शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

राज्य शासनाने प्लास्टिक बंदीच्या निर्णयात केला बदल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2022 20:47 IST

Nagpur News महाराष्ट्र सरकारने २०१८ ला केलेल्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयात माेठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देनाॅन वोव्हन व नष्ट हाेणारे प्लास्टिक बंदीतून वगळणारलवकरच याबाबत परिपत्रक

नागपूर : महाराष्ट्र सरकारने २०१८ ला केलेल्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयात माेठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत ६० जीएसएम (ग्रॅम प्रती चाैरस मीटर) पेक्षा अधिक जाडी असलेले प्लास्टिक, पॉलीप्रॉपिलीन (नाॅन वोव्हन) पासून बनवलेल्या पिशव्या आणि ५० मायक्राॅनपेक्षा कमी आकाराच्या पॅकेजिंग उद्याेगात वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकला बंदीतून वगळण्यात येणार आहे. लवकरच याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संचालक मंडळ, पर्यावरण सचिव व तज्ज्ञ समितीच्या २५ नाेव्हेंबर २०२२ राेजी झालेल्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. वरील प्रकारचे प्लास्टिक बंदीतून वगळण्याचा प्रस्ताव पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निर्णयास पाठविण्यात आले. नुकताच मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत झालेल्या राज्याच्या पर्यावरण विभागाच्या बैठकीत या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे केंद्र सरकारने ऑगस्ट २०२१ मध्ये अधिसूचना जारी करून काही सूट देत देशभरात प्लास्टिक बंदी लागू केली हाेती. राज्य शासनाचा हा ठराव केंद्र सरकारच्या प्लास्टिक बंदीच्या धोरणाशी सुसंगत असल्याचे पर्यावरण विभागाच्या वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. हा ठराव मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर पुढील काही दिवसांत याबाबत सुधारित अधिसूचना जारी केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

उल्लेखनीय म्हणजे प्लास्टिक बंदीचा निर्णय लावणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य हाेते. राज्याच्या पर्यावरण विभागाने २३ मार्च २०१८ रोजी प्लास्टिक आणि थर्माकोलपासून बनवलेल्या सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्यांच्या उत्पादन, वापर, साठवणूक, वितरण, घाऊक, किरकोळ विक्री, आयात आणि वाहतुकीवर बंदी घातली होती. अर्ध्या लिटरपेक्षा कमी वाहून नेण्याची क्षमता असलेली उत्पादने आणि लहान पीईटी आणि पीईटीई बाटल्यांवरही बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयात सुधारणा करून नष्ट हाेण्यासारखे नाॅन ओव्हन प्लास्टिक बॅग, ६० जीएसएमपेक्षा अधिक जाडी असलेले प्लास्टिकला बंदीतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

निर्णय स्वागतार्ह

नाॅन वोव्हन टेक्सटाईल्स बॅग मेकर्स वेलफेअर असाेसिएशनचे अध्यक्ष ऐनाज खान व सचिव निकेतन डाेंगरे यांनी सांगितले, नाॅन वोव्हन बॅग सहन नष्ट हाेणे शक्य असून, प्लास्टिकचा सर्वाेत्तम पर्याय ठरल्या आहेत. इतर राज्यात नाॅन ओव्हन बॅगवर बंदी नसताना केवळ महाराष्ट्रात बंदी लादण्यात आली हाेती. त्यामुळे राज्य सरकारने नाॅन वोव्हनवरील बंदी हटवावी म्हणून आमचे प्रयत्न हाेते. बंदी हटविण्यात येत असल्याचे परिपत्रक आमच्याकडे आलेले नाही; पण राज्य सरकारने अशाप्रकारे निर्णय घेतला असेल तर ताे स्वागतार्ह असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी