शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

सूर्यावर स्फाेट वाढले, ज्वाळांची धग पृथ्वीपर्यंत; भारतासारख्या उत्तर कटिबंधीय देशांवर प्रभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2022 07:00 IST

Nagpur News २०२५-२६ पर्यंत स्फाेट व ज्वाळांच्या वादळाची तीव्रता अति राहणार आहे. यावर्षी फेब्रुवारीमध्ये सूर्यावर ५० स्फाेट झाल्याचा अंदाज असून त्याचा प्रभाव आता दिसून येत आहे.

ठळक मुद्दे२०२५ पर्यंत स्फाेटांची मालिका जाेरात

निशांत वानखेडे

नागपूर : गेल्या काही वर्षामध्ये सूर्यावर स्फाेटांची मालिका वाढली आहे. या स्फाेटामुळे अग्नीच्या ज्वाळा सूर्याच्या बाह्य आवरणातून बाहेर फेकल्या जात आहेत. या ज्वाळा पृथ्वीपर्यंत पाेहचत नसल्यातरी स्फाेटांमुळे साैर वात पृथ्वीच्या आवरणापर्यंत पाेहचत आहे. यामुळे पृथ्वीच्या कक्षेत फिरणाऱ्या सॅटेलाईटच्या कार्यावर आणि आपल्याकडे इलेक्ट्रिक उपकरणांवर परिणाम हाेण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. चक्रीवादळे वाढण्याचाही धाेका व्यक्त केला जात आहे.

सूर्यावर स्फाेट आणि शक्तिशाली ज्वाळांची वादळे तयार झाल्याची बातमी ‘लाेकमत’ने नाेव्हेंबर २०२१ ला प्रकाशित केली हाेती. या स्फाेटांची वारंवारता व तीव्रता अधिक वाढल्याचे निरीक्षण खगाेल वैज्ञानिकांनी नव्याने नाेंदविले आहे. नुकतेच ३१ मार्च आणि १४ एप्रिल राेजी सूर्यावर प्रचंड स्फाेट हाेत असल्याचे दिसून आले.

खगाेल अभ्यासक प्रा. सुरेश चाेपणे यांनी या घडामाेडीबाबत विश्लेषण मांडले. सूर्यावर दर ११ वर्षांनी मिनिमम (किमान) व मॅक्सिमम (कमाल) अशी सायकल चालते. साैर किमानमध्ये सूर्यावरील घडामाेडी कमी हाेतात. ही ११ वर्षांची साेलर मिनिमम सायकल २०१९ ला संपली व साेलर मॅक्सिममची सायकल सुरू झाली आहे. यामुळे स्फाेटांच्या घडामाेडी वाढल्या आहेत. या पुढे २०३० पर्यंत चालणार असून २०२५-२६ पर्यंत स्फाेट व ज्वाळांच्या वादळाची तीव्रता अति राहणार आहे. यावर्षी फेब्रुवारीमध्ये सूर्यावर ५० स्फाेट झाल्याचा अंदाज असून त्याचा प्रभाव आता दिसून येत आहे.

सूर्याच्या पृष्ठभागावरून पृथ्वीच्या आकाराएवढा तरल पदार्थ (मॅग्मा) बाहेर पडताे. त्यामुळे प्रकाश कमी हाेताे व सूर्यावर काळे डाग (सन स्पाॅट) दिसायला लागतात. स्फाेटांच्या मालिकांमुळे बाहेर फेकलेल्या साैर ज्वाळा शुक्र ग्रहापर्यंत पाेहचत असल्याचे दिसून येत आहे. याला ‘काेराेनल मास इजेक्शन’ (सीएमई) म्हणतात. साैर ज्वाळा येत नसल्या तरी साैर वात (साेलर विन्ड) पृथ्वीच्या वरील स्तरापर्यंत (स्पेस वेदर) पाेहचत असून त्यामुळे तापमान वाढले आहे. सीएमई किती दूरपर्यंत पाेहचू शकतात, याकडे वैज्ञानिकांचे लक्ष लागले आहे.

उपग्रह, इलेक्ट्रिक वस्तूंवर परिणाम

सूर्य सध्या विषुववृत्तीय भागातून म्हणजे भारतासारखे देश असलेल्या भागातून मार्गक्रमण करीत आहे. त्यामुळे त्याचा अधिक परिणाम आपल्याला जाणवणार आहे. यामुळे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर (जिओ मॅग्नेटिक) परिणाम हाेऊन चक्रीवादळे येण्याची शक्यता प्रा. सुरेश चाेपणे यांनी व्यक्त केली. याशिवाय फिरत असलेल्या सॅटेलाईटच्या इलेक्ट्रानिक यंत्रणेत बिघाड हाेण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिक उपकरणांवरही परिणाम हाेऊन ब्लॅक आऊट हाेण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

आधीच ग्लाेबल वाॅर्मिंगचा धाेका वाढला असताना पुन्हा साैर ज्वाळांचे नवे संकट उभे आहे. हे संकट किती प्रभाव पाडणार हे सांगता येणार नाही; पण सर्व देशांच्या यंत्रणांनी सावध हाेण्याची गरज आहे.

- प्रा. सुरेश चाेपणे, खगाेल अभ्यासक

टॅग्स :scienceविज्ञान