शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

संयुक्त राष्ट्राने असमानतेचे धोरण सोडावे; कैलास सत्यार्थींचे परखड बोल

By योगेश पांडे | Updated: March 20, 2023 20:55 IST

Nagpur News संयुक्त राष्ट्राने भेदभावाचे धोरण बाजूला सारत जास्त सर्वसमावेशक आणि गतिमान होण्याची गरज आहे. सोबतच संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचा विस्तार करण्याचीही आवश्यकता आहे, असे प्रतिपादन नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी केले.

 

नागपूर : सद्य:स्थितीत संपूर्ण जग हे एका संकटाच्या स्थितीतून जात आहे. अशा परिस्थितीत संयुक्त राष्ट्राची भूमिका महत्त्वाची ठरते. संयुक्त राष्ट्राने भेदभावाचे धोरण बाजूला सारत जास्त सर्वसमावेशक आणि गतिमान होण्याची गरज आहे. सोबतच संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचा विस्तार करण्याचीही आवश्यकता आहे, असे प्रतिपादन नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी केले. ‘जी-२०’अंतर्गत नागपुरात आयोजित ‘सी-२०’ समिटच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

भारतात विविध प्रकारच्या शंभर समस्या असल्या तरी १० लाख उपायांचे माहेरघरदेखील हीच भूमी आहे. ‘सी-२०’चा गाभा हा अध्यात्माशी जुळला असून, याचे कुठल्याही धर्माशी काहीच घेणेदेणे नाही. ‘सी-२०’मधील प्रतिनिधी हे लोकशाहीचे वाहक आहेत. ‘एक जग, एक कुटुंब’ ही संकल्पना प्रत्यक्षात येणे गरजेचे आहे. मात्र, यासाठी मोठ्या राष्ट्रांनी आडमुठे धोरण सोडण्याची गरज आहे. ‘जी-७’ राष्ट्रांकडून गरीब व अविकसित देशांना कोरोनानंतर मदत व्हावी, यासाठी ११ ट्रिलीयन डॉलर्सचा निधी उभारण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात गरजू, गरीब देशांना यातील अवघा ०.१३ टक्के निधीच देण्यात आला. जगातील देशांनी त्यांच्या सैन्यावरील १० दिवसांचा खर्च कमी केला असता तर याहून अधिक निधी गोळा झाला असता. ‘एक जग, एक कुटुंब’ असे नारे देत असताना जगात सुरू असलेला हा आर्थिक, राजकीय अन्याय दूर व्हायला हवा. अशा स्थितीत जगाच्या नजरा भारताकडे आहेत. दया आणि करुणेचा दृष्टिकोन असलेल्या भारताने ग्लोबलायझेशनचे नेतृत्व करायला हवे, असे आवाहन यावेळी सत्यार्थी यांनी केले.

टॅग्स :Socialसामाजिक