शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

उपराजधानीत पारा ३५ अंशावर, ताप वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2022 22:15 IST

Nagpur News बुधवारी नागपुरात ३५ अंश तापमानाची नाेंद करण्यात आली. आतापासूनच ताप भडकल्याने भर उन्हाळ्यात काय हाेईल, याची चिंता नागरिकांना लागली आहे.

नागपूर : अद्याप फेब्रुवारी महिना संपण्यास पाच दिवसांचा अवधी असताना सूर्याचा ताप वाढल्याचे दिसत आहे. दिवसाचा पारा सरासरीपेक्षा २.४ अंशाने अधिक असून बुधवारी नागपुरात ३५ अंश तापमानाची नाेंद करण्यात आली. आतापासूनच ताप भडकल्याने भर उन्हाळ्यात काय हाेईल, याची चिंता नागरिकांना लागली आहे.

हवामान विभागाने विदर्भात आठवडाभर तापमान सामान्यपेक्षा ३ ते ५ अंशाने अधिक राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. गेल्या दाेन-तीन दिवसांपासून सूर्याचा प्रकाेप जाणवायला लागला आहे. काही दिवसांपूर्वी हवेसे वाटणारे सकाळचे ऊन आता तीव्र वाटायला लागले आहे. उन्हामुळे दिवसभर गरमीची जाणीव हाेत आहे. मात्र रात्री हवेत गारवा असल्याने तेवढाच दिलासा नागरिकांना आहे. मात्र घरी उष्णतेची जाणीव हाेत आहे. बुधवारी नागपूरला रात्रीचे किमान तापमान १४.४ अंश नाेंदविण्यात आले, ते २४ तासात २ अंशाने वाढले, पण सरासरीपेक्षा १.७ अंश कमी आहे. त्यामुळे हवेत गारवा आहे.

विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांत दिवसाच्या सरासरी तापमानात २ ते ४ अंशाची वाढ झाली आहे. यवतमाळ, अमरावती, वर्ध्यामध्ये ३६ अंश तापमानाची नाेंद करण्यात आली. ३७.८ अंशासह अकाेला सर्वाधिक तापलेला हाेता. येथे रात्रीच्या तापमानात ३.८ अंशाची वाढ दिसत असून १८.६ अंशाची नाेंद झाली. रात्रीचे किमान तापमान यवतमाळमध्ये २० अंश, बुलडाणा १९.५ अंश, अमरावती १६.५ अंश, तर ब्रम्हपुरीत १५ अंश हाेते. येत्या काळात दिवस आणि रात्रीच्या तापमानात वाढ हाेणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला.

टॅग्स :weatherहवामान