शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

बसेसच नाहीत; परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी शाळेतच मुक्काम करावा का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2022 07:10 IST

Nagpur News महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप मिटलेला नसल्याने ग्रामीण भागातील ७० टक्के बससेवा ठप्प आहे. अशात बोर्डाच्या परीक्षा तोंडावर असल्याने बाहेरगावच्या केंद्रावर परीक्षेसाठी जाणारे पालक, विद्यार्थी आणि शिक्षकही चिंतेत आहेत.

ठळक मुद्देग्रामीण भागातील ७० टक्के बससेवा ठप्पपालक, विद्यार्थ्यांपुढे पेच

मंगेश व्यवहारे

नागपूर : एस.टी. महामंडळाची बससेवा ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रवासाची एकमेव सुविधा आहे. परंतु, अजूनही महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप मिटलेला नसल्याने ग्रामीण भागातील ७० टक्के बससेवा ठप्प आहे. अशात बोर्डाच्या परीक्षा तोंडावर असल्याने बाहेरगावच्या केंद्रावर परीक्षेसाठी जाणारे पालक, विद्यार्थी आणि शिक्षकही चिंतेत आहेत. आम्हाला आता परीक्षेसाठी शाळेतच मुक्काम करावा लागणार का? असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे.

सध्या शाळांमध्ये बोर्डाच्या परीक्षेची तयारी सुरू आहे. प्रॅक्टिकल व सराव परीक्षा घेण्यात येत आहेत. प्रवासाची सुविधा नसल्याने सराव परीक्षेत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत घट झाली आहे.

- माझ्या गावातून शाळा ही १५ ते १६ किलोमीटर पडते. आमच्यासाठी एस.टी. ही एकमेव साधन आहे. परीक्षेच्या काळात बस उपलब्ध नसेल, तर परीक्षेच्या कालावधीत शाळेच्या परिसरातच थांबावे लागणार आहे.

आरती मस्के, विद्यार्थिनी

- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची बसेस नसल्यामुळे चांगलीच अडचण होत आहे. परीक्षेच्या काळात खऱ्याअर्थाने सरकारने परीक्षा सेवा बसेस सुरू करण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थितीही खूप नाजूक असल्याने विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क बससेवा सुरू कराव्यात.

- युवराज शंकरपुरे, मुख्याध्यापक, उदय विद्यालय, देवलापार

 

- बस हे एकमेव साधन विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी आहे. येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षा लक्षात घेऊन, लवकरात लवकर बससेवा सुरू करण्याची गरज आहे. विद्यार्थी परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचणे गरजेचे आहे. बससेवा सुरू नसल्याने विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू शकतात.

मुरलीधर मानकर, वामनराव मानकर हायस्कूल, खामली, ता. काटोल

- परीक्षेच्या काळात एस.टी. सुरू न झाल्यास हे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ आहे. शासनाने या विषयाकडे गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे. लवकरात लवकर बससेवा सुरू करण्यासंदर्भात महामंडळाला निवेदन देणार आहोत.

अनिल गोतमारे, जिल्हाध्यक्ष, वि. मा. शि. संघ, नागपूर जिल्हा

- एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे बहुतांश कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळे रुजू झालेले कर्मचारी आणि लाईन चेकिंगवरील कर्मचारी अशा मोजक्या कर्मचाऱ्यांच्या भरवशावर ग्रामीण भागात ३० टक्के बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. संप कर्मचाऱ्यांनी मागे घेतल्यानंतर ग्रामीण भागातील उर्वरित सेवा सुरू करण्यात येईल.

नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, एस.टी. महामंडळ, नागपूर विभाग

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रroad transportरस्ते वाहतूक