शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

- तर दोन लाख रुपये दावा खर्च बसवला जाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 00:56 IST

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाद्वारे प्रदान पीएच.डी पदवीला मान्यता नाकारण्यावर दाखल करण्यात आलेले प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालय व विद्यापीठ अनुदान आयोग यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध आढळून आल्यास दोन लाख किंवा त्यापेक्षा जास्त दावाखर्च बसवला जाईल अशी तंबी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महाराष्ट्र कृषी विद्यापीठ भरती मंडळाला दिली.

ठळक मुद्देहायकोर्ट : महाराष्ट्र कृषी विद्यापीठ भरती मंडळाला तंबी

लोकमत  न्यूज नेटवर्क नागपूर : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाद्वारे प्रदान पीएच.डी पदवीला मान्यता नाकारण्यावर दाखल करण्यात आलेले प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालय व विद्यापीठ अनुदान आयोग यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध आढळून आल्यास दोन लाख किंवा त्यापेक्षा जास्त दावाखर्च बसवला जाईल अशी तंबी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महाराष्ट्र कृषी विद्यापीठ भरती मंडळाला दिली.सर्वोच्च न्यायालय व विद्यापीठ अनुदान आयोग यांचे निर्णय विचारात घेऊन संबंधित मुद्यावर आठ आठवड्यात निर्णय घेण्याचा आदेश उच्च न्यायालयाने ५ जून २०१८ रोजी मंडळाला दिला होता. परंतु, मंडळाने अद्याप त्यानुसार निर्णय घेऊन न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले नाही. हे प्रकरण गेल्या आठवड्यात सुनावणीसाठी आले असता मंडळाने प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी एक आठवड्याचा वेळ वाढवून देण्याची विनंती केली. त्यानंतर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व श्रीराम मोडक यांनी मंडळाला प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी एक ऐवजी दोन आठवडे वेळ दिला. तसेच, त्यासोबत वरीलप्रमाणे तंबीही दिली. प्रकरणावर आता २५ एप्रिल रोजी पुढील सुनावणी होईल.सर्वोच्च न्यायालय व विद्यापीठ अनुदान आयोग यांच्या निर्णयानुसार, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने २००९ पूर्वी प्रदान केलेल्या पीएच. डी. पदवीला मान्यता नाकारता येत नाही. परंतु, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक डॉ. वचनदास बडोले यांची पीएच. डी. पदवी अमान्य करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. बडोले दिव्यांग असून त्यांनी प्राध्यापकपदी बढती मिळण्यासाठी अर्ज सादर केला होता. परंतु, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून पीएच. डी. पदवी मिळविली असल्याचे कारण सांगून त्यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला. या निर्णयावर बडोले यांचा आक्षेप आहे. १९९८ व २००६ मधील शासन निर्णयाद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा समावेश आहे. या विद्यापीठाला विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता आहे. तसेच, महाराष्ट्र कृषी विद्यापीठ कायद्याने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला कृषी विषयात पदवी प्रदान करण्याचा अधिकार दिला आहे असे बडोले यांचे म्हणणे आहे. बडोले यांच्यातर्फे अ‍ॅड. भानुदास कुलकर्णी यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयagricultureशेतीuniversityविद्यापीठ