शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲपलचा विरोध, विरोधकांचाही विरोध! केंद्राचा  'संचार साथी' ॲपवर यू-टर्न, प्री-इंस्टॉल करण्याची अनिवार्यता मागे घेतली...
2
Ruturaj Gaikwad Maiden Century : पुणेकरानं संधीचं सोनं करुन दाखवलं! या कारणामुळं ऋतुराजची पहिली सेंच्युरी ठरते खास
3
सांगलीतील आष्ट्यातील स्ट्राँगरुमबाहेर महाविकास आघाडीचा गदारोळ; मतांच्या आकडेवारीत तफावत, सुरक्षा नसल्याचाही दावा
4
अल-फलाहचा बनावट कारभार! रोज तयार व्हायची १००-१५० बोगस रुग्णांची यादी; विरोध केल्यास हिंदू कर्मचाऱ्यांचा पगार कापायचे
5
पुतीन भारतात येण्यापूर्वी रशियाकडून मोठी भेट...! रशियन लष्करी तळ वापरता येणार, त्यांच्या संसदेची मंजुरी...
6
दिल्ली कार स्फोटातील मुख्य आरोपी जसीरच्या कोठडीत वाढ! NIA आणखी चौकशी करणार; नेमके आरोप काय? 
7
Gold Silver Price Today: चांदी ऑल टाईम 'हाय'वर; सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदी करणार असाल तर खिसा करावा लागेल रिकामा
8
'मुंबई इंडियन्स'ने संघात घेताच कर्णधार शार्दुल ठाकूरचा धमाका; ७ चेंडूत घेतले ४ बळी
9
राज्यातील मतमोजणी पुढे ढकलणारी याचिका कोणी केली होती? वर्ध्यात सगळा घोळ झाला, या पक्षाच्या उमेदवाराने....
10
फार्मा क्षेत्रातील दुसरी सर्वात वेगवान वाढणारी कंपनी IPO आणतेय; एका लॉटसाठी किती पैसे लागणार?
11
सावधान! आईस्क्रीम, च्युइंगम, शुगर फ्री प्रोडक्टमुळे लिव्हर खराब; खाण्याआधी एकदा 'हे' वाचाच
12
'जनता माफ करणार नाही', पंतप्रधान मोदींचा चहा विकतानाच्या एआय व्हिडिओवरुन भाजपची जोरदार टीका
13
iPhone Air च्या किंमतीत मोठी घसरण, आजवरचा सर्वात स्लीम iPhone सर्वात स्वस्त! जाणून घ्या सविस्तर
14
IND vs SA : हिटमॅन रोहितला अंपायरनं दिलं Not Out; पण क्विंटन डी कॉकच्या हुशारीनं निर्णय बदलला अन्....
15
लग्नाला जाण्याचा बहाणा करून 'तो' गुपचुप गर्लफ्रेंडला भेटायला गेला, मुलीच्या घरच्यांनी पाहिलं अन् पुढे जे झालं..
16
एकाच्या बदल्यात २४ फ्री शेअर्स देणार ही कंपनी; ५५९३% चा मल्टीबॅगर रिटर्न, शेअरधारकांना दुसऱ्यांदा मोठं गिफ्ट
17
Harshit Rana: भरमैदानात हर्षित राणाचा 'तो' इशारा; आयसीसीला खटकलं, ठोठावला 'इतका' दंड!
18
रुपया ऐतिहासिक नीचांकीवर; TCS झाली श्रीमंत! एकाच दिवसात २७,६४२ कोटींची कमाई; 'हे' आहे कारण?
19
'या' ७ देशात पाण्यासारखा वाहतो पैसा, पण पिण्याच्या पाण्यासाठी तरसतात लोक, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तर नागपूर जिल्ह्यात १ ते २ अंशाने वाढेल तापमान; CSTP संस्थेचा धाेकादायक इशारा

By निशांत वानखेडे | Updated: March 10, 2024 18:22 IST

राज्यात ०.२५ ते ०.४२ अंश वाढीचा अंदाज

निशांत वानखेडे, नागपूर: सेंटर फॉर सायन्स, टेक्नालॅजी अॅण्ड पाॅलिसी या संस्थेने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याच्या अभ्यासातून धाेकादायक इशारा दिला आहे. महाराष्ट्रात उन्हाळ्याचे तापमान ०.२५ ते ०.४२ अंशाने वाढण्याचा आणि बहुतेक जिल्ह्याचे तापमान प्रदूषणाच्या कमी-अधिक प्रमाणानुसार १ ते २ अंशाने वाढण्याचा इशारा दिला आहे. हिव्वाळ्यात ०.३ ते ०.५५ अंशाने वाढ होण्याची शक्यता आहे.

सातत्याने हाेत असलेले प्रदूषण वाढीमुळे २०५० पर्यंत जागतिक तापमानवाढ दीड नाही तर ३ अंशाने वाढण्याचा इशारा इंटरगव्हर्नमेंटल पॅनल फाॅर क्लायमेट चेंज (आयपीसीसी) ने आधीच दिला आहे. २०३० पर्यंत हाेणारी १ ते १.५ अंश तापमानवाढ २०२३ मध्येच गाठली आहे. भारत देश हवामान जोखीम निर्देशांकात ७ व्या आणि नैसर्गिक आपत्ती निर्देशांकात ३ ऱ्या क्रमांकावर आहे. त्यातही हवामान बदलासाठी विदर्भ आणि मध्य भारत हा अतिशय संवेदनशील भूभाग बनला असून पुढील काळात येथे राहणे कठीण होण्याचा इशारा अनेक संशोधनातून देण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाची आकडेवारी आणि काॅर्डेक्स (काेऑर्डिनेटेड रिजनल क्लायमेट डाउनस्केलिंग एक्सपेरिमेंट) माॅडेलच्या माध्यमातून प्रदूषणाच्या कमी व अधिक प्रमाणानुसार महाराष्ट्रातील सर्वच जिल्हा निहाय खालील अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

१ अंशापेक्षा अधिक डिग्री तापमान वाढीचे जिल्हे : भंडारा-२.०, अकोला-१.३, अमरावती-१.६, नागपूर-१.१, औरंगाबाद-१.१, बीड-१.२, गोंदिया-१.१, बुलढाना-१.४, धुळे-१.१, हिंगोली-१.२, जळगाव-१.३, लातूर-१.४,, नंदुरबार-१.६, उस्मानाबाद-१.४, वर्धा-१.१, वाशीम-१.२, यवतमाळ-१.१ अंश.

- सर्वात कमी तापमान वाढीचे जिल्ह्ये : गडचिरोली,कोल्हापूर ,मुंबई,पालघर, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे.- सर्वाधिक तापमान असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात मात्र (०.८) तापमान वाढ आणि उष्ण लहरी कमी हाेण्याचा अंदाज आहे.

- प्रदूषण असेच वाढत राहिले तर २०५० पर्यंत सर्वाधिक तापमान वाढ : अकोला-२.५ ,अमरावती -२.९,औरंगाबाद २.९, भंडारा-२.६, बुलढानां -२.३, धुळे २.२, गोंदिया-२.१, हिंगोली-२.२, जळगाव-२.५, जालना-२.७, नागपूर-२.२, नंदुरबार-२.५, नाशिक-२.४, वर्धा-२.१, वाशीम-२.३ डिग्रीने वाढेल.

नागपूरचे प्रदूषण२०२३ च्या ३६५ दिवसांपैकी केवळ ७० दिवस आरोग्यदायी श्रेणीत. १२५ दिवस हे साधारण प्रदूषणाचे श्रेणीत. १२१ दिवस माफक प्रदूषण, ४६ दिवस अतिशय प्रदूषित श्रेणीत, तर ३ दिवस आरोग्यास हानिकारक श्रेणीत आढळले आहेत.

गेल्या दशकापासून दरवर्षी पृथ्वीचे सरासरी तापमान वाढत असून येणारे प्रत्येक वर्ष हे मागच्या वर्षाचे रेकोर्ड तोडत आहेत. ऋतू बदल,हवामान बदल झाल्याचे हे जिवंत लक्षण आहे. जागतिक हवामान अभ्यास करणाऱ्या संस्थांनी भारताच्या हवामान बदलाविषयी जे अंदाज काढले ते अतिशय धोकादायक आहेत. महाराष्ट्राची ही आकडेवारी धाेक्याचे संकेत आहेत. त्यावर तातडीने उपाय याेजना करण्याची गरज आहे.- प्रा. सुरेश चाेपणे, हवामान अभ्यासक.

टॅग्स :Summer Specialसमर स्पेशलnagpurनागपूर