शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

नागपूर विद्यापीठात दुसरा कोहचाडे आहे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 23:41 IST

कोहचाडे कांडामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अब्रूचे देशभरात धिंडवडे निघाले. शिक्षण क्षेत्रातील गैरव्यवहाराच्या या काळ्या रूपाने त्यावेळी सर्वांना हादरवून सोडले होते. त्या घटनेमुळे झालेले नागपूर विद्यापीठाच्या प्रतिष्ठेचे नुकसान अद्याप भरून निघाले नाही. असे असले तरी, गैरप्रकार पूर्णपणे बंद झालेला नाही. अलीकडच्या एका अवैध गुणवाढ प्रकरणामुळे नागपूर विद्यापीठात दुसरा कोहचाडे असण्याचा संशय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला आला आहे.

ठळक मुद्देहायकोर्टाला संशय : अवैध गुणवाढ प्रकरणाची व्यापक दखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोहचाडे कांडामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अब्रूचे देशभरात धिंडवडे निघाले. शिक्षण क्षेत्रातील गैरव्यवहाराच्या या काळ्या रूपाने त्यावेळी सर्वांना हादरवून सोडले होते. त्या घटनेमुळे झालेले नागपूर विद्यापीठाच्या प्रतिष्ठेचे नुकसान अद्याप भरून निघाले नाही. असे असले तरी, गैरप्रकार पूर्णपणे बंद झालेला नाही. अलीकडच्या एका अवैध गुणवाढ प्रकरणामुळे नागपूर विद्यापीठात दुसरा कोहचाडे असण्याचा संशय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला आला आहे. परिणामी, न्यायालयाने प्रकरणाची व्यापक दखल घेतली आहे. अवैध गुणवाढ प्रकरणांवरील निर्णयांची माहिती नागपूर विद्यापीठाला मागण्यात आली आहे. सदर माहिती मिळाल्यानंतर हे प्रकरण जनहित याचिका म्हणून चालवायचे की नाही याचा विचार उच्च न्यायालय करणार आहे.अवैध गुणवाढीचे अलीकडचे प्रकरण करण हांडा या विद्यार्थ्याशी संबंधित आहे. याप्रकरणात बडतर्फ झालेल्या सहायक कुलसचिव (पुनर्मूल्यांकन) संध्या चुनोडकर-हांडा यांचा करण हा चिरंजिव होय. सेंट विन्सेन्ट पलोटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील अभियांत्रिकी (मेकॅनिकल) अभ्यासक्रमाचा विद्यार्थी असलेल्या करणने २०११ मधील हिवाळ्यात तृतीय सेमिस्टरची परीक्षा दिली होती. त्यात तो अनुत्तीर्ण झाला होता. त्यामुळे त्याने पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल केला होता. पुनर्मूल्यांकनात गुण वाढल्यामुळे तो उत्तीर्ण झाला. दरम्यान, मुन्ना पटेल यांनी ही गुणवाढ बेकायदेशीरपणे झाल्याची तक्रार तत्कालीन कुलगुरूंकडे केली. कुलगुरूंनी त्याची दखल घेऊन शिस्तपालन समितीला चौकशी करण्याचा आदेश दिला. समितीने चौकशी करून २७ सप्टेंबर २०१३ रोजी अहवाल सादर केला. त्यात संध्या चुनोडकर यांनी करणचे गुण बेकायदेशीरपणे वाढविल्याचा ठपका ठेवण्यात आला. तसेच, चुनोडकर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व करणचा तृतीय सेमिस्टरचा निकाल रद्द करण्याची शिफारस करण्यात आली होती.२ नोव्हेंबर २०१३ रोजी विद्यापीठाने करणचा तृतीय सेमिस्टरचा निकाल रद्द करण्याचा निर्णय दिला होता. त्याविरुद्ध करणने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने त्याची याचिका अंशत: मंजूर केली. त्यानंतर विद्यापीठाने ३ नोव्हेंबर २०१७ रोजी सुधारित निर्णय घेऊन करणला नव्याने तृतीय सेमिस्टरची परीक्षा देण्यास सांगितले आहे. त्या निर्णयालाही करणने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. परिणामी, न्यायालयाने याप्रकरणाची व्यापक दखल घेतली आहे. तसेच, करणच्या तक्रारीवर विद्यापीठाला १४ फेब्रुवारीपर्यंत उत्तर मागितले आहे. करणतर्फे अ‍ॅड. भानुदास कुलकर्णी यांनी बाजू मांडली.

 

टॅग्स :universityविद्यापीठHigh Courtउच्च न्यायालय