शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

"बार्टी'साठी पश्चिम महाराष्ट्र मायेचा, विदर्भ मावशीचा का?" विद्यार्थी संघटनेचा आरोप

By निशांत वानखेडे | Updated: December 13, 2023 18:58 IST

पुणे, नाशकात एमपीएससी प्रशिक्षणार्थी संख्येत वाढ; विदर्भाबाबत उदासीनता

निशांत वानखेडे, नागपूर: डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशाेधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत राज्यातील प्रत्येक विभागात एमपीएससीचे प्रशिक्षण दिले जाते. यासाठी निविदा काढून नाशिक व पुण्यात प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यात आली. विदर्भातील विद्यार्थ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राला मायेचा व विदर्भाकडे मावशीचा म्हणून भेदभाव करण्यात येत असल्याचा आराेप विद्यार्थी संघटनेने केला आहे.

युवा ग्रॅज्यूएट फाेरमचे अतुल खाेब्रागडे यांनी सांगितले, २०२३ मधे बार्टीने एमपीएससी क्लासेससाठी निविदा काढली, परंतु त्यात विदर्भाचा समावेश नव्हता. सुरुवातीला प्रत्येक विभागात २०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिल्या जाणार अशी भूमिका हाेती आणि पुणे व नाशिक विभागात प्रत्येकी २०० विद्यार्थ्यांचे प्रशिक्षणही सुरू झाले. ही संख्या कमी होते म्हणून पुन्हा नाशिक विभागात ३०० विद्यार्थी संख्या वाढवून ५०० करण्यात आली आणि पुणे विभागात संख्या ८०० ने वाढवून १००० करण्यात आली. या महत्त्वाकांक्षी उपक्रमातून नागपूर विभागाला मात्र वंचित ठेवण्यात आले. अनुसूचित जातीची लाेकसंख्या विदर्भात सर्वाधिक आहे. तरी हा प्रकार म्हणजे विदर्भातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय असून हे सर्व जाणीवपूर्वक केले जात असल्याचा आराेप खाेब्रागडे यांनी केला.

१८०० कर्मचारी, नागपुरात तीन-चारच कसे?

बार्टीमध्ये राज्यभरात कर्मचारी संख्या १८०० च्या घरात आहे. नागपूर कार्यालयात मात्र ३ ते ४ कर्मचार कार्यरत असल्याचे दिसतात. मग एवढे कर्मचारी कुठे सेवा देतात, असा सवाल खाेब्रागडे यांनी केला. जे कर्मचारी आहेत ते पुण्याच्या कार्यालयावर अवलंबून आहेत आणि पुण्याच्या ऑफिसमधून विदर्भाच्या समस्यांची दखलच घेतली जात नाही. मग बार्टीची कार्यकक्षा पुणे व पश्चिम महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे का? बार्टीची भरती प्रक्रिया पारदर्शक नसून बाह्य स्राेतांमधून पदे भरली जात असल्याचा गंभीर आराेप अतुल खाेब्रागडे यांनी केला. नागपूर हे उपराजधानीचे शहर असून एवढी लाेकसंख्या असताना नागपूरला बार्टीच्या उपकेंद्राचाही दर्जा मिळू नये, ही शाेकांतिका हाेय, अशह टीका त्यांनी केली.

मुख्यमंत्री घेणार का दखल?महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून नागपूरची ओळख आहे. विदर्भाचा विकास व्हावा हा उद्देश्य ठेऊन नागपुरात प्रत्येक वर्षाला हिवाळी अधिवेशन निश्चित करण्यात आले. मात्र वर्षभर धाेरणात्मक स्तरावर दुजाभाव हाेत असताना हे अधिवेशनही दिखाव्यासाठी आहे काय, असा सवाल उपस्थित हाेत आहे. विदर्भातील प्रश्न योग्य रित्या हातळले जात नसतील तर अधिवेशनाला अर्थ काय? सामाजिक न्याय विभाग मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित आहे. मुख्यमंत्री याची दखल घेतील काय, असा सवाल अतुल खाेब्रागडे यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Studentविद्यार्थी