शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कायदा जगण्यातला अडसर ठरत असल्याने आदिवासी मुलाने मागितली इच्छामरणाची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2023 22:19 IST

Nagpur News शेती असूनही ती विकण्याची सोय नसल्याने हा कायदा आपल्या जगण्यातील अडसर ठरत आहे. त्यामुळे आपणास इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी लिहीगाव येथील चैतू उईके यांचा मुलगा सेवक उईके या आदिवासी शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

ठळक मुद्देआदिवासी जमीन प्रतिबंधक कायदा ठरतोय जगण्यातील अडसर

नागपूर : आदिवासींची जमीन विक्री प्रतिबंधक कायदा आदिवासींच्या भल्यासाठी असला तरी सरकारने आदिवासींच्या अडचणींचा विचारच केला नाही. त्यामुळे शेती असूनही ती विकण्याची सोय नसल्याने हा कायदा आपल्या जगण्यातील अडसर ठरत आहे. त्यामुळे आपणास इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी कामठी तालुक्यातील लिहीगाव येथील चैतू उईके यांचा मुलगा सेवक उईके या आदिवासी शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपल्या उपजीविकेमध्ये आलेली अडचण मांडली. ते म्हणाले, आदिवासींच्या भल्यासाठीच सरकारने त्यांच्या शेतजमिनीला विक्रीकरिता प्रतिबंध घालणारा कायदा लागू केला. मात्र, जेथे शेती करणे शक्य नाही येथीलही शेती विकता येत नाही. पॉवर हाऊसच्या जवळ असलेली शेती करणे आता कठीण झाले आहे. त्यामध्ये उत्पन्न होत नसल्याने ती विकून दुसरी शेती खरेदी करण्याशिवाय पर्याय नाही. यासाठी दोन वर्षांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज करून परवानगी मागितली आहे. मात्र, काहीच फायदा झाला नाही. या काळात आपल्या मुलीचे दुर्धर ऑपरेशन झाले. त्यासाठी पैसा उभारता आला नाही. शेतीत उत्पन्न होत नसल्याने कुटुंबाची उपजीविका चालविणेही कठीण झाले आहे. अशा स्थितीतही सरकार जमीन विकण्यासाठी परवानगी देत नसेल तर आपणास इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. आपल्यासारखीच अनेक शेतकऱ्यांचीही अडचण आहे. त्यांना मंत्रालयापर्यंत धाव घेणे शक्य नाही. त्यामुळे सरकारने याचा विचार करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

टॅग्स :Socialसामाजिक