शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

तर नागपूर जिल्ह्यात १ ते २ अंशाने वाढेल तापमान; CSTP संस्थेचा धाेकादायक इशारा

By निशांत वानखेडे | Updated: March 10, 2024 18:22 IST

राज्यात ०.२५ ते ०.४२ अंश वाढीचा अंदाज

निशांत वानखेडे, नागपूर: सेंटर फॉर सायन्स, टेक्नालॅजी अॅण्ड पाॅलिसी या संस्थेने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याच्या अभ्यासातून धाेकादायक इशारा दिला आहे. महाराष्ट्रात उन्हाळ्याचे तापमान ०.२५ ते ०.४२ अंशाने वाढण्याचा आणि बहुतेक जिल्ह्याचे तापमान प्रदूषणाच्या कमी-अधिक प्रमाणानुसार १ ते २ अंशाने वाढण्याचा इशारा दिला आहे. हिव्वाळ्यात ०.३ ते ०.५५ अंशाने वाढ होण्याची शक्यता आहे.

सातत्याने हाेत असलेले प्रदूषण वाढीमुळे २०५० पर्यंत जागतिक तापमानवाढ दीड नाही तर ३ अंशाने वाढण्याचा इशारा इंटरगव्हर्नमेंटल पॅनल फाॅर क्लायमेट चेंज (आयपीसीसी) ने आधीच दिला आहे. २०३० पर्यंत हाेणारी १ ते १.५ अंश तापमानवाढ २०२३ मध्येच गाठली आहे. भारत देश हवामान जोखीम निर्देशांकात ७ व्या आणि नैसर्गिक आपत्ती निर्देशांकात ३ ऱ्या क्रमांकावर आहे. त्यातही हवामान बदलासाठी विदर्भ आणि मध्य भारत हा अतिशय संवेदनशील भूभाग बनला असून पुढील काळात येथे राहणे कठीण होण्याचा इशारा अनेक संशोधनातून देण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाची आकडेवारी आणि काॅर्डेक्स (काेऑर्डिनेटेड रिजनल क्लायमेट डाउनस्केलिंग एक्सपेरिमेंट) माॅडेलच्या माध्यमातून प्रदूषणाच्या कमी व अधिक प्रमाणानुसार महाराष्ट्रातील सर्वच जिल्हा निहाय खालील अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

१ अंशापेक्षा अधिक डिग्री तापमान वाढीचे जिल्हे : भंडारा-२.०, अकोला-१.३, अमरावती-१.६, नागपूर-१.१, औरंगाबाद-१.१, बीड-१.२, गोंदिया-१.१, बुलढाना-१.४, धुळे-१.१, हिंगोली-१.२, जळगाव-१.३, लातूर-१.४,, नंदुरबार-१.६, उस्मानाबाद-१.४, वर्धा-१.१, वाशीम-१.२, यवतमाळ-१.१ अंश.

- सर्वात कमी तापमान वाढीचे जिल्ह्ये : गडचिरोली,कोल्हापूर ,मुंबई,पालघर, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे.- सर्वाधिक तापमान असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात मात्र (०.८) तापमान वाढ आणि उष्ण लहरी कमी हाेण्याचा अंदाज आहे.

- प्रदूषण असेच वाढत राहिले तर २०५० पर्यंत सर्वाधिक तापमान वाढ : अकोला-२.५ ,अमरावती -२.९,औरंगाबाद २.९, भंडारा-२.६, बुलढानां -२.३, धुळे २.२, गोंदिया-२.१, हिंगोली-२.२, जळगाव-२.५, जालना-२.७, नागपूर-२.२, नंदुरबार-२.५, नाशिक-२.४, वर्धा-२.१, वाशीम-२.३ डिग्रीने वाढेल.

नागपूरचे प्रदूषण२०२३ च्या ३६५ दिवसांपैकी केवळ ७० दिवस आरोग्यदायी श्रेणीत. १२५ दिवस हे साधारण प्रदूषणाचे श्रेणीत. १२१ दिवस माफक प्रदूषण, ४६ दिवस अतिशय प्रदूषित श्रेणीत, तर ३ दिवस आरोग्यास हानिकारक श्रेणीत आढळले आहेत.

गेल्या दशकापासून दरवर्षी पृथ्वीचे सरासरी तापमान वाढत असून येणारे प्रत्येक वर्ष हे मागच्या वर्षाचे रेकोर्ड तोडत आहेत. ऋतू बदल,हवामान बदल झाल्याचे हे जिवंत लक्षण आहे. जागतिक हवामान अभ्यास करणाऱ्या संस्थांनी भारताच्या हवामान बदलाविषयी जे अंदाज काढले ते अतिशय धोकादायक आहेत. महाराष्ट्राची ही आकडेवारी धाेक्याचे संकेत आहेत. त्यावर तातडीने उपाय याेजना करण्याची गरज आहे.- प्रा. सुरेश चाेपणे, हवामान अभ्यासक.

टॅग्स :Summer Specialसमर स्पेशलnagpurनागपूर