शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

-तर रेशन दुकानदाराचा परवाना होणार रद्द : जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 00:31 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने नागरिकांना ३ महिन्याचे रेशन एकाच वेळी देण्याचा निर्णय घेतला आहे. रेशन दुकानदारांकडे मुबलक धान्याचा पुरवठा करण्यात आला आहे. जे दुकानदार धान्य वाटप करणार नाहीत, स्टॉक नाही, अशी कारणे सांगतील त्यांचे परवाने रद्द करण्याचा इशारा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिला आहे.

ठळक मुद्देरेशनधारकांना मिळणार ३ महिन्याचे धान्य

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने नागरिकांना ३ महिन्याचे रेशन एकाच वेळी देण्याचा निर्णय घेतला आहे. रेशन दुकानदारांकडे मुबलक धान्याचा पुरवठा करण्यात आला आहे. जे दुकानदार धान्य वाटप करणार नाहीत, स्टॉक नाही, अशी कारणे सांगतील त्यांचे परवाने रद्द करण्याचा इशारा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिला आहे.याशिवाय शिधापत्रिकाधारकांना आता बोटाचे ठसे देण्याची गरज पडणार नाही. १४ एप्रिलपर्यंत संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू आहेत. सर्व आस्थापना बंद असल्याने गरिबांच्या हातात पैसा राहणार नाही, म्हणून गरिबांच्या बँक खात्यामध्ये सरकार पैसा टाकणार असल्याची घोषणा केली आहे. जिल्ह्यात स्वस्त धान्याची जवळपास १२०० वर दुकाने असून, ७ लाखांवर कार्डधारक आहेत. तर ३० लाखांवर लाभार्थी आहेत. पूर्वी रेशनची दुकाने ही काही ठराविक वेळेसाठीच उघडी राहत होती. मात्र आता या काळामध्ये ही दुकाने सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेमध्ये खुली राहणार आहेत. ग्राहकांना तीन महिन्याचा धान्य पुरवठा होणार असल्याने दुकानदारांनाही शासनाकडे तीन महिन्याचे चालान भरावे लागणार आहे. ज्या दुकानदारांकडे तीन महिन्याचे चालान भरण्याइतके पैसे नसतील, त्यांना शासनाकडून क्रेडिट मिळणार आहे. यानंतर पुढील महिन्यात सदरचे पैसे त्यांच्याकडून समायोजित केले जाणार आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता शासनाकडून धान्य दुकानांमध्ये रेशनचा पुरवठा करण्यात आला आहे. ग्रामीण भागामध्ये रेशन वितरणालाही सुरुवात झाली आहे. तर शहरी भागामध्ये येत्या १ एप्रिलपासून धान्य वितरणाला सुरुवात होणार आहे.असे मिळणार रेशनप्रत्येक रेशनकार्ड धारकांना प्रति व्यक्ती ३ किलो गहू २ रुपये प्रति किलो दराने, तांदूळ ३ रुपये किलो दराने प्रति व्यक्ती २ किलो मिळणार आहेत. तर तूरडाळ ५५ रुपये किलो प्रमाणे १ किलो, तर साखर २० रुपये दराने १ किलो वितरण होणार आहे. शहरातील व ग्रामीण भागातील जवळपास सर्वच रेशन दुकानांमध्ये धान्याचा पुरवठा करण्यात आला आहे. दुकानदारांनी ग्राहकांना तीन महिन्याचे धान्य एकाचवेळी द्यावयाचे आहे. जो दुकानदार धान्य देण्यास नकार देणार अशांचा परवानाही रद्द करण्यात येईल.भास्कर तायडे, अन्नधान्य वितरण अधिकारी

टॅग्स :foodअन्नGovernmentसरकार