शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
3
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
4
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
5
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
6
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
7
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
8
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
9
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
10
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
11
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
12
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
13
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
14
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
15
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
16
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
17
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
18
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
19
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
20
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक

"बार्टी'साठी पश्चिम महाराष्ट्र मायेचा, विदर्भ मावशीचा का?" विद्यार्थी संघटनेचा आरोप

By निशांत वानखेडे | Updated: December 13, 2023 18:58 IST

पुणे, नाशकात एमपीएससी प्रशिक्षणार्थी संख्येत वाढ; विदर्भाबाबत उदासीनता

निशांत वानखेडे, नागपूर: डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशाेधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत राज्यातील प्रत्येक विभागात एमपीएससीचे प्रशिक्षण दिले जाते. यासाठी निविदा काढून नाशिक व पुण्यात प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यात आली. विदर्भातील विद्यार्थ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राला मायेचा व विदर्भाकडे मावशीचा म्हणून भेदभाव करण्यात येत असल्याचा आराेप विद्यार्थी संघटनेने केला आहे.

युवा ग्रॅज्यूएट फाेरमचे अतुल खाेब्रागडे यांनी सांगितले, २०२३ मधे बार्टीने एमपीएससी क्लासेससाठी निविदा काढली, परंतु त्यात विदर्भाचा समावेश नव्हता. सुरुवातीला प्रत्येक विभागात २०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिल्या जाणार अशी भूमिका हाेती आणि पुणे व नाशिक विभागात प्रत्येकी २०० विद्यार्थ्यांचे प्रशिक्षणही सुरू झाले. ही संख्या कमी होते म्हणून पुन्हा नाशिक विभागात ३०० विद्यार्थी संख्या वाढवून ५०० करण्यात आली आणि पुणे विभागात संख्या ८०० ने वाढवून १००० करण्यात आली. या महत्त्वाकांक्षी उपक्रमातून नागपूर विभागाला मात्र वंचित ठेवण्यात आले. अनुसूचित जातीची लाेकसंख्या विदर्भात सर्वाधिक आहे. तरी हा प्रकार म्हणजे विदर्भातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय असून हे सर्व जाणीवपूर्वक केले जात असल्याचा आराेप खाेब्रागडे यांनी केला.

१८०० कर्मचारी, नागपुरात तीन-चारच कसे?

बार्टीमध्ये राज्यभरात कर्मचारी संख्या १८०० च्या घरात आहे. नागपूर कार्यालयात मात्र ३ ते ४ कर्मचार कार्यरत असल्याचे दिसतात. मग एवढे कर्मचारी कुठे सेवा देतात, असा सवाल खाेब्रागडे यांनी केला. जे कर्मचारी आहेत ते पुण्याच्या कार्यालयावर अवलंबून आहेत आणि पुण्याच्या ऑफिसमधून विदर्भाच्या समस्यांची दखलच घेतली जात नाही. मग बार्टीची कार्यकक्षा पुणे व पश्चिम महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे का? बार्टीची भरती प्रक्रिया पारदर्शक नसून बाह्य स्राेतांमधून पदे भरली जात असल्याचा गंभीर आराेप अतुल खाेब्रागडे यांनी केला. नागपूर हे उपराजधानीचे शहर असून एवढी लाेकसंख्या असताना नागपूरला बार्टीच्या उपकेंद्राचाही दर्जा मिळू नये, ही शाेकांतिका हाेय, अशह टीका त्यांनी केली.

मुख्यमंत्री घेणार का दखल?महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून नागपूरची ओळख आहे. विदर्भाचा विकास व्हावा हा उद्देश्य ठेऊन नागपुरात प्रत्येक वर्षाला हिवाळी अधिवेशन निश्चित करण्यात आले. मात्र वर्षभर धाेरणात्मक स्तरावर दुजाभाव हाेत असताना हे अधिवेशनही दिखाव्यासाठी आहे काय, असा सवाल उपस्थित हाेत आहे. विदर्भातील प्रश्न योग्य रित्या हातळले जात नसतील तर अधिवेशनाला अर्थ काय? सामाजिक न्याय विभाग मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित आहे. मुख्यमंत्री याची दखल घेतील काय, असा सवाल अतुल खाेब्रागडे यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Studentविद्यार्थी