शहरं
Join us  
Trending Stories
1
Maratha Reservation: मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणे अशक्य? चंद्रकांत पाटील म्हणाले...
2
Maratha Reservation: सर्वपक्षीय बैठक, अधिवेशन बोलावून २४ तासांत निर्णय घ्या- सुप्रिया सुळे
3
कुणबी नोंदीचे पुरावे शिंदे समितीला देणार, मराठा आरक्षण अभ्यासकांसोबत जरांगेंची दीड तास चर्चा
4
विशेष लेख: शिंक्याचे तुटले आणि (कोरियन) बोक्याचे फावले!
5
Maratha Morcha : मराठा आरक्षणाबाबत हालचालिंना वेग, मुख्यमंत्र्यांनी रात्रीच बोलावली बैठक; राधाकृष्ण विखे पाटील यांचीही उपस्थिती
6
रायगडमध्ये रिक्षाचा भीषण अपघात, ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखासह तिघांचा जागीच मृत्यू
7
Maratha Morcha : फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही आंदोलकांना मदत करता? एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात दिले उत्तर, म्हणाले...
8
Maratha Morcha : “गोंधळ घालणाऱ्यांना सरकारने पाठवले होते का?, सरकार दंगल ...”, सुप्रिया सुळेंना घेराव घालणाऱ्यांबाबत मनोज जरांगेंचं मोठं विधान
9
मोठी दुर्घटना! धौलीगंगा वीज प्रकल्पाच्या बोगद्यात भूस्खलनामुळे १९ कामगार अडकले
10
धावत्या ट्रॅव्हल्समध्ये जळून एकाचा मृत्यू; प्रवाशाने स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतल्याचा संशय
11
राज ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर; "आधी माहिती घेऊन बोलायला हवं होते..."
12
ऑस्ट्रेलियात भारतीयांविरोधात हजारो स्थानिक लोक रस्त्यावर उतरले; नेमके काय घडले?
13
टाकळगावचे लढवय्या विजयकुमार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; आई, पत्नी अन् मुलांनी फोडला हंबरडा
14
Maratha Morcha: मनोज जरांगेंच्या मागण्यांवर मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत काय झाला निर्णय?
15
चीन-भारत संबंधांना तिसऱ्या देशाच्या नजरेची गरज नाही, मोदी आणि जिनपिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले
16
अभिनेत्री प्रिया मराठे काळाच्या पडद्याआड, अंत्यदर्शनावेळी मराठी कलाकारांना अश्रू अनावर
17
राहुल गांधींच्या 'मतदार हक्क यात्रेत' वापरलेली बाईक गायब, मालक चिंतेत; बुलेटही लॉक अवस्थेत सापडली
18
Maratha Reservation : 'मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येईल हे शरद पवारांनी जाहीर करावं'; राधाकृष्ण विखे- पाटलांनी स्पष्टच सांगितलं
19
Supriya Sule: मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची गाडी अडवली, घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला
20
बरे होण्यासाठी आलेल्या रुग्णांच्याच जीवाशी खेळ; सरकारी रुग्णालयातील जेवणात अळ्या, सोंडे

जागोजागी लागताहेत कचऱ्याचे ढिगारे ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:10 IST

एजी एन्व्हायरोकडून नियमांचे सर्रास उल्लंघन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील कचरा संकलन यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी दोन एजन्सीची ...

एजी एन्व्हायरोकडून नियमांचे सर्रास उल्लंघन

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरातील कचरा संकलन यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी दोन एजन्सीची नियुक्ती करण्यात आली. परंतु २० महिन्यानंतरही या एजन्सी नियमानुसार काम करीत नाही. शहरात जागोजागी कचऱ्याचे ढिगारे लागत आहेत. पावसाच्या दिवसात कचरा उचलला जात नसल्याने दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त आहेत. आजाराचाही धोका वाढला आहे.

लक्ष्मीनगर झोनमधील खामला चौकानजीक कचरा ट्रान्सफर स्टेशन व नेहरूनगर झोनअंतर्गत श्यामबाग येथे दररोज कचरा जमा होत आहे. तो वेळीच उचलला जात नसल्याने परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. त्यात पावसाच्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरत आहे.

प्रभाग १ ते ५ मधील जबाबदारी एजी एन्व्हायरो तर, ६ ते १० प्रभागाची जबाबदारी बीव्हीजी कंपनीकडे देण्यात आली आहे. नियमानुसार घरातून गोळा करण्यात आलेला कचरा गाडीतून थेट कॉम्पॅक्टरमध्ये टाकून भांडेवाडी येथे न्यावयाचा आहे. परंतु असे न करता ट्रान्सफर स्टेशनवर कचरा जमा केला जात आहे. गेल्या १५ दिवसापासून खामला चौकातील ट्रान्सफर स्टेशनवरील कचरा नियमित उचलला जात नाही. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी झोन कार्यालय व नगरसेवकांकडे तक्रार केली, परंतु याची दखल घेतली नाही.

..........

...तर आयुक्त दंड करणार का?

डेंग्यू-मलेरियाचा प्रादुर्भाव विचारात घेता, खाली प्लॉटवर कचरा वा पाणी साचून असल्यास प्लॉटधारकाकडून दंड वसूल करण्याचा निर्णय मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी घेतला आहे. प्लॉट स्वच्छ करण्यासाठी येणारा खर्च, प्लॉटधारकाकडून वसूल केला जाणार आहे. अशा परिस्थितीत मनपाच्या जागेवरील ट्रान्सफर स्टेशनवर कचरा साचून राहत असेल तर मनपा स्वत:वर दंड आकारणार की कराराचे उल्लंघन करणाऱ्या एजी एन्व्हायरोकडून वसूल करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

.......

कचरागाडी दररोज येत नाही

मनपातील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्यासह नगरसेवकांनी कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या एजी एन्व्हायरो व बीव्हीजी कंपनीवर सभागृहात आरोप केले होते. गेल्या महिनाभरापासून यावर सुनावणी सुरू आहे. परंतु समिती अद्याप कुठल्याची निष्कर्षावर पोहचलेली नाही. दोन्ही कंपन्यांचे अधिकारी नगरसेवकांच्या तक्रारीची दखल घेत नाही. शहरातील अनेक वस्त्यात नियमित कचरागाडी येत नसल्याचा आरोप वनवे यांनी केला आहे.