शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
2
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
3
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
4
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
5
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
6
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
7
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
8
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
9
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
10
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
11
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
12
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
13
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
14
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
15
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
16
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
17
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
18
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
19
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
20
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
Daily Top 2Weekly Top 5

..तर ईशान्येतील राज्यांचीही काश्मीरसारखीच स्थिती असती : मोहन भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 01:05 IST

आज अरुणाचल प्रदेशातील लोक चीनच्या सीमेवर उभे राहून भारताच्या समर्थनार्थ घोषणा देतात. ते भारतासोबत खंबीर आहेत. याचे श्रेय तेथे जाऊन तेथील लोकांशी एकरूप झालेल्या व्यक्तींनाच जात असल्याचे मत सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देम्हणून ते चीनच्या सीमेवर भारत समर्थनार्थ घोषणा देतात

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : ईशान्येकडील राज्य भारतासोबत राहतील की नाही याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत असे. आसाम, अरुणाचल प्रदेशमधील स्थिती काश्मीरसारखी तर होणार नाही ना, अशी भीती व्यक्त केली जायची. मात्र ५० वर्षांअगोदर काही लोक सेवाभाव घेऊन तेथे गेले. त्यामुळे आत्मियता व जिव्हाळा वाढीस लागला. आज अरुणाचल प्रदेशातील लोक चीनच्या सीमेवर उभे राहून भारताच्या समर्थनार्थ घोषणा देतात. ते भारतासोबत खंबीर आहेत. याचे श्रेय तेथे जाऊन तेथील लोकांशी एकरूप झालेल्या व्यक्तींनाच जात असल्याचे मत सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केले. नंदकुमार जोशी यांच्या शुभारंभ या पुस्तकाचे सरसंघचालकांच्या मंगळवारी प्रकाशन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.रामनगरातील शक्तिपीठ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध साहित्यिक शुभांगी भडभडे प्रामुख्याने उपस्थित होत्या. अरुणाचल प्रदेश हे शुद्ध भारतीय नाव असून तो प्रदेश आपला आहे. परंतु, चीन वेळोवेळी त्यावर आपला दावा ठोकण्यासाठी तिथल्या लोकांना प्रलोभने दाखवित असतो. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत जागरूक लोक राहतात असा समज आहे. परंतु, ज्यावेळी ईशान्येकडील राज्यांचे लोक दिल्लीला येतात त्यावेळी त्यांना तुम्ही चीनमधून आलात का, असे विचारले जाते. आपण क्षणभर विचार केला पाहिजे की, असल्या प्रश्नामुळे ईशान्येकडील लोकांना काय वाटत असेल. परस्परांशी असलेला संपर्काचा अभाव हे भारतातील बहुतांश समस्यांचे मूळ आहे, असे डॉ.भागवत म्हणाले. अरूणाचलसह ईशान्य भारतातील राज्यांमध्ये सोईसुविधांचा अभाव आहे. तिथले लोक मागास असून कुत्रे-मांजर खातात, असे म्हटले जाते. परंतु, त्यांच्या वाट्याला आलेले जीवन आणि परिस्थिती हा त्यांचा नव्हे आपला दोष आहे. विकासचक्रात त्यांचे मागे राहणे याला देशातील इतर भागात राहणारे लोक जबाबदार असल्याचे डॉ. भागवत म्हणाले. याप्रसंगी पुस्तकाचे लेखक नंदकुमार जोशी यांनी अरुणाचल प्रदेशातील वास्तव्याचे अनुभव मांडले. प्रसाद बर्वे यांनी संचालन केले.‘तेथील’ क्रांतिकारकांची नावे अभ्यासक्रमात नाहीतयावेळी सरसंघचालकांनी ईशान्येतील राज्यांच्या इतिहासाकडे दुर्लक्ष झाल्याची खंती व्यक्त केली. पारतंत्र्याच्या काळात देशाच्या इतर भागाप्रमाणे पूर्वोत्तर राज्यांमध्ये देखील स्वातंत्र्यासाठी आंदोलने व संघर्ष झाला. परंतु, तेथील क्रांतिकारकांची नावे, कर्तृत्व आणि कथा त्यांच्यापर्यंतच मर्यादित राहिल्यात. आम्हाला त्या अभ्यासक्रमात कधीच शिकवल्या नाहीत, असे ते म्हणाले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतnagpurनागपूर