शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

Lokmat Women Summit 2022; महिलांच्या बाबतीत समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2022 20:05 IST

Nagpur News महिलांच्या व्यथा, वेदना, अन्याय, अत्याचार संपवायचा असेल, तर महिलांच्या बाबतीत समाजाची मानसिकता बदलावी लागेल, असा सूर लोकमत वूमन समिटमध्ये आयोजित परिसंवादात सहभागी मान्यवरांनी आळवला.

ठळक मुद्देलोकमत वुमन समिटच्या पटाखा कुडी परिसंवादात सहभागी महिलांचा सूर

नागपूर : महिलांचा संघर्ष जन्मानंतर नाही तर गर्भातूनच सुरू होतो. सोनोग्राफीच्या रिपोर्टवरून ती असावी की नसावी यावरून वाद उठतो. जन्मानंतर तिला प्रत्येक अवस्थेत घरातून समाजापर्यंत संघर्ष करावा लागतो. ती कुठल्याही परिस्थितीत अथवा धर्मात जन्म घेवो, पुरुषप्रधान संस्कृतीच्या पडद्याआडच तिला जगावे लागले. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती आज समाजात वावरत असली तरी परिस्थिती सुधारलेली नाही. त्यामुळे महिला आयोगासारखी यंत्रणा समाजात उभारावी लागत आहे. महिलांच्या व्यथा, वेदना, अन्याय, अत्याचार संपवायचा असेल, तर महिलांच्या बाबतीत समाजाची मानसिकता बदलावी लागेल, असा सूर लोकमत वूमन समिटमध्ये आयोजित परिसंवादात सहभागी मान्यवरांनी आळवला.

स्त्रीचे अस्तित्व, अभिव्यक्ती तिच्या नजरेतून जाणून घेण्यासाठी लोढा गोल्ड टीएमटी बार प्रस्तुत ‘लोकमत’तर्फे पिजन आणि निर्मल उज्ज्वल क्रेडिट को-ऑप. सोसायटी लि. नागपूरच्या सहकार्याने लोकमत वुमेन समिटचे आयोजन करण्यात आले होते. या समिटमध्ये पटाखा गुडी शीर्षकांतर्गत आयोजित परिसंवादात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, मुस्लिम महिला आंदोलनाच्या संस्थापक झाकिया सोमण, अभिनेत्री संजना संघी सहभागी झाल्या होत्या. परिसंवादाचे संचालन सुरभी शिरपूरकर यांनी केले.

- ‘लोकमत’ समाजाचे प्रश्न घेऊन पुढे चालतेय

लोकमत वुमन समिटच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांपुढील आव्हाने आणि त्यांचा संघर्ष ‘लोकमत’ उलगडत आला आहे. महिलांच्या अत्याचाराविरोधातील लढ्यात सदैव अग्रेसर राहिला आहे. महिलांकडे बघण्याच्या समाजातील विकृतीला सदैव ठेचून काढले आहे. महिलांच्या पुढील प्रश्न अनेक आहे. ‘लोकमत’ने आपल्या व्यासपीठावरून त्या प्रश्नांना सदैव हात घातला आहे. गणपती उत्सवातून महिलांना मान मिळवून दिला आहे. वुमन समिटसारख्या व्यासपीठावरून समाजाला महिलांच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली आहे. सोनाराने कान टोचले की दुखत नाही. ‘लोकमत’ची ही भूमिका आजपर्यंत राहिली आहे आणि पुढेही राहावी.

- रूपाली चाकणकर, अध्यक्ष, राज्य महिला आयोग

 

- तीन तलाकला विरोध हा मुस्लिम महिलांनी केलेला मोठा संघर्ष

तीन तलाकच्या विरोधात सामान्य मुस्लिम महिलांनी उठविलेला आवाज ही संघर्षाची ऐतिहासिक सुरुवात आहे. मुस्लिम महिलांच्या समस्यांचे प्रतिनिधित्व आजपर्यंत त्यांचे धर्मगुरूच करायचे. त्यांच्या धर्मग्रंथात महिलांना दिलेल्या अधिकाराची जाणीव करून देत त्यांचा आवाज दाबला जायचा. मुस्लिम महिलांच्या बाबतीत हिजाबला धर्माशी जोडले गेले आहे; पण हिजाब घालणे अनिवार्य नाही, धर्मात तसा उल्लेखही नाही; पण हिजाबवरून राजकीय रंग देण्याची गरज नव्हती. संबंधित कॉलेजला तो आपल्या स्तरावर सोडविता आला असता.

झाकिया सोमन, मुस्लिम महिला आंदोलनाच्या संस्थापक

- काय घालावे आणि काय नाही हे महिलांना समजते

समाजातून सदैव महिलांच्या वस्त्राबद्दल प्रश्न उपस्थित होतो; पण काय घालावे, काय नाही हे महिलांना समजते. परिस्थितीनुरूप वस्त्र परिधान करणे याबाबत पुरुषांच्या तुलनेत महिला जास्त सजग असतात. वस्त्र परिधान करणे हा तिच्या आवडीचा विषय आहे. त्यावरून विनाकारण प्रश्न उपस्थित करण्याची गरज नाही.

संजना संघी, अभिनेत्री

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंट