शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

संयुक्त राष्ट्राने असमानतेचे धोरण सोडावे; कैलास सत्यार्थींचे परखड बोल

By योगेश पांडे | Updated: March 20, 2023 20:55 IST

Nagpur News संयुक्त राष्ट्राने भेदभावाचे धोरण बाजूला सारत जास्त सर्वसमावेशक आणि गतिमान होण्याची गरज आहे. सोबतच संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचा विस्तार करण्याचीही आवश्यकता आहे, असे प्रतिपादन नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी केले.

 

नागपूर : सद्य:स्थितीत संपूर्ण जग हे एका संकटाच्या स्थितीतून जात आहे. अशा परिस्थितीत संयुक्त राष्ट्राची भूमिका महत्त्वाची ठरते. संयुक्त राष्ट्राने भेदभावाचे धोरण बाजूला सारत जास्त सर्वसमावेशक आणि गतिमान होण्याची गरज आहे. सोबतच संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचा विस्तार करण्याचीही आवश्यकता आहे, असे प्रतिपादन नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी केले. ‘जी-२०’अंतर्गत नागपुरात आयोजित ‘सी-२०’ समिटच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

भारतात विविध प्रकारच्या शंभर समस्या असल्या तरी १० लाख उपायांचे माहेरघरदेखील हीच भूमी आहे. ‘सी-२०’चा गाभा हा अध्यात्माशी जुळला असून, याचे कुठल्याही धर्माशी काहीच घेणेदेणे नाही. ‘सी-२०’मधील प्रतिनिधी हे लोकशाहीचे वाहक आहेत. ‘एक जग, एक कुटुंब’ ही संकल्पना प्रत्यक्षात येणे गरजेचे आहे. मात्र, यासाठी मोठ्या राष्ट्रांनी आडमुठे धोरण सोडण्याची गरज आहे. ‘जी-७’ राष्ट्रांकडून गरीब व अविकसित देशांना कोरोनानंतर मदत व्हावी, यासाठी ११ ट्रिलीयन डॉलर्सचा निधी उभारण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात गरजू, गरीब देशांना यातील अवघा ०.१३ टक्के निधीच देण्यात आला. जगातील देशांनी त्यांच्या सैन्यावरील १० दिवसांचा खर्च कमी केला असता तर याहून अधिक निधी गोळा झाला असता. ‘एक जग, एक कुटुंब’ असे नारे देत असताना जगात सुरू असलेला हा आर्थिक, राजकीय अन्याय दूर व्हायला हवा. अशा स्थितीत जगाच्या नजरा भारताकडे आहेत. दया आणि करुणेचा दृष्टिकोन असलेल्या भारताने ग्लोबलायझेशनचे नेतृत्व करायला हवे, असे आवाहन यावेळी सत्यार्थी यांनी केले.

टॅग्स :Socialसामाजिक