शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ५३ मिनिटे, बुलडाण्यात १.६ तास दिसेल सूर्यग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2022 21:45 IST

Nagpur News २५ ऑक्टाेबर राेजी म्हणजे दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी सूर्यग्रहण अनुभवता येणार आहे.

ठळक मुद्देदेशात भूज व महाराष्ट्रात पालघरमध्ये सर्वाधिक काळ

नागपूर : २५ ऑक्टाेबर राेजी म्हणजे दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी सूर्यग्रहण अनुभवता येणार आहे. हे यावर्षीचे दुसरे व शेवटचे खंडग्रास सूर्यग्रहण आहे. देशात गुजरातच्या भूज येथे सर्वाधिक १ तास ४३ मिनिटे ग्रहण अनुभवता येईल, तर काेलकात्यात सर्वात कमी १२ मिनिटे हे ग्रहण दिसेल. राज्यात सर्वात कमी गडचिराेलीत ४७ मिनिटे, तर पालघरमध्ये सर्वाधिक काळ म्हणजे १ तास २१ मिनिटे हे ग्रहण पाहता येईल. नागपुरात ५३ मिनिटांपर्यंत सूर्यग्रहण अनुभवता येईल.

दर महिन्यात अमावास्येला सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र येताे; पण ते नेहमी एका रेषेत नसतात. २५ ऑक्टाेबरला ते एका रेषेत असतील; पण सूर्याचा काहीच भाग चंद्रामुळे झाकला जाईल. म्हणून याला आंशिक किंवा खंडग्रास सूर्यग्रहण म्हटले जाते. यावेळी पृथ्वीपासून चंद्राचे अंतर ३ लाख ७८ हजार २६७ किमी, तर सूर्याचे अंतर १४ काेटी ८७ लाख ८० हजार ९३० किमी असेल. युराेप, उत्तर अमेरिका, उत्तर आफ्रिका म्हणजे उत्तर गाेलार्धात सूर्य ८० टक्के झाकला जाईल तर दक्षिण गाेलार्धात ताे कमी असेल. भारतात ईशान्येकडील राज्यवगळता सर्वत्र ग्रहण दिसेल. गुजरातमध्ये २० टक्के, महाराष्ट्रात १० टक्के व केरळात ३ टक्के ग्रहण दिसेल.

जगात आइसलॅण्डमधून भारतीय वेळेनुसार दुपारी २.२९ वाजता ग्रहणाला सुरुवात हाेईल. देशात सायंकाळी ४.२९ वाजता सूर्यग्रहण सुरू हाेईल आणि ६.१५ वाजता ते संपेल.

ग्रहण कुठे किती काळ दिसेल?

- देशात गुजरातच्या भूजमध्ये १ तास ४३ मिनिटे सर्वाधिक काळ.

- सर्वात कमी १२ मिनिटे काेलकात्यात.

- महाराष्ट्रात सर्वात कमी ४३ मिनिटे गडचिराेलीत व सर्वाधिक काळ पालघरमध्ये १ तास २१ मिनिट.

- नागपूरला ५३ मिनिटे हाेणार दर्शन

९ वर्षे करावी लागेल प्रतीक्षा

यानंतर भारतीयांना सूर्यग्रहण पाहण्यासाठी तब्बल ९ वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. यानंतर २५ मे २०३१ राेजी केरळमध्ये कंकणाकृती सूर्यग्रहण दिसेल, तर २० मार्च २०३४ राेजी काश्मीरमधून खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दृष्टीने व सर्वसामान्यांनीही हे ग्रहण उपकरणांच्या मदतीने नक्की बघावे. अंधश्रद्धांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन स्काय वाॅच ग्रुपचे अध्यक्ष व खगाेल अभ्यासक प्रा. सुरेश चाेपणे यांनी केले आहे.

टॅग्स :solar eclipseसूर्यग्रहण