शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

'त्यांची' हत्या एकाच मंतरलेल्या पिस्तुलाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 00:14 IST

महाराष्ट्र आणि कर्नाटकात एका विशिष्ट समुदायाच्या विचारधारेवर प्रहार करणाऱ्या व्यक्तींची एकाच मंतरलेल्या पिस्तुलाच्या सहाय्याने हत्या करण्यात आली असल्यायाची टीका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली. महागाई व कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरील चर्चेत बोलतांना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर  हल्ला बोल केला.

ठळक मुद्देपृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र आणि कर्नाटकात एका विशिष्ट समुदायाच्या विचारधारेवर प्रहार करणाऱ्या व्यक्तींची एकाच मंतरलेल्या पिस्तुलाच्या सहाय्याने हत्या करण्यात आली असल्यायाची टीका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली. महागाई व कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरील चर्चेत बोलतांना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर  हल्ला बोल केला.ते म्हणाले, एका विशिष्ट कट्टरवादी विचारांनी प्रेरित काही संघटना राज्यात आणि देशात कार्यरत आहेत. देशभरात सामाजिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्या करण्यात आली. ती हत्या एका विचारांनी भारावलेल्या लोकांनी आणि मंतरलेल्या पिस्तुलाच्या सहाय्याने करण्यात आल्याचे आता तपासात उघड होत आहे. या चौघांच्याही शरीरावर झाडण्यात आलेल्या गोळ्या एकाच पद्धतीच्या असल्याची माहिती तपासात पुढे येत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.पृथ्वीराज चव्हाण आणि अतुल भातखळकर यांच्यात खडाजंगीएका विशिष्ठ विचारांच्या सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी आघाडी सरकारच्या काळात केली गेली होती. त्यावर अजूनही निर्णय प्रलंबित असून त्या संस्थेवर आता बंदी घालण्यात यावी, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी सभागृहात केली. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी चव्हान यांच्या भाषणावर हरकत घेत तत्कालीन यूपीए सरकारनेच सनातन संस्थेच्या बंदीचा प्रस्ताव फेटाळला असल्याचे सांगितले. यावर चव्हाण यांनी हा प्रस्ताव अद्यापही फेटाळण्यात आला नसल्याचे सांगितल्याने दोघांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी एकीकडे भाजप आमदार तर दुसरीकडे काँग्रेस आमदारानी गदारोळ घालत वेलमध्ये येण्याचा प्रयत्न केला .कोरेगाव भीमा दंगलीतील मुख्य सूत्रधार मोकाटकोरेगाव भीमाची दंगल ही पूर्व नियोजित असल्याचे म्हटले आहे. या दंगलीला जबाबदार असलेल्या व्यक्तींना खऱ्या अथार्ने अटक होणे गरजेचे होते. मात्र, तो मोकाट आहे. राज्यात त्या व्यक्तीचा सत्कार होत आहे. भाषणे होत आहे. तेव्हा त्याला सरकारचा राजाश्रय आहे, असे का समजू नये, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.अहमदाबादचे महत्त्व वााढवण्यासाठी बुलेट ट्रेनपंतप्रधानांनी केवळ अहमदाबादचे महत्व वाढवण्यासाठीच बुलेट ट्रेन आणली आहे. यामुळे महाराष्ट्राला कुठलाही फायदा होणार नाही. ७० टक्के ही रेल्वे गुजरातमध्ये आहे. तेव्हा महाराष्ट्राने अर्धा निधी काा द्यावा, असा प्रश्नही पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला.

 

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण