ष कुणाची वैयक्तिक मालमत्ता नाही. पक्ष शिवसैनिकांचा आहे. विदर्भातील ७० टक्के शिवसैनिक मुख्यमंत्री शिंदे यांच्या बाजूने आहेत. २०१९ च्या निवडणुकीत भाजप- शिवसेना युतीला जनादेश मिळाला होता. मात्र, शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत अभद्र युती केली. ती तोडून आम्ही जनादेश पाळला. महाविकास आघाडी सरकार हे ५० टक्के राष्ट्रवादी, ४० टक्के काँग्रेस व फक्त १० टक्केच शिवसेनेचे होते. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलेली शिवसेना आम्ही मुक्त केली. बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी सामूहिक उठाव केला, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेकडून दीड वर्षापासून विदर्भाला मंत्रिपद नाही

- काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या नेत्यांना विदर्भाच्या प्रश्नांशी देणेघेणे नव्हते. देवेंद्र फडणवीस

सत्तेत आल्याशिवाय विदर्भाला न्याय मिळू शकत नव्हता. शिवसेनेने दीड वर्षापासून विदर्भाला एकही मंत्रिपद दिले नाही. वैधानिक विकास मंडळे अपंग केली. सिंचन प्रकल्पाचा कुणी मायबाप नव्हता. विदर्भाला वाऱ्यावर सोडले होते.

टॅग्स :Ashish Jaiswalआशीष जयस्वाल