शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
3
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
4
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
5
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
8
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
9
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
10
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
11
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
12
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
13
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
14
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
15
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
16
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
17
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
18
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
19
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
20
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय

अनुभवावर आधारित मतांचा समृद्ध वारसा जपण्यातच प्रगतीची बिजे - प्रधान सचिव ब्रिजेश सिंह 

By आनंद डेकाटे | Updated: April 8, 2024 14:38 IST

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या वतीने कारवा या तीन दिवसीय उत्सवाच्या समारोप समारंभात ते बोलत होते.

नागपूर : भारतीय संस्कृती व मानस एका भक्कम पायावर उभा आहे. आपली मते ही स्वानुभावावर आधारित ठेवण्यावर भर दिला आहे. विश्वासार्हतेला अधिक प्राधान्य आपण देत आलो आहोत. माहितीच्या या युगात विविध ॲप्स व संकेतस्थळाशी निगडीत समाजमाध्यमांवरील मत-मतांतरावर जर आपण आपली मते तयार करीत राहिल्यास आपण आपला समृद्ध वारसा हरवून तर बसत नाहीत ना, याचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांनी केले.

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या वतीने कारवा या तीन दिवसीय उत्सवाच्या समारोप समारंभात ते बोलत होते. यावेळी व्हीएनआयटीचे संचालक प्रा. पी.एम. पडोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘बाईटसची लढाई : माहिती युद्धात भारताची भूमिका’ या विषयावर साध्या भाषेत त्यांनी उकल करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ब्रिजेश सिंह म्हणाले, संपू्र्ण विश्वावर एक अपूर्व छाप भारतातील गुणवत्तेने निर्माण केली आहे. आपली मातृभाषा, संस्कृतीतून चालत आलेले आकलन व ज्ञान याला ब्रिटिशांनी छेद दिला. येथील नैसर्गिक साधनसंपत्तीची व्यापाराच्या नावाखाली मोठी लुबाडणुकही केली. याहीपेक्षा त्यांनी आपल्या सोबत आणलेल्या इंग्रजी भाषेच्या माध्यमातून ज्ञान रुजविण्याचा जो प्रयत्न केला तो आव्हानात्मक ठरला. 

इस्त्राईलसारखा छोटा देश लयास गेलेली आपली हिब्रू भाषा मोठ्या प्रयत्नांची शर्थ करून पुन्हा जिवंत करतो. या मातृभाषेच्या बळावर इस्त्राईलच्या हिब्रू विद्यापीठातील तब्बल ३३ व्यक्ती नोबेलने सन्मानित होतात हे आपण विसरता कामा नये. याची आठवण त्यांनी करून दिली. लोकशाही देशात प्रत्येकाच्या मताला जरूर अधिकार आहे. परंतु अभिव्यक्तीच्या नावाखाली जर ही मतमतांतरे चुकीच्या माहितीवर आधारित असतील किंवा ती जाणीवपूर्वक कुणाची फसवणूक करणारी असतील तर त्याला कायद्याच्या चौकटीत एक अटकाव असण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :nagpurनागपूर