शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
4
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
5
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
6
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
7
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
8
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
9
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
10
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
11
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
12
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
13
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
14
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
16
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
17
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
18
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
19
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
20
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाल्यांच्या कर्कश भाेंग्यांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा खाेळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2023 20:31 IST

Nagpur News सद्य:स्थितीत विद्यार्थी सराव परीक्षा आणि अभ्यासात व्यस्त आहेत. अशा स्थितीत काेणताही व्यत्यय त्यांच्या अभ्यासावर परिणाम करू शकताे. असे असताना फेरीवाल्यांच्या भाेंग्यांच्या ध्वनी प्रदूषणाने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देसकाळपासून रात्रीपर्यंत सुरू असतो गोंगाटदहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मनस्ताप

नागपूर : सीबीएसई आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सध्याचा काळ अतिशय निर्वाणीचा आहे. फेब्रुवारीमध्ये बारावी आणि मार्चमध्ये दहावीची परीक्षा सुरू हाेत आहे. सद्य:स्थितीत विद्यार्थी सराव परीक्षा आणि अभ्यासात व्यस्त आहेत. अशा स्थितीत काेणताही व्यत्यय त्यांच्या अभ्यासावर परिणाम करू शकताे. असे असताना फेरीवाल्यांच्या भाेंग्यांच्या ध्वनी प्रदूषणाने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

पूर्वी आवाज देऊन माल विकणाऱ्या फेरीवाल्यांनी त्यांच्या ठेल्यावर भाेंगे लावून घेतले आहेत. रोजच्या वापरातील भाजीपाला- फळ विक्रीपासून कपडे,ब्लँकेट,चादरी,भांडे, भंगार खरेदीदार,विक्रेत्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यांच्या भाेंग्यावर कधी माेठमाेठ्याने गाणी सुरू असतात किवा त्यांच्या मालाची जाहीरात सुरू असते. किरकाेळ विक्रेते तर भाेंग्यावर गाणी वाजवितच गल्लीबाेळात फिरत असतात. अगदी पहाटेपासून शहराच्या जवळपास सर्वच भागात फेरीवाल्यांनी अगदी धुमाकूळ घातला आहे. सायकल, चारचाकी वाहन, दुचाकी, इलेक्ट्रिक रिक्षा, ऑटोरिक्षा, व्हॅन अशा वाहनांवर लहान भोंगे लावून मोठ्या आवाजात आपल्या वस्तूंचा, मालाचा प्रचार करत असल्याचे सर्रास दिसून येते. हा प्रकार रात्री सुद्धा अनुभवास येत आहे. त्यांच्या भोंग्याच्या मोठ्या आवाजामुळे विद्यार्थ्यांना अतिशय त्रास होत आहे. केवळ विद्यार्थी नव्हेच,तर रुग्ण,वृद्ध व्यक्ती ही मंडळी सुद्धा त्रस्त झाल्याचे आढळून आले.

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा खाेळंबा हाेत आहे. बाहेरचा भाेंगा थाेडा वेळ वाजताे,असे वाटत असले तरी एक गेला की दुसरा व दुसरा गेला की तिसरा येण्याचा प्रकार सुरू असताे. दुपारचा काही काळ साेडला तर सकाळी आणि सायंकाळी या भाेंग्यांची तीव्रता अधिक असते. या भोंग्याच्या आवाजाचा विलक्षण असा त्रास होत आहे. या भाेंगे लावणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई काेण करणार, हा प्रश्नच आहे.

उपरोक्त व्यावसायिकांना विरोध नसला तरी ते वापरत असलेल्या भाेंग्यांचा मनस्वी वैताग विद्यार्थ्यांना हाेत आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिका प्रशासनाने या विरोधात तात्काळ कारवाई करणे अपेक्षित आहे,जेणेकरून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी व्यत्यय होणार नाही.

संजय मुंदलकर,संयाेजक एज्यू अलर्ट शैक्षणिक दक्षता संस्था.

टॅग्स :Socialसामाजिक