शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

..तर ईशान्येतील राज्यांचीही काश्मीरसारखीच स्थिती असती : मोहन भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 01:05 IST

आज अरुणाचल प्रदेशातील लोक चीनच्या सीमेवर उभे राहून भारताच्या समर्थनार्थ घोषणा देतात. ते भारतासोबत खंबीर आहेत. याचे श्रेय तेथे जाऊन तेथील लोकांशी एकरूप झालेल्या व्यक्तींनाच जात असल्याचे मत सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देम्हणून ते चीनच्या सीमेवर भारत समर्थनार्थ घोषणा देतात

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : ईशान्येकडील राज्य भारतासोबत राहतील की नाही याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत असे. आसाम, अरुणाचल प्रदेशमधील स्थिती काश्मीरसारखी तर होणार नाही ना, अशी भीती व्यक्त केली जायची. मात्र ५० वर्षांअगोदर काही लोक सेवाभाव घेऊन तेथे गेले. त्यामुळे आत्मियता व जिव्हाळा वाढीस लागला. आज अरुणाचल प्रदेशातील लोक चीनच्या सीमेवर उभे राहून भारताच्या समर्थनार्थ घोषणा देतात. ते भारतासोबत खंबीर आहेत. याचे श्रेय तेथे जाऊन तेथील लोकांशी एकरूप झालेल्या व्यक्तींनाच जात असल्याचे मत सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केले. नंदकुमार जोशी यांच्या शुभारंभ या पुस्तकाचे सरसंघचालकांच्या मंगळवारी प्रकाशन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.रामनगरातील शक्तिपीठ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध साहित्यिक शुभांगी भडभडे प्रामुख्याने उपस्थित होत्या. अरुणाचल प्रदेश हे शुद्ध भारतीय नाव असून तो प्रदेश आपला आहे. परंतु, चीन वेळोवेळी त्यावर आपला दावा ठोकण्यासाठी तिथल्या लोकांना प्रलोभने दाखवित असतो. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत जागरूक लोक राहतात असा समज आहे. परंतु, ज्यावेळी ईशान्येकडील राज्यांचे लोक दिल्लीला येतात त्यावेळी त्यांना तुम्ही चीनमधून आलात का, असे विचारले जाते. आपण क्षणभर विचार केला पाहिजे की, असल्या प्रश्नामुळे ईशान्येकडील लोकांना काय वाटत असेल. परस्परांशी असलेला संपर्काचा अभाव हे भारतातील बहुतांश समस्यांचे मूळ आहे, असे डॉ.भागवत म्हणाले. अरूणाचलसह ईशान्य भारतातील राज्यांमध्ये सोईसुविधांचा अभाव आहे. तिथले लोक मागास असून कुत्रे-मांजर खातात, असे म्हटले जाते. परंतु, त्यांच्या वाट्याला आलेले जीवन आणि परिस्थिती हा त्यांचा नव्हे आपला दोष आहे. विकासचक्रात त्यांचे मागे राहणे याला देशातील इतर भागात राहणारे लोक जबाबदार असल्याचे डॉ. भागवत म्हणाले. याप्रसंगी पुस्तकाचे लेखक नंदकुमार जोशी यांनी अरुणाचल प्रदेशातील वास्तव्याचे अनुभव मांडले. प्रसाद बर्वे यांनी संचालन केले.‘तेथील’ क्रांतिकारकांची नावे अभ्यासक्रमात नाहीतयावेळी सरसंघचालकांनी ईशान्येतील राज्यांच्या इतिहासाकडे दुर्लक्ष झाल्याची खंती व्यक्त केली. पारतंत्र्याच्या काळात देशाच्या इतर भागाप्रमाणे पूर्वोत्तर राज्यांमध्ये देखील स्वातंत्र्यासाठी आंदोलने व संघर्ष झाला. परंतु, तेथील क्रांतिकारकांची नावे, कर्तृत्व आणि कथा त्यांच्यापर्यंतच मर्यादित राहिल्यात. आम्हाला त्या अभ्यासक्रमात कधीच शिकवल्या नाहीत, असे ते म्हणाले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतnagpurनागपूर