शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

..तर व्यापारी करतील आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:07 IST

नागपूर : केंद्र आणि राज्य सरकारच्या सततच्या लॉकडाऊनने व्यापारी त्रस्त असून, आर्थिक टंचाईने अनेक व्यापारी संकटात आले आहेत. भांडवल ...

नागपूर : केंद्र आणि राज्य सरकारच्या सततच्या लॉकडाऊनने व्यापारी त्रस्त असून, आर्थिक टंचाईने अनेक व्यापारी संकटात आले आहेत. भांडवल नसल्याने अनेकांनी दुकाने कामयच बंद केली आहेत. मंदीच्या काळात सुरू असलेली दुकानेही आता राज्य शासनाच्या आदेशाने बंद झाली आहेत. पुढे लॉकडाऊन सुरूच राहिले, तर आर्थिक संकटाने अनेक व्यापारी आत्महत्या करतील, अशी भीती विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

विदर्भातील १३ लाख व्यापाऱ्यांची आघाडीची संघटना नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने पुन्हा १५ ते ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आलेल्या कडक निर्बंधाचा तीव्र विरोध केला आहे. चेंबरचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया म्हणाले, सरकारने लॉकडाऊनमध्ये व्यापाऱ्यांना कोणत्याही सवलती न देऊन त्यांना संकटात टाकले आहे. नागपुरात छोट्या व्यावसायिकांवर जवळपास दहा हजार कामगार अवलंबून आहेत; पण आता व्यापारीच आर्थिक बोझ्याखाली दबल्याने त्यांच्या आणि कामगारांच्या कुटुंबीयांवर उपासमारीचे संकट आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यापारी संघटनांशी चर्चा करताना आर्थिक उपक्रम सुरू ठेवून कठोर उपाययोजनांनी कोरोनावर मात करण्याचे सूतोवाच केले होते. शिवाय व्यापाऱ्यांना काही सूट देऊन निर्बंध लावण्याचे म्हटले होते. अखेर एक आठवड्याच्या विचारविनिमयानंतर लॉकडाऊनमध्ये व्यापाऱ्यांवर कठोर निर्बंध लावले आहेत.

लॉकडाऊन लावताना सरकारने व्यापाऱ्यांचा विचार करायला हवा होता. त्यांचे कुटुंब आणि कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत द्यायला हवी होती. व्यापाऱ्याने दुकानाचे भाडे, विजेचे बिल, पाणीबिल त्यांच्या बँक खात्यात भरण्याची सोय असायला हवी होती. उलट सरकारने त्यांच्यावर कठोर निर्बंध लादून त्यांना संकटात टाकले आहे. पण ई-कॉमर्स कंपन्यांना ऑनलाइन विक्रीला परवानगी दिली आहे. असे करून सरकारने व्यापाऱ्यांसोबत विश्वासघात केला आहे.

चेंबरचे सचिव रामअवतार तोतला म्हणाले, लॉकडाऊन यशस्वी करायचा असेल तर आवश्यक वस्तूंची दुकाने आणि सेवेला वेळेची मर्यादा द्यावी आणि ई-कॉमर्सद्वारे ऑनलाइन वस्तू विक्रीवर प्रतिबंध लावावे. अन्यथा सर्व बाजार सुरू करून नियमित व्यवसायाला परवानगी द्यावी.

चेंबरचे उपाध्यक्ष फारूख अकबानी म्हणाले, सरकारने कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांवर कठोर निर्बंधांसह वैद्यकीय व्यवस्था मजबूत करून औषधांचा सुरळीत पुरवठा आणि लसीकरणात वाढ करावी. त्यामुळे मृत्युदर कमी होईल. पुढे अशी नैसर्गिक आपत्ती आल्यास मेडिकल सुविधांअभावी सरकारला व्यापाऱ्यांवर प्रतिबंध लावण्याची आवश्यकता भासणार नाही.

चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अ‍ॅण्ड कॉमर्सचे (कॅमिट) अध्यक्ष दीपेन अग्रवाल म्हणाले, कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी सरकारने व्यापाऱ्यांवर प्रतिबंध लावून काय साधले, हा खरा प्रश्न आहे. वैद्यकीय सेवेअभावी सरकार कोरोनावर नियंत्रण मिळवू शकत नाही. वैद्यकीय सेवा आधीच सक्षम केल्या असत्या तर सरकारवर लॉकडाऊनची वेळ आली नसती. आपत्कालीन स्थितीत सरकार नेहमीच व्यापाऱ्यांना टारगेट करते, हे चुकीचे आहे. लॉकडाऊनने व्यापारी संकटात आले आहेत.