शहरं
Join us  
Trending Stories
1
११ युवकांचं ब्रेनवॉश करण्यासाठी... ; दिल्ली स्फोटातील दहशतवादी डॉ. उमरबाबत आणखी धक्कादायक माहिती उघड
2
राज ठाकरेंमुळे काँग्रेस आणि ठाकरे गटात दुरावा?, वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘त्यांना सोबत घेण्यापूर्वी…’  
3
जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना वगळले! अंबादास दानवे म्हणाले, '९९% भागीदारी असताना चौकशी अहवालात नाव कसं नाही?'
4
वेदनादायी! ऑस्ट्रेलियात BMW ची भारतीय महिलेला धडक, जागीच मृत्यू; होती ८ महिन्यांची गर्भवती
5
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
6
तुमचा आधार पुन्हा एकदा बदलणार; आता ना नाव असेल ना पत्ता, फक्त फोटोसोबत असेल QR कोड
7
भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई; बांगलादेशाच्या तीन नौका जप्त, 79 जणांना अटक
8
काल हिडमाचा खात्मा, आज ‘टेक शंकर’सह 7 नक्षलवादी ठार; आंध्र-ओडिशा सीमेजवळ भीषण चकमक
9
VVPAT: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 'व्हीव्हीपॅट' वापरण्यास आयोगाचा नकार, कारणही सांगितलं!
10
५४ तास विपरीत महालक्ष्मी राजयोग: ५ राशींना ४ पट लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; अकल्पनीय फायदा!
11
संरक्षण, विमा आणि धातू क्षेत्रातील 'या' ५ कंपन्यांचे शेअर्स येणार तेजीत! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज
12
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
13
‘ही मुलगी आमच्या मुलाची नाही’, सासू-सासरे सारखा घ्यायचे संशय, संतप्त सुनेने केलं भयंकर कृत्य
14
Rinku Singh Century In Ranji Trophy : टी-२० स्टार रिंकू सिंहचा रेड बॉल क्रिकेटमध्ये शतकी धमाका!
15
आता काळ बदलतोय! घर सांभाळण्यासाठी कपलने ठेवला 'होम मॅनेजर'; महिन्याला १ लाख पगार
16
हृदयद्रावक! डीजेवर नाचताना हवेत गोळीबार; नवरदेवाच्या मित्राच्या मुलीने गमावला जीव
17
'इंग्लिश विंग्लिश'मधली छोटी मुलगी आता दिसते सुंदर; अभिनेत्रीचं अरेंज मॅरेज ठरलं; म्हणाली...
18
रशियाने भारताला दिली एक खतरनाक ऑफर, पाकिस्तानचं टेन्शन वाढलं, आली डोळे पांढरे होण्याची वेळ
19
'AI वर आंधळा विश्वास ठेवू नका; यातील गुंतवणुकीचा फुगा कधीही फुटू शकतो' सुंदर पिचाईं यांचा इशारा!
20
Numerology 2026: अंकशास्त्रानुसार २०२६ हे इच्छापूर्तीचे वर्ष? कोणते बदल केले पाहिजेत?
Daily Top 2Weekly Top 5

जागोजागी लागताहेत कचऱ्याचे ढिगारे ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:10 IST

एजी एन्व्हायरोकडून नियमांचे सर्रास उल्लंघन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील कचरा संकलन यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी दोन एजन्सीची ...

एजी एन्व्हायरोकडून नियमांचे सर्रास उल्लंघन

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरातील कचरा संकलन यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी दोन एजन्सीची नियुक्ती करण्यात आली. परंतु २० महिन्यानंतरही या एजन्सी नियमानुसार काम करीत नाही. शहरात जागोजागी कचऱ्याचे ढिगारे लागत आहेत. पावसाच्या दिवसात कचरा उचलला जात नसल्याने दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त आहेत. आजाराचाही धोका वाढला आहे.

लक्ष्मीनगर झोनमधील खामला चौकानजीक कचरा ट्रान्सफर स्टेशन व नेहरूनगर झोनअंतर्गत श्यामबाग येथे दररोज कचरा जमा होत आहे. तो वेळीच उचलला जात नसल्याने परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. त्यात पावसाच्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरत आहे.

प्रभाग १ ते ५ मधील जबाबदारी एजी एन्व्हायरो तर, ६ ते १० प्रभागाची जबाबदारी बीव्हीजी कंपनीकडे देण्यात आली आहे. नियमानुसार घरातून गोळा करण्यात आलेला कचरा गाडीतून थेट कॉम्पॅक्टरमध्ये टाकून भांडेवाडी येथे न्यावयाचा आहे. परंतु असे न करता ट्रान्सफर स्टेशनवर कचरा जमा केला जात आहे. गेल्या १५ दिवसापासून खामला चौकातील ट्रान्सफर स्टेशनवरील कचरा नियमित उचलला जात नाही. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी झोन कार्यालय व नगरसेवकांकडे तक्रार केली, परंतु याची दखल घेतली नाही.

..........

...तर आयुक्त दंड करणार का?

डेंग्यू-मलेरियाचा प्रादुर्भाव विचारात घेता, खाली प्लॉटवर कचरा वा पाणी साचून असल्यास प्लॉटधारकाकडून दंड वसूल करण्याचा निर्णय मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी घेतला आहे. प्लॉट स्वच्छ करण्यासाठी येणारा खर्च, प्लॉटधारकाकडून वसूल केला जाणार आहे. अशा परिस्थितीत मनपाच्या जागेवरील ट्रान्सफर स्टेशनवर कचरा साचून राहत असेल तर मनपा स्वत:वर दंड आकारणार की कराराचे उल्लंघन करणाऱ्या एजी एन्व्हायरोकडून वसूल करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

.......

कचरागाडी दररोज येत नाही

मनपातील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्यासह नगरसेवकांनी कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या एजी एन्व्हायरो व बीव्हीजी कंपनीवर सभागृहात आरोप केले होते. गेल्या महिनाभरापासून यावर सुनावणी सुरू आहे. परंतु समिती अद्याप कुठल्याची निष्कर्षावर पोहचलेली नाही. दोन्ही कंपन्यांचे अधिकारी नगरसेवकांच्या तक्रारीची दखल घेत नाही. शहरातील अनेक वस्त्यात नियमित कचरागाडी येत नसल्याचा आरोप वनवे यांनी केला आहे.