शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
5
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
6
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
7
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
8
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
9
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
10
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
11
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
12
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
13
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
14
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
15
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
16
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
17
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
18
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
19
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
20
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत

मुख्यमंत्रिपदात जादू असते, मग येथे सोबतचेही सोडून का गेले ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2022 19:22 IST

Nagpur News येथे मुख्यमंत्रिपद असतानाही पाठिंबा देणारे अपक्ष तर गेलेच, पण सोबतचे आमदारही का गेले, याचे आत्मचिंतन आपण करणार की नाही? असा सवाल शिंदे गटात सामील झालेले रामटेकचे आ. आशिष जयस्वाल यांनी केला.

ठळक मुद्देआ. आशिष जयस्वाल यांचा सवालविदर्भातील ७० टक्के शिवसैनिक शिंदेंसोबत

नागपूर : राज्याच्या मुख्यमंत्रिपदामध्ये एक जादू असते. त्या पदाचा वापर करून मुख्यमंत्री विरोधकांनाही आपलेसे करून टाकतात. पण येथे मुख्यमंत्रिपद असतानाही पाठिंबा देणारे अपक्ष तर गेलेच, पण सोबतचे आमदारही का गेले, याचे आत्मचिंतन आपण करणार की नाही? असा सवाल शिंदे गटात सामील झालेले रामटेकचे आ. आशिष जयस्वाल यांनी केला.

जयस्वाल हे मूळचे शिवसैनिक आहेत. गेल्या निवडणुकीत ते अपक्ष म्हणून विजयी झाले व शिवसेनेला पाठिंबा दिला होता. आता ते शिंदे गटात सामील झाले आहेत. याबाबत ‘लोकमत’शी बोलताना जयस्वाल म्हणाले, पक्ष कुणाची वैयक्तिक मालमत्ता नाही. पक्ष शिवसैनिकांचा आहे. विदर्भातील ७० टक्के शिवसैनिक मुख्यमंत्री शिंदे यांच्या बाजूने आहेत. २०१९ च्या निवडणुकीत भाजप- शिवसेना युतीला जनादेश मिळाला होता. मात्र, शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत अभद्र युती केली. ती तोडून आम्ही जनादेश पाळला. महाविकास आघाडी सरकार हे ५० टक्के राष्ट्रवादी, ४० टक्के काँग्रेस व फक्त १० टक्केच शिवसेनेचे होते. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलेली शिवसेना आम्ही मुक्त केली. बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी सामूहिक उठाव केला, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेकडून दीड वर्षापासून विदर्भाला मंत्रिपद नाही

- काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या नेत्यांना विदर्भाच्या प्रश्नांशी देणेघेणे नव्हते. देवेंद्र फडणवीस

सत्तेत आल्याशिवाय विदर्भाला न्याय मिळू शकत नव्हता. शिवसेनेने दीड वर्षापासून विदर्भाला एकही मंत्रिपद दिले नाही. वैधानिक विकास मंडळे अपंग केली. सिंचन प्रकल्पाचा कुणी मायबाप नव्हता. विदर्भाला वाऱ्यावर सोडले होते.

टॅग्स :Ashish Jaiswalआशीष जयस्वाल